शहरं
Join us  
Trending Stories
1
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
2
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
3
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
4
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
5
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
6
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
7
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
8
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
9
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
10
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
11
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
12
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
13
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
14
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
15
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
16
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
17
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
18
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
19
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
20
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?

साहित्य संमेलनात पूर्णवेळ गं्रथपालाचा ठराव

By admin | Updated: April 9, 2015 00:04 IST

पाठपुराव्याची गरज : राज्यातील ११०० अर्धवेळ गं्रथपाल १५ वर्षे शासन निर्णयाच्या प्रतीक्षेत

संजय थोरात - नूल -पंजाबमधील घुमान येथे नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या सांगता समारंभात ५०० विद्यार्थी संख्या असलेल्या माध्यमिक शाळांत पूर्णवेळ गं्रथपालाची नेमणूक करावी, असा ठराव ‘पुन्हा एकदा’ करण्यात आला. राज्यातील ११०० अर्धवेळ गं्रथपाल शासनाच्या या निर्णयाची २० वर्षे वाट पाहत आहेत. याबाबत केवळ ठराव करून न थांबता पाठपुरावा करण्याची गरज आहे.‘शाळा तिथे गं्रथालय व ग्रंथालय तिथे गं्रथपाल’ हवा ही कोठारी आयोगाने शिफारस केली होती. चिपळूणकर समितीने ही पदे मंजूर केली. सध्या ५०० विद्यार्थी संख्येला अर्धवेळ गं्रथपाल, तर १००० च्या वर विद्यार्थी संख्येला पूर्णवेळ गं्रथपाल पद अशी शासनाची अट आहे. खेडोपाडी असणारी शाळांची संख्या, इंग्रजी माध्यमाचे फुटलेले पेव, घटते मुलांचे प्रमाण या पार्श्वभूमीवर १००० संख्या होणे अशक्य आहे. सध्या बऱ्याच शाळांमध्ये ५०० ते ७०० च्या दरम्यान विद्यार्थी संख्या आहे. तर काही ठिकाणी ५०० पेक्षाही कमी संख्या आहे. तत्कालीन शासनाने २००६ साली १००० विद्यार्थी संख्या असलेली ९२४ अर्धवेळ पदे पूर्णवेळ करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, दुर्देव असे की ९२४ पैकी फक्त ५७७ गं्रथपाल पूर्णवेळ म्हणून पात्र ठरले. उर्वरित गं्रथपाल अद्याप आशेचा किरण शोधत आहेत. सध्या राज्यात ११०० पदे अर्धवेळ आहेत. अनेकांची सेवा २० वर्षांहून अधिक झाली आहे. काहीजण आयुष्याच्या ४० ते ४५ च्या उंबरठ्यावर आहेत. ‘इकडे आड-तिकडे विहीर’ अशी त्यांची अवस्था आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा गं्रथपाल संघटनेच्या माध्यमातून शासनाशी १५ वर्षे लढा सुरू आहे. तत्कालीन शासनातील मंत्र्यांनी अक्षता लावल्या आहेत. सध्या हा प्रश्न उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ठ झाला आहे. विद्यमान युती सरकारनदेखील हा प्रश्न सोडविण्याचे केवळ आश्वासन दिले आहे. यापूर्वी अनेक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांमध्ये ‘पूर्णवेळ गंं्रथपाल’ पदाचे ठराव झाले आहेत. तसाच ठराव ‘पुन्हा एकदा’ घुमान साहित्य संमेलनात झाला. केवळ ठराव करून गप्प बसून चालणार नाही, तर हा प्रश्न लावून धरण्याची गरज आहे. तरच मराठी भाषेसंदर्भात होणाऱ्या या ठरावाला अर्थप्राप्त होणार आहे. शासनाने उर्वरित ११०० अर्धवेळ गं्रथपालांना वाऱ्यावर न सोडता विद्यार्थी संख्येची जाचक अट रद्द करून ‘पूर्णवेळ’ करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी अर्धवेळ गं्रथपालांकडून होत आहे.साहित्य संमेलनातील ठरावाबाबत साहित्यिकांना धन्यवाद देतो. आमच्या पाठीशी राहा. वाचन संस्कृती वाढवूया. शासन दरबारी व न्यायालय, अशा दोन्ही पातळीवर संघर्ष सुरू आहे. नव्या सरकारकडून अपेक्षा आहेत. प्रश्न लवकरच सुटेल, अशी आशा आहे.- राजेंद्र पाटील, राज्याध्यक्ष, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा गं्रथपाल संघ.