शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
2
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
3
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
6
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
7
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
8
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
9
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
10
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
11
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
12
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
13
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
14
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
15
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
16
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
17
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
18
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
19
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
20
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     

‘एफआरपी’चा कायदा शिथिल करावा लागेल

By admin | Updated: October 10, 2015 00:31 IST

चंद्रकांतदादा पाटील यांचे संकेत

कोल्हापूर : ‘एफआरपी’ एकरकमीच द्यायला हवी, असा कायदा आहे; परंतु साखर कारखानदारीही मोडून चालणार नाही. त्यामुळे या दोन्हींमध्ये सुवर्णमध्य साधण्यासाठी कायदा थोडा शिथिल करावा लागेल, असे सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शुक्रवारी सकाळी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. राज्यातील ५८ कारखान्यांनी गत हंगामातील शंभर टक्के एफआरपी दिली असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.सहकारमंत्री म्हणाले, ‘कायद्याप्रमाणे एफआरपी चौदा दिवसांत देणे बंधनकारक आहे. ती देण्यासाठी साखर कारखानदारीला जेवढी म्हणून मदत करता येईल तेवढी मदत भाजपच्या सरकारने केली आहे. काँग्रेस आघाडीच्या सरकारने गेल्या १५ वर्षांत जेवढी मदत केली नाही तेवढी मदत आमच्या सरकारने एका वर्षात केली आहे. केंद्र सरकारने गतवर्षी सहा हजार कोटींचे पॅकेज दिले. त्यातील २१०० कोटी रुपये एकट्या महाराष्ट्राच्या वाट्याला आले. त्यातही जे कारखाने बसत नव्हते, त्यांच्यासाठी राज्य शासनाने ३०० कोटी रुपये दिले. या २४०० कोटी रुपयांवरील व्याजही राज्य सरकारच भरणार आहे. ज्या कारखान्यांचे नेटवर्थ उणे होते, अशा कारखान्यांना राज्य सरकारने हमी दिली आहे. ज्या कारखान्यांनी एफआरपी दिलेली नाही, अशा आठ कारखान्यांवर गतहंगामात जप्तीची कारवाई केली आहे.’ ते म्हणाले, ‘राज्यातील कारखान्यांकडून चार दिवसांपूर्वी १३०० कोटी रुपये एफआरपी थकीत होती. कारखान्यांची कर्जाची प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे त्यातीलही रक्कम आता कमी झाली असेल. सुमारे ४०० कोटी रुपयेच एफआरपीचे शिल्लक राहतील, असा अंदाज आहे म्हणजे गत हंगामातील देय रकमेपैकी ९३ टक्के रक्कम शेतकऱ्यांना मिळाली आहे. राज्यातील ५८ कारखान्यांनी त्यांनी देय असलेली एफआरपीची शंभर टक्के रक्कम दिली आहे. गेल्या पूर्ण हंगामात साखरेचा दर सरासरी १८०० रुपये असतानाही राज्य व केंद्र सरकारच्या मदतीने साखर कारखानदारीने मार्ग काढला व एफआरपी दिली आहे. आताही साखरेचे दर वाढू लागले आहेत. त्यामुळे एफआरपी देण्यात अडचण येणार नाही. एफआरपी तर मिळालीच पाहिजे व कारखानदारीही टिकली पाहिजे, असाच आमचा प्रयत्न आहे म्हणूनच कायदा थोडा सैल करावा लागेल. साखर कारखान्यांकडून यंदाही पॅकेजची मागणी होऊ लागली आहे परंतु वारंवार पॅकेज देणे शक्य होणार नाही. कारखान्यांनी काही जबाबदारी घ्यावी लागेल.’ (प्रतिनिधीराजू शेट्टी हे तर ‘विष्णू’चा अवतारखासदार राजू शेट्टी हे तर लक्ष्मीचा पती असलेल्या ‘विष्णू’चा अवतार आहेत. त्यांच्यामुळेच शेतकऱ्यांच्या घरात लक्ष्मी नांदू लागली असल्याचे सहकारमंत्र्यांनी स्पष्ट केले. मंत्री पाटील म्हणाले, ‘शेट्टी हे संघटनेचे नेते प्रथम आहेत व त्यानंतर ते सत्तेत सहभागी झाले आहेत. सत्तेमध्ये राहूनही त्यांनी आंदोलन करणे गैर काही नाही. आंदोलन करण्याचे त्यांचे स्वातंत्र्य कोणी हिरावून घेऊ शकत नाही.’जयंत पाटील-मुंडे लवादऊसतोडणी मजुरांनी मजुरीत वाढ करण्याची मागणी केली आहे. त्याचा निर्णय घेण्यासाठी माजी मंत्री जयंत पाटील व महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा लवाद शासनाने नेमला आहे. त्या लवादाची आज, शनिवारी मुंबईत बैठक होत आहे. त्यातून हा प्रश्न मार्गी लागेल असे वाटते, नाही लागला तर सहकारमंत्री म्हणून मी त्यामध्ये नक्कीच लक्ष घालेन.