शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

‘एफआरपी’चे तुकडे चालणार नाहीतच; राजू शेट्टींनी कारखानदारांना ठणकावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 00:49 IST

कोल्हापूर : कायद्याने एकरकमी एफआरपी देणे बंधनकारक आहे. तुकडे करून दिलेले पैसे शेतकऱ्यांच्या हाताला लागत नसल्याने तुकड्यांची भाषा चालणार ...

कोल्हापूर : कायद्याने एकरकमी एफआरपी देणे बंधनकारक आहे. तुकडे करून दिलेले पैसे शेतकऱ्यांच्या हाताला लागत नसल्याने तुकड्यांची भाषा चालणार नाही, अशा शब्दांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी साखर कारखानदारांना ठणकावून सांगितले. साखरेचे दर घसरल्याने ‘एफआरपी’तील ८० टक्के रक्कम पहिल्या उचलीच्या स्वरूपात देण्याचा प्रस्ताव कारखानदारांनी शेट्टी यांच्यासमोर ठेवला होता.साखरेच्या दरात झालेली घसरण आणि बॅँकांकडून मिळणारी उचल पाहता, एकरकमी एफआरपी देणे अशक्य असल्याचे कारखानदारांचे मत आहे. त्यामुळे सरकारने मदत करण्याबरोबरच एफआरपी दोन टप्प्यांत देण्यासाठी ‘स्वाभिमानी’ शेतकरी संघटनेने अनुमती देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील व खासदार राजू शेट्टी यांच्याशी चर्चा करण्यासाठी कारखानदारांनी चौघांची समिती स्थापन केली आहे. त्यांनी मंत्री पाटील यांची भेट घेतली. रविवारी सकाळी माजी मंत्री प्रकाश आवाडे, प्रा. संजय मंडलिक, गणपतराव पाटील व राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी खासदार शेट्टी यांची शिरोळ येथे घरी भेट घेतली. साखर कारखानदारीसमोरील अडचणींचा पाढा त्यांनी वाचत, ‘एफआरपी’तील ८० टक्के पहिली उचल देण्याची तयारी दर्शविली. त्याला विरोध करीत ‘एफआरपी’चे तुकडे पाडले तर त्या पैशाचा शेतकºयांना काहीच उपयोग होणार नाही. त्यामुळे एकरकमी एफआरपीबाबत अजिबात तडजोड करणार नसल्याचे शेट्टी यांनी कारखानदारांना ठणकावून सांगितले.अडचणीच्या काळात कोणत्याही उद्योगाला मदत करणे ही सरकारची जबाबदारी असते. त्यात सरकार कारखान्यांना मदत करण्यास तयार असल्याचे मुख्यमंत्री व महसूलमंत्री खासगीत बोलतात. सरकार खरेच मदत करणार असेल तर एफआरपी देण्यासाठी जेवढे पैसे कमी पडतात, तेवढे त्यांनी द्यावेत. कारखानदारांनी सरकारकडे पाठपुरावा करावा, अशी सूचनाही शेट्टी यांनी केली.निर्यातीसाठी १०० कोटींची मदत अपेक्षितसाखरेचा उठाव व्हायचा झाल्यास सरकारने तातडीने पावले उचलण्याची गरज आहे. बॅँकांकडील तारण साखरेचा प्रश्न सोडविण्यासाठी कारखान्यांना निर्यातीची सक्ती करीत असताना त्यांना मदत केली पाहिजे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील साखरेचे दर पाहता, प्रतिक्विंटल ५०० रुपये तफावत आहे, त्यात दोनशे रुपये अनुदान मिळणार आहे. राहतो प्रश्न ३०० रुपयांचा. तेवढी सरकारने मदत करावी. ही रक्कम शंभर कोटींपेक्षा जास्त होत नसल्याचे शेट्टी यांनी सांगितले.