शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

एलईडी बल्ब लावण्याचे फेरनियोजन करा, कलशेट्टी यांच्या विद्युत विभागास सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 16:39 IST

भारत सरकारचा उपक्रम असलेल्या शहरात एलईडी बल्ब बसविण्याच्या कामाचे चार दिवसांत फेरनियोजन करावे, अशा सक्त सूचना महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी विद्युत विभागास दिल्या आहेत. शहर अभियंता हर्षजित घाटगे तसेच विद्युत विभागाच्या सहायक अभियंता सारिका शेळके यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

ठळक मुद्देएलईडी बल्ब लावण्याचे फेरनियोजन करा कलशेट्टी यांच्या विद्युत विभागास सूचना

कोल्हापूर : भारत सरकारचा उपक्रम असलेल्या शहरात एलईडी बल्ब बसविण्याच्या कामाचे चार दिवसांत फेरनियोजन करावे, अशा सक्त सूचना महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी विद्युत विभागास दिल्या आहेत. शहर अभियंता हर्षजित घाटगे तसेच विद्युत विभागाच्या सहायक अभियंता सारिका शेळके यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.गुरुवारी (दि. ११) झालेल्या विशेष सभेत सर्वच नगरसेवकांनी एलईडी बल्ब बसविणाऱ्या कंपनीविरोधात जोरदार तक्रारी केल्या होत्या. तसेच त्यांच्या कामावर सडकून टीका केली होती. एनर्जी एफिसियन्सी सर्व्हिसेस लि. या कंपनीची मनमानी खपवून घ्यायला ते काय महापालिकेचे जावई आहेत का? असा सवालही सभेत उपस्थित करण्यात आला होता. ठेकेदाराच्या मनमानीमुळे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनाही नगरसेवकांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते.सभागृहात नगरसेवकांनी व्यक्त केलेल्या भावनांची आयुक्तांनी गांभीर्याने दखल घेतली असून, विद्युत विभागाच्या सर्व कर्मचाºयांशी तसेच उपशहर अभियंता हर्षजित घाटगे यांच्याबरोबर चर्चा केली. कंपनी सध्या कशा प्रकारे काम करीत आहे, त्यांच्याकडे मनुष्यबळ किती आहे, आणखी किती मनुष्यबळ लागेल याची माहिती घ्या.

कोणत्या ठिकाणी किती क्षमतेचे बल्ब लावले पाहिजेत, कोणत्या भागात बसविलेले बल्ब बंद पडले आहेत, याची माहिती करून घ्या. ही सगळी माहिती हाती आल्यानंतर कालबद्ध कार्यक्रम तयार करा. प्रत्येक दिवशी किती प्रभागात किती बल्ब जोडले जाणार हे निश्चित करा. एकूण सर्वच कामांचे फेरनियोजन करा, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. त्यानुसार अधिकारी, कर्मचारी कामाला लागले आहेत.शहरात एलईडी बल्ब बसविण्याचा उपक्रम भारत सरकारचा असून, त्याचे काम एनर्जी एफिसिएन्सी लि. या कंपनीला देण्यात आले आहे. ही कंपनीही सरकारनेच नियुक्त केली आहे. फक्त महापालिका सभागृहाने तिला मान्यता द्यायची होती. जेव्हा असा प्रस्ताव महापालिका सभागृहात आला तेव्हा सत्तारूढ कॉँग्रेस, राष्ट्र्वादी कॉँग्रेसच्या सदस्यांनी त्यास सुरुवातीस विरोध केला होता.

दोन सभांमध्ये त्यावर निर्णय झाला नाही. तो पुढे ढकलण्यात आला. या उपक्रमांतर्गत बल्ब जोडण्याच्या कामावर नियंत्रण कोण ठेवणार, अशी शंकाही उपस्थित करण्यात आली होती; परंतु तत्कालीन आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी भारत सरकारचा हा उपक्रम असल्यामुळे तो मंजूर करून द्या, अशी विनंती केली होती. त्यानंतर त्यावर निर्णय घेण्यात आला. 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर