शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
2
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
3
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
4
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
5
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
6
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
7
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
8
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
9
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!
10
"पंक्चर बनवणारे येऊन...!", बिहारमध्ये योगी आदित्यनाथांची तुफान बॅटिंग; विरोधकांवर थेट हल्लाबोल
11
"जबरदस्तीनं मिठीत घ्यायचा, शारीरिक जवळीक साधायचा, अन्..."; महिला क्रिकेटरच्या आरोपांनी खळबळ
12
धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल कळताच हेमा मालिनी रुग्णालयात पोहोचल्या, म्हणाल्या, "आम्ही सगळेच..."
13
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
14
'या' मुस्लिम देशाची अमेरिकेशी वाढतेय जवळीक! ब्लॅकलिस्टमधून बाहेर पडताच, ८० वर्षांनी अमेरिकेत एन्ट्री
15
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
16
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेरच नाही आली; दरवाजा तोडला तर...
17
ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील 'हा' शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, वर्षात ५७% रिटर्न, अजूनही संधी?
18
२ डॉक्टर अन् मशिदीच्या इमामासह ७ जणांना अटक, 'व्हाइट कॉलर' दहशतवाद्यांचा पर्दाफाश, पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे
19
कर्मानेच अडकले! करायला गेला एक अन्.. दहशतवादी अकील आणि मुजम्मिल यांचा 'असा' झाला पर्दाफाश!
20
Jalgaon Accident: कार दुभाजकावर धडकून पेटली, पत्नीचा होरपळून मृत्यू, पती गंभीर जखमी 

राधानगरी अभयारण्य रस्त्यांचा निधी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क राधानगरी : दीर्घकाळापासून रेंगाळलेली राधानगरी अभयारण्यग्रस्तांची पुनर्वसन प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे. यासाठी उपलब्ध ...

लोकमत न्यूज नेटवर्क

राधानगरी : दीर्घकाळापासून रेंगाळलेली राधानगरी अभयारण्यग्रस्तांची पुनर्वसन प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे. यासाठी उपलब्ध झालेल्या 25 कोटी निधीतून प्रलंबित रक्कम येत्या सात एप्रिल रोजी प्रकल्प अधिकाऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली जाईल, असे वनसंरक्षक समाधान चव्हाण यांनी शिष्टमंडळाला सांगितले. याबाबत ‘लोकमत’ने प्रकल्पग्रस्तांच्या समस्येचा मालिकेद्वारे आढावा घेतल्याने ही प्रक्रिया सुरू होण्यास मदत झाली.

विस्तारित राधानगरी अभयारण्यामुळे विस्थापित होणाऱ्या 30 गावांपैकी न्यू करंजे, एजीवडे, दाऊतवाडी या गावांची पुनर्वसन प्रक्रिया अनेक वर्षांपासून सुरू आहे. यातील बहुतांश लोकांनी एकरकमी पॅकेजचा पर्याय स्वीकारला आहे. यापैकी काहींना पहिला हप्ता व काहींना दुसरा हप्ता मिळाला आहे. मात्र, त्यांची घरे, शेतजमिनी, झाडे या मालमत्तांच्या मूल्यांकनाची रक्कम अजून मिळालेले नाही. एकत्रित ही रक्कम 18 कोटी 72 लाख होते.

विविध पातळ्यांवर पाठपुरावा करून ही रक्कम उपलब्ध होत नव्हती. ‘लोकमत’ने वृत्तमालिकेद्वारे हा प्रश्न मांडला. यामुळे बळ मिळालेल्या अभयारण्यग्रस्तांनी चार दिवसांपूर्वी आज (ता.५) उपवनसंरक्षक कार्यालयात घुसून आंदोलन करण्याचा इशारा वन्यजीव विभागाला दिला होता. त्यानुसार प्रकल्पग्रस्त आज कोल्हापुरातील या कार्यालयात गेले होते.

यावेळी झालेल्या चर्चेत या निधीबरोबरच या लोकांना घरासाठी जागा देण्यासाठी सकारात्मक चर्चा झाली. याशिवाय प्रकल्पग्रस्त म्हणून मिळणारे दाखले एकाच वेळी व एकाच छताखाली देण्याची व्यवस्था करण्याचेही मान्य करण्यात आले. यावेळी उपवनसंरक्षक व प्रकल्प अधिकारी रावसाहेब काळे, विभागीय वनाधिकारी विशाल माळी, प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी दीपक तेली, मनोज पाटील, प्रमोद कसबले, वैजनाथ किरमिटे, लक्ष्मण बिरंबोळे, संतोष बिरंबोळे, मज्जिद तांबोळी, प्रवीण सुतार, विलास कसबले आदी उपस्थित होते.

ठळक - महाराष्ट्र पर्यायी वनीकरण निधी (महा कॅम्पा) नागपूर येथील मुख्य वनसंरक्षक व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी वनसंरक्षक यांना दिलेल्या आदेशात केंद्र शासनाच्या वार्षिक नियोजन आराखडा योजनेतून मंजूर झालेल्या 25 कोटी रकमेतून प्रलंबित पुनर्वसन कामासाठी निधी वापरावा व केलेल्या कामाचा त्वरित अहवाल पाठवावा, असे स्पष्टपणे नमूद केले आहे. त्यामुळे लवकरच ही रक्कम प्रत्यक्ष अभयारण्यग्रस्तांना मिळण्यास कोणतीही अडचण नाही.