शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली
2
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
3
“जनतेची काम करतो म्हणून प्रत्येक समाज घटक ८-८ लाखाच्या फरकाने निवडून देतात”: अजित पवार
4
एकही रुपया न गुंतवता दरवर्षी कमावू शकता ₹२.८८ लाख; पाहा PPF च सीक्रेट, लोकही विचारतील कसं केलं?
5
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
6
ATP Finals 2025: खेळ पाहण्यासाठी आलेल्या दोन चाहत्यांचा मृत्यू, क्रीडाविश्वात शोक!
7
इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीएची सीईटी वर्षातून दोनदा, यंदा एप्रिलमध्ये पहिली, तर मेमध्ये दुसरी सीईटी परीक्षा
8
महायुतीच्या त्सुनामीमुळे विरोधकांत भीती, आशिष शेलार यांचा टोला
9
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
10
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
11
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटावर पाकिस्ताननं काय म्हटलं? तुर्कीनं तर हद्द ओलांडली!
12
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
13
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
14
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
15
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
16
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
17
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
18
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
19
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
20
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश

स्मशानभूमीच्या वादामुळे तब्बल आठ तासानंतर अंत्यविधी; हलकर्णीत प्रशासन हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2022 14:34 IST

ही आमची जागा असून यापुढे तुम्ही इकडे यायचे नाही, असे त्या ग्रामस्थांनी म्हटल्यावर वाद झाला. त्यानंतर दलित समाजातील लोकांनी येऊन ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या मांडला. प्रशासनाविरोधात बोंबमारो आंदोलन केले.

चंदगड : दलित समाजातील तरुणांच्या अंत्यविधीला काही लोकांनी विरोध केल्यामुळे हलकर्णी (ता. चंदगड) गावात शनिवारी दिवसभर तणावपूर्ण वातावरण झाले होते. तहसीलदार व पोलिस निरीक्षकांनी समजूत काढल्यानंतर तब्बल आठ तासानंतर रात्री उशिरा मयतावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अनंत प्रभू कांबळे (वय ३२) रा. हलकर्णी यांचे शनिवारी हदयविकाराने निधन झाले. त्यानंतर नेहमीप्रमाणे गावच्या जवळील स्मशानभूमीत दफनविधीसाठी खोदाई करण्यासाठी गेलेल्या लोकांना काही ग्रामस्थांनी विरोध केला. ही आमची जागा असून यापुढे तुम्ही इकडे यायचे नाही, असे त्या ग्रामस्थांनी म्हटल्यावर वाद झाला. त्यानंतर दलित समाजातील लोकांनी येऊन ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या मांडला. प्रशासनाविरोधात बोंबमारो आंदोलन केले. त्यानंतर पोलिस निरीक्षक संतोष घोळवे यांनी त्या जागेविषयी वाद असल्याने तुमच्या खासगी जागेत यावेळी अंत्यविधी करा त्यानंतर यावर तोडगा काढू, असे सांगितल्यावर दलित समाजातील लोक तयार झाले. पण त्यातील काही लोकांनी प्रत्येकवेळी प्रशासन असेच सांगते व वेळ मारुन नेते त्यामुळे याप्रश्नाचा तोडगा काढल्याशिवाय अंत्यविधी करु नका, म्हणत ग्रामपंचायत कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले.

पुन्हा प्रकरण चिघाळल्यामुळे पोलिस निरीक्षक घोळवे यांनी कठोर भूमिका घेत कायदा व सुव्यवस्था बिघडविल्यास मला नाईलाजाने कारवाई करावी लागेल, असे सांगितल्यावर सरपंच राहूल गावडा, उपसरपंच रमेश सुतार, माजी सरपंच एकनाथ कांबळे, पोलिस पाटील अंकुश पाटील यांच्या पुढाकाराने दलित समाजातील लोकांनी नमती भूमिका घेत स्वमालकीच्या जागेत अंत्यविधी केला. चौकट तहसीलदार हतबल गावातील वातावरण तणावपूर्ण बनल्याने तहसीलदार विनोद रणवरे यांनी ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण मूळ जागा मालक काही बोलत नसताना जवळच्या लोकांचे ऐकून तुम्ही त्यांना सांगायचे सोडून आम्हालाच का सा़ंगता? असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केल्याने तहसीलदार हतबलच झाले होते.

चौकट जागेचे पुरावे मागताच ते निरुत्तर

कित्येक वर्षांपासून हलकर्णी गावाजवळील स्मशानभूमीत अंत्यविधी करत आहेत.‌ पण गेल्या वर्षीपासून याविषयी वाद निर्माण झाला आहे. शनिवारीही वाद निर्माण झाल्याने संबंधित जागेजवळील लोकांना ती जागा तुमची असेल तर त्याचे पुरावे आणा, असे तहसीलदार रणवरे व पोलिस निरीक्षक घोळवे यांनी सुनावताच ते निरुत्तर झाले. त्यानंतरही प्रशासनाने कठोर भूमिका न घेताच दलित समाजातील लोकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर