शहरं
Join us  
Trending Stories
1
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
2
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
3
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नाही म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
4
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
5
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
6
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
7
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
8
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
9
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
11
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
12
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
14
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
15
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
16
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
17
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
18
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
19
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
20
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?

‘एफआरपी’चा कायदा शिथिल करावा लागेल

By admin | Updated: October 10, 2015 00:31 IST

चंद्रकांतदादा पाटील यांचे संकेत

कोल्हापूर : ‘एफआरपी’ एकरकमीच द्यायला हवी, असा कायदा आहे; परंतु साखर कारखानदारीही मोडून चालणार नाही. त्यामुळे या दोन्हींमध्ये सुवर्णमध्य साधण्यासाठी कायदा थोडा शिथिल करावा लागेल, असे सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शुक्रवारी सकाळी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. राज्यातील ५८ कारखान्यांनी गत हंगामातील शंभर टक्के एफआरपी दिली असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.सहकारमंत्री म्हणाले, ‘कायद्याप्रमाणे एफआरपी चौदा दिवसांत देणे बंधनकारक आहे. ती देण्यासाठी साखर कारखानदारीला जेवढी म्हणून मदत करता येईल तेवढी मदत भाजपच्या सरकारने केली आहे. काँग्रेस आघाडीच्या सरकारने गेल्या १५ वर्षांत जेवढी मदत केली नाही तेवढी मदत आमच्या सरकारने एका वर्षात केली आहे. केंद्र सरकारने गतवर्षी सहा हजार कोटींचे पॅकेज दिले. त्यातील २१०० कोटी रुपये एकट्या महाराष्ट्राच्या वाट्याला आले. त्यातही जे कारखाने बसत नव्हते, त्यांच्यासाठी राज्य शासनाने ३०० कोटी रुपये दिले. या २४०० कोटी रुपयांवरील व्याजही राज्य सरकारच भरणार आहे. ज्या कारखान्यांचे नेटवर्थ उणे होते, अशा कारखान्यांना राज्य सरकारने हमी दिली आहे. ज्या कारखान्यांनी एफआरपी दिलेली नाही, अशा आठ कारखान्यांवर गतहंगामात जप्तीची कारवाई केली आहे.’ ते म्हणाले, ‘राज्यातील कारखान्यांकडून चार दिवसांपूर्वी १३०० कोटी रुपये एफआरपी थकीत होती. कारखान्यांची कर्जाची प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे त्यातीलही रक्कम आता कमी झाली असेल. सुमारे ४०० कोटी रुपयेच एफआरपीचे शिल्लक राहतील, असा अंदाज आहे म्हणजे गत हंगामातील देय रकमेपैकी ९३ टक्के रक्कम शेतकऱ्यांना मिळाली आहे. राज्यातील ५८ कारखान्यांनी त्यांनी देय असलेली एफआरपीची शंभर टक्के रक्कम दिली आहे. गेल्या पूर्ण हंगामात साखरेचा दर सरासरी १८०० रुपये असतानाही राज्य व केंद्र सरकारच्या मदतीने साखर कारखानदारीने मार्ग काढला व एफआरपी दिली आहे. आताही साखरेचे दर वाढू लागले आहेत. त्यामुळे एफआरपी देण्यात अडचण येणार नाही. एफआरपी तर मिळालीच पाहिजे व कारखानदारीही टिकली पाहिजे, असाच आमचा प्रयत्न आहे म्हणूनच कायदा थोडा सैल करावा लागेल. साखर कारखान्यांकडून यंदाही पॅकेजची मागणी होऊ लागली आहे परंतु वारंवार पॅकेज देणे शक्य होणार नाही. कारखान्यांनी काही जबाबदारी घ्यावी लागेल.’ (प्रतिनिधीराजू शेट्टी हे तर ‘विष्णू’चा अवतारखासदार राजू शेट्टी हे तर लक्ष्मीचा पती असलेल्या ‘विष्णू’चा अवतार आहेत. त्यांच्यामुळेच शेतकऱ्यांच्या घरात लक्ष्मी नांदू लागली असल्याचे सहकारमंत्र्यांनी स्पष्ट केले. मंत्री पाटील म्हणाले, ‘शेट्टी हे संघटनेचे नेते प्रथम आहेत व त्यानंतर ते सत्तेत सहभागी झाले आहेत. सत्तेमध्ये राहूनही त्यांनी आंदोलन करणे गैर काही नाही. आंदोलन करण्याचे त्यांचे स्वातंत्र्य कोणी हिरावून घेऊ शकत नाही.’जयंत पाटील-मुंडे लवादऊसतोडणी मजुरांनी मजुरीत वाढ करण्याची मागणी केली आहे. त्याचा निर्णय घेण्यासाठी माजी मंत्री जयंत पाटील व महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा लवाद शासनाने नेमला आहे. त्या लवादाची आज, शनिवारी मुंबईत बैठक होत आहे. त्यातून हा प्रश्न मार्गी लागेल असे वाटते, नाही लागला तर सहकारमंत्री म्हणून मी त्यामध्ये नक्कीच लक्ष घालेन.