शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

एलईडी बल्ब लावण्याचे फेरनियोजन करा, कलशेट्टी यांच्या विद्युत विभागास सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 16:39 IST

भारत सरकारचा उपक्रम असलेल्या शहरात एलईडी बल्ब बसविण्याच्या कामाचे चार दिवसांत फेरनियोजन करावे, अशा सक्त सूचना महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी विद्युत विभागास दिल्या आहेत. शहर अभियंता हर्षजित घाटगे तसेच विद्युत विभागाच्या सहायक अभियंता सारिका शेळके यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

ठळक मुद्देएलईडी बल्ब लावण्याचे फेरनियोजन करा कलशेट्टी यांच्या विद्युत विभागास सूचना

कोल्हापूर : भारत सरकारचा उपक्रम असलेल्या शहरात एलईडी बल्ब बसविण्याच्या कामाचे चार दिवसांत फेरनियोजन करावे, अशा सक्त सूचना महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी विद्युत विभागास दिल्या आहेत. शहर अभियंता हर्षजित घाटगे तसेच विद्युत विभागाच्या सहायक अभियंता सारिका शेळके यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.गुरुवारी (दि. ११) झालेल्या विशेष सभेत सर्वच नगरसेवकांनी एलईडी बल्ब बसविणाऱ्या कंपनीविरोधात जोरदार तक्रारी केल्या होत्या. तसेच त्यांच्या कामावर सडकून टीका केली होती. एनर्जी एफिसियन्सी सर्व्हिसेस लि. या कंपनीची मनमानी खपवून घ्यायला ते काय महापालिकेचे जावई आहेत का? असा सवालही सभेत उपस्थित करण्यात आला होता. ठेकेदाराच्या मनमानीमुळे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनाही नगरसेवकांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते.सभागृहात नगरसेवकांनी व्यक्त केलेल्या भावनांची आयुक्तांनी गांभीर्याने दखल घेतली असून, विद्युत विभागाच्या सर्व कर्मचाºयांशी तसेच उपशहर अभियंता हर्षजित घाटगे यांच्याबरोबर चर्चा केली. कंपनी सध्या कशा प्रकारे काम करीत आहे, त्यांच्याकडे मनुष्यबळ किती आहे, आणखी किती मनुष्यबळ लागेल याची माहिती घ्या.

कोणत्या ठिकाणी किती क्षमतेचे बल्ब लावले पाहिजेत, कोणत्या भागात बसविलेले बल्ब बंद पडले आहेत, याची माहिती करून घ्या. ही सगळी माहिती हाती आल्यानंतर कालबद्ध कार्यक्रम तयार करा. प्रत्येक दिवशी किती प्रभागात किती बल्ब जोडले जाणार हे निश्चित करा. एकूण सर्वच कामांचे फेरनियोजन करा, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. त्यानुसार अधिकारी, कर्मचारी कामाला लागले आहेत.शहरात एलईडी बल्ब बसविण्याचा उपक्रम भारत सरकारचा असून, त्याचे काम एनर्जी एफिसिएन्सी लि. या कंपनीला देण्यात आले आहे. ही कंपनीही सरकारनेच नियुक्त केली आहे. फक्त महापालिका सभागृहाने तिला मान्यता द्यायची होती. जेव्हा असा प्रस्ताव महापालिका सभागृहात आला तेव्हा सत्तारूढ कॉँग्रेस, राष्ट्र्वादी कॉँग्रेसच्या सदस्यांनी त्यास सुरुवातीस विरोध केला होता.

दोन सभांमध्ये त्यावर निर्णय झाला नाही. तो पुढे ढकलण्यात आला. या उपक्रमांतर्गत बल्ब जोडण्याच्या कामावर नियंत्रण कोण ठेवणार, अशी शंकाही उपस्थित करण्यात आली होती; परंतु तत्कालीन आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी भारत सरकारचा हा उपक्रम असल्यामुळे तो मंजूर करून द्या, अशी विनंती केली होती. त्यानंतर त्यावर निर्णय घेण्यात आला. 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर