शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

भावी सैनिक रस्त्यावर, भरतीचे लगेच उघडले दार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:24 IST

कोल्हापूर : कोरोनामुळे दोन वर्षांपासून बंद असलेली सैन्य भरती सुरू करण्याच्या मागणीसाठी भावी सैनिक असलेली तरुणांची फौज शुक्रवारी रस्त्यावर ...

कोल्हापूर : कोरोनामुळे दोन वर्षांपासून बंद असलेली सैन्य भरती सुरू करण्याच्या मागणीसाठी भावी सैनिक असलेली तरुणांची फौज शुक्रवारी रस्त्यावर उतरली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच निघालेल्या या मोर्चाची दखल प्रशासनालाही तातडीनेे घ्यावी लागली. येत्या डिसेंबरपासून भरती सुरू करीत असल्याचे स्वत: जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जाहीर केल्यानंतर दोन वर्षांच्या या मोर्चाची यशस्वी सांगता झाली.

रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी सैन्य भरतीसाठी तरुणांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. दसरा चौकात शाहू महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून सुरू झालेला मोर्चा व्हिनस कॉर्नर असेंब्ली रोड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. यावेळी सदाभाऊ खोत यांनी भरती सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने अहवाल पाठविण्यासाठी १५ दिवसांचा अल्टिमेटम दिला. निर्णय न घेतल्यास मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा दिला. यानंतर शिष्टमंडळाचे निवेदन स्वीकारल्यानंतर जिल्हाधिकारी रेखावार यांनी प्रशासन भरतीसाठी सदैव तयार आहे, फक्त कोरोनामुळे ती घेता येत नव्हती. शिवाजी विद्यापीठाकडून कॅम्पस वापरण्यास देण्याबाबत परवानगी आल्यानंतर डिसेंबरमध्ये भरती प्रक्रिया सुरू होणार असल्याचे जाहीर केले.

जुन्या फॉर्मवरच भरती करा

५ मार्च २०२० ला ठरलेली भरती रद्द करण्यात आली होती. यासाठी १८ते २० फेब्रुवारीला फॉर्म भरुन घेण्यात आले होते, आता कर्नाटक सरकारच्या धर्तीवर कोल्हापुरातही जुन्या फाॅर्मवर भरती करावी, नाही तर या मुलांचे वय वाढून ते अपात्र ठरणार आहे. नवी भरती ऑनलाईन घ्यावी, अशी मागणी सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या पेठवडगाव येथील तरुण आकाश पाटील याने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.

घोषणा फलकांतून वेदना

सैन्य भरतीसाठी म्हणून पहिल्यांदाच निघालेल्या या मोर्चाचे सारथ्य हातात राष्ट्रध्वज घेऊन फाैजी ड्रेस परिधान करून एका तरुणाने केले. यावेळी तरुणांच्या हातातील घोषणांचे फलक लक्षवेधक आणि मुलांच्या वेदना दाखविणाऱ्या होत्या. न्याय आमचा झालाच पाहिजे भरतीचा दिवस आलाच पाहिजे, वय आमचं गेलं निघून कसं जगायचं वाट बघून, कोरोनाने घेतलाय सूड भरतीला केव्हा येणार मूड, तारीख जाहीर करा नाही तर थेट भरती करा, चला सगळे हात धरू सरकार एक विनंती करू, आई बाबाला सारखी वाटते खंत का पाहता पोराच्या जिवाचा अंत या घोषणा लक्षवेधक होत्या.

चौकट

संरक्षण मंत्र्यांकडे पाठपुरावा

सैन्य भरतीसाठी २१ वर्षे शेवटची मुदत आहे. कोरोनामुळे दोन वर्षे भरती न झाल्याने सराव केलेली बरेच तरुण अपात्र ठरणार आहेत. त्यांना वय वाढवून देण्याबाबचा निर्णय संरक्षणमंत्रीच घेऊ शकतात. याबाबतीत साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी पत्रव्यवहार केला असून, जिल्हा प्रशासनाही पाठपुरावा करत आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसो गलांडे यांनी सांगितले.

फोटो: स्वतंत्र देत आहे.