शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
2
उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा...
3
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
4
USA Hanuman Statue: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
5
"आधी नवरा गेला, आता मुलगी..."; विद्यार्थिनीचा शाळेत संशयास्पद मृत्यू, आईने फोडला टाहो
6
चेक क्लिअरन्स आता एका दिवसातच! 'या' तारखेपासून नवा नियम लागू, जाणून घ्या कसा घ्यायचा फायदा
7
Rahul Gandhi : "भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती"
8
Katrina Kaif Pregnancy: गुडन्यूज! कतरिना कैफने शेअर केला बेबी बंप फोटो, ४२ व्या वर्षी देणार बाळाला जन्म
9
कलियुगातला कंस! सूनेसोबतच मामाचे प्रेमबंध जुळले, अडथळा ठरणाऱ्या भाच्याला संपवले
10
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
11
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
12
सार्वजनिक निधीचा वापर नेत्यांच्या पुतळ्यांसाठी करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय
13
आयआयटी कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थ्याला नग्न करून चप्पलांनी मारहाण; ३ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल, वॉर्डन निलंबित
14
PAK v SL: २१८० दिवस... श्रीलंका त्याचाच फायदा घेणार, पाकिस्तान आज आशिया कपमधून बाहेर होणार?
15
कोणी बिजनेसवुमन तर कोणी बॉलिवूड स्टार! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या नवदुर्गा काय करतात?
16
Aadhaar App :'आधार कार्ड'मध्ये बदल करणे होणार सोपे, नवीन अ‍ॅप लाँचच्या तयारीत;मिळणार खास फीचर
17
हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप जीवघेणा; युरोपमध्ये ६२,७०० जणांचा मृत्यू, वाढत्या तापमानाचा जगाला धोका
18
९४ मिनिटांचा थरार! विमानांच्या चाकांमध्ये लपून दिल्लीत आलेल्या अफगाणी मुलासोबत पुढे काय घडलं?
19
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
20
महिंद्रा, PNB आणि L&T... दिवाळीपूर्वी मोठी कमाईची संधी! बाजारातील 'हे' ५ शेअर्स ठरू शकतात गेमचेंजर

स्मशानभूमीच्या वादामुळे तब्बल आठ तासानंतर अंत्यविधी; हलकर्णीत प्रशासन हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2022 14:34 IST

ही आमची जागा असून यापुढे तुम्ही इकडे यायचे नाही, असे त्या ग्रामस्थांनी म्हटल्यावर वाद झाला. त्यानंतर दलित समाजातील लोकांनी येऊन ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या मांडला. प्रशासनाविरोधात बोंबमारो आंदोलन केले.

चंदगड : दलित समाजातील तरुणांच्या अंत्यविधीला काही लोकांनी विरोध केल्यामुळे हलकर्णी (ता. चंदगड) गावात शनिवारी दिवसभर तणावपूर्ण वातावरण झाले होते. तहसीलदार व पोलिस निरीक्षकांनी समजूत काढल्यानंतर तब्बल आठ तासानंतर रात्री उशिरा मयतावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अनंत प्रभू कांबळे (वय ३२) रा. हलकर्णी यांचे शनिवारी हदयविकाराने निधन झाले. त्यानंतर नेहमीप्रमाणे गावच्या जवळील स्मशानभूमीत दफनविधीसाठी खोदाई करण्यासाठी गेलेल्या लोकांना काही ग्रामस्थांनी विरोध केला. ही आमची जागा असून यापुढे तुम्ही इकडे यायचे नाही, असे त्या ग्रामस्थांनी म्हटल्यावर वाद झाला. त्यानंतर दलित समाजातील लोकांनी येऊन ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या मांडला. प्रशासनाविरोधात बोंबमारो आंदोलन केले. त्यानंतर पोलिस निरीक्षक संतोष घोळवे यांनी त्या जागेविषयी वाद असल्याने तुमच्या खासगी जागेत यावेळी अंत्यविधी करा त्यानंतर यावर तोडगा काढू, असे सांगितल्यावर दलित समाजातील लोक तयार झाले. पण त्यातील काही लोकांनी प्रत्येकवेळी प्रशासन असेच सांगते व वेळ मारुन नेते त्यामुळे याप्रश्नाचा तोडगा काढल्याशिवाय अंत्यविधी करु नका, म्हणत ग्रामपंचायत कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले.

पुन्हा प्रकरण चिघाळल्यामुळे पोलिस निरीक्षक घोळवे यांनी कठोर भूमिका घेत कायदा व सुव्यवस्था बिघडविल्यास मला नाईलाजाने कारवाई करावी लागेल, असे सांगितल्यावर सरपंच राहूल गावडा, उपसरपंच रमेश सुतार, माजी सरपंच एकनाथ कांबळे, पोलिस पाटील अंकुश पाटील यांच्या पुढाकाराने दलित समाजातील लोकांनी नमती भूमिका घेत स्वमालकीच्या जागेत अंत्यविधी केला. चौकट तहसीलदार हतबल गावातील वातावरण तणावपूर्ण बनल्याने तहसीलदार विनोद रणवरे यांनी ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण मूळ जागा मालक काही बोलत नसताना जवळच्या लोकांचे ऐकून तुम्ही त्यांना सांगायचे सोडून आम्हालाच का सा़ंगता? असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केल्याने तहसीलदार हतबलच झाले होते.

चौकट जागेचे पुरावे मागताच ते निरुत्तर

कित्येक वर्षांपासून हलकर्णी गावाजवळील स्मशानभूमीत अंत्यविधी करत आहेत.‌ पण गेल्या वर्षीपासून याविषयी वाद निर्माण झाला आहे. शनिवारीही वाद निर्माण झाल्याने संबंधित जागेजवळील लोकांना ती जागा तुमची असेल तर त्याचे पुरावे आणा, असे तहसीलदार रणवरे व पोलिस निरीक्षक घोळवे यांनी सुनावताच ते निरुत्तर झाले. त्यानंतरही प्रशासनाने कठोर भूमिका न घेताच दलित समाजातील लोकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर