शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
3
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
4
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
5
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
6
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
7
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
8
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
9
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
10
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
11
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
12
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
13
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
14
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
15
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
16
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
17
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
18
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
19
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
20
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?

राधानगरी अभयारण्य रस्त्यांचा निधी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क राधानगरी : दीर्घकाळापासून रेंगाळलेली राधानगरी अभयारण्यग्रस्तांची पुनर्वसन प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे. यासाठी उपलब्ध ...

लोकमत न्यूज नेटवर्क

राधानगरी : दीर्घकाळापासून रेंगाळलेली राधानगरी अभयारण्यग्रस्तांची पुनर्वसन प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे. यासाठी उपलब्ध झालेल्या 25 कोटी निधीतून प्रलंबित रक्कम येत्या सात एप्रिल रोजी प्रकल्प अधिकाऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली जाईल, असे वनसंरक्षक समाधान चव्हाण यांनी शिष्टमंडळाला सांगितले. याबाबत ‘लोकमत’ने प्रकल्पग्रस्तांच्या समस्येचा मालिकेद्वारे आढावा घेतल्याने ही प्रक्रिया सुरू होण्यास मदत झाली.

विस्तारित राधानगरी अभयारण्यामुळे विस्थापित होणाऱ्या 30 गावांपैकी न्यू करंजे, एजीवडे, दाऊतवाडी या गावांची पुनर्वसन प्रक्रिया अनेक वर्षांपासून सुरू आहे. यातील बहुतांश लोकांनी एकरकमी पॅकेजचा पर्याय स्वीकारला आहे. यापैकी काहींना पहिला हप्ता व काहींना दुसरा हप्ता मिळाला आहे. मात्र, त्यांची घरे, शेतजमिनी, झाडे या मालमत्तांच्या मूल्यांकनाची रक्कम अजून मिळालेले नाही. एकत्रित ही रक्कम 18 कोटी 72 लाख होते.

विविध पातळ्यांवर पाठपुरावा करून ही रक्कम उपलब्ध होत नव्हती. ‘लोकमत’ने वृत्तमालिकेद्वारे हा प्रश्न मांडला. यामुळे बळ मिळालेल्या अभयारण्यग्रस्तांनी चार दिवसांपूर्वी आज (ता.५) उपवनसंरक्षक कार्यालयात घुसून आंदोलन करण्याचा इशारा वन्यजीव विभागाला दिला होता. त्यानुसार प्रकल्पग्रस्त आज कोल्हापुरातील या कार्यालयात गेले होते.

यावेळी झालेल्या चर्चेत या निधीबरोबरच या लोकांना घरासाठी जागा देण्यासाठी सकारात्मक चर्चा झाली. याशिवाय प्रकल्पग्रस्त म्हणून मिळणारे दाखले एकाच वेळी व एकाच छताखाली देण्याची व्यवस्था करण्याचेही मान्य करण्यात आले. यावेळी उपवनसंरक्षक व प्रकल्प अधिकारी रावसाहेब काळे, विभागीय वनाधिकारी विशाल माळी, प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी दीपक तेली, मनोज पाटील, प्रमोद कसबले, वैजनाथ किरमिटे, लक्ष्मण बिरंबोळे, संतोष बिरंबोळे, मज्जिद तांबोळी, प्रवीण सुतार, विलास कसबले आदी उपस्थित होते.

ठळक - महाराष्ट्र पर्यायी वनीकरण निधी (महा कॅम्पा) नागपूर येथील मुख्य वनसंरक्षक व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी वनसंरक्षक यांना दिलेल्या आदेशात केंद्र शासनाच्या वार्षिक नियोजन आराखडा योजनेतून मंजूर झालेल्या 25 कोटी रकमेतून प्रलंबित पुनर्वसन कामासाठी निधी वापरावा व केलेल्या कामाचा त्वरित अहवाल पाठवावा, असे स्पष्टपणे नमूद केले आहे. त्यामुळे लवकरच ही रक्कम प्रत्यक्ष अभयारण्यग्रस्तांना मिळण्यास कोणतीही अडचण नाही.