शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

‘हॅमरल टेक्सटाइल्स’ पुन्हा सुरू करण्यास पूर्ण सहकार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 05:15 IST

कागल-पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील एफ. एम. हॅमरल टेक्सटाइल्स लिमिटेड ही कंपनी दिवाळीखोरीत गेल्याने मागील चार महिन्यांपासून बंद आहे.

कोल्हापूर : कागल-पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील एफ. एम. हॅमरल टेक्सटाइल्स लिमिटेड ही कंपनी दिवाळीखोरीत गेल्याने मागील चार महिन्यांपासून बंद आहे. ती कंपनी पुन्हा सुरू करण्यास श्रमिक उत्कर्ष सभा आणि कामगारांचे पूर्ण सहकार्य राहील, असे श्रमिक उत्कर्ष सभेचे सरचिटणीस विजय कांबळे यांनी गुरुवारी येथे सांगितले.कोल्हापूर येथील महालक्ष्मी हॉलमध्ये उत्कर्ष सभेतर्फे आयोजित कामगार मेळाव्यानिमित्त ते आले असता त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. ते म्हणाले, ‘हॅमरल टेक्सटाइल्स’ पुन्हा सुरू करण्यासाठी उत्कर्ष सभेचे प्रयत्न सुरू आहेत. जी संस्था अथवा व्यक्ती ही कंपनी सुरू करण्यासाठी ताब्यात घेण्यास इच्छुक आहे, त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल. मात्र, अट एकच राहील की, ज्या चुका आणि अनागोंदीच्या कामकाजामुळे संबंधित कंपनी बंद पडली, ते पुन्हा होऊ नये. कामगार हे वर्षभर दहा ते बारा हजार रुपये पगार घेण्यास तयार आहेत. वर्ष संपल्यानंतर कामगारांनी दिलेले सहकार्य लक्षात घेऊन वेतनासह अन्य घटकांबाबत कामगार संघटनेशी चर्चा करावी. ज्या विश्वासाने कामगार कंपनी ताब्यात देणार आहेत, तो विश्वास कंपनी ताब्यात घेणाऱ्यांनी सार्थ ठरवावा.>सर्वपक्षीय नेत्यांनी विचार करावास्थानिक राजकारणामुळे कागल-पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील काही कंपन्या बंद पडल्या आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात बेरोजगारी वाढत आहे. ते लक्षात घेऊन या क्षेत्रात राजकारण आणू नये. कामगारांचे प्रश्न सोडविण्यासह औद्योगिक क्षेत्राला बळ देण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी सांघिक विचार करावा, असे सरचिटणीस कांबळे यांनी सांगितले.