शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

‘एफआरपी’ हाच मागील हंगामातील उसाचा अंतिम दर

By admin | Updated: September 10, 2015 01:23 IST

ऊस नियामक मंडळाच्या बैठकीत निर्णय

कोल्हापूर : रंगराजन समितीच्या शिफारशीप्रमाणे ७०-३० फॉर्म्युल्यानुसार काही साखर कारखान्यांचा अंंतिम दर ‘एफआरपी’पेक्षा कमी बसत असल्याने गत २०१४-१५ या हंगामासाठी ‘एफआरपी’ हाच अंतिम दर म्हणून निश्चित करावा, असा निर्णय बुधवारी मुंबईत झालेल्या ऊस नियामक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. अंतिम दर एफआरपीपेक्षा किती जादा देतो येतो, हे ठरविणे ऊस नियामक मंडळाचे मूळ काम आहे. रंगराजन समितीच्या शिफारशीनुसार उत्पन्नातील ७०-३० च्या फॉर्म्युल्याप्रमाणे अंतिम दर ठरविणे गरजेचे होते; पण अनेक साखर कारखान्यांचा या फॉर्म्युल्यानुसार एफआरपीपेक्षा कमी दर बसतो. त्यामुळे गत हंगामाचा अंतिम दर हा एफआरपीएवढाच निश्चित करण्यात आला. गत हंगामात साखरेचे दर पडल्यानंतर सरकारने हंगाम संपताना कच्च्या साखर निर्यातीचा निर्णय घेतला. त्याचा फायदा कारखान्यांना झाला नाही. या हंगामात केंद्र सरकारने अगोदरच ४० लाख टन कच्च्या साखर निर्यातीचा निर्णय घ्यावा, जेणेकरून साखर कारखान्यांना कच्च्या साखरेचे नियोजन करता येईल. परिणामी बाजारात साखरेचे दर २८०० ते २९०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत जाण्यास मदत होणार आहे. साखरेला दर चांगला मिळाला तर एफआरपी देण्यामध्ये कोणतीच अडचणयेणार नाही. यासाठी कच्च्या साखरेच्या निर्यातीचा निर्णय त्वरित घ्यावा, अशी शिफारसही राज्य व केंद्र सरकारला करण्यात येणार आहे. रंगराजन समितीच्या शिफारशीप्रमाणे दोन साखर कारखान्यांमधील हवाई अंतराचा मुद्दा आता गौण झाला आहे; पण आघाडी सरकारने २५ किलोमीटरची अट कायम ठेवली आहे. महायुतीच्या सरकारने याबाबत पुनर्विचार करावा, अशी मागणीही या बैठकीत करण्यात आली. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर साखर कारखाने लवकर सुरू करावेत, यासाठी मंत्री समितीची बैठक लवकर बोलवावी, अशी सूचनाही प्रतिनिधींनी बैठकीत केली. कृषिमूल्य आयोगानुसार १६० रुपये तोडणी-वाहतूक खर्च अपेक्षित आहे. एवढा कमी खर्च राहू दे; पण व्यावहारिक खर्च एफआरपीमधून वजा करावा. तोडणी-वाहतूक खर्चात मनमानी चालणार नाही, असे शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी ठणकावून सांगितले. थकलेली एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना व्याजासह द्यावी, कमी दराने विकलेल्या साखरेची चौकशी करावी, अशा मागण्याही यावेळी करण्यात आल्या. बैठकीला राज्याचे मुख्य सचिव खत्री, साखर आयुक्त विपीन शर्मा, सहकार सचिव शैलेंद्रकुमार शर्मा, वित्त विभागाचे वरिष्ठ अधिकारी कुंटे, राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष जयप्रकाश दांडेगांवकर, खासदार राजू शेट्टी, रघुनाथदादा पाटील, पृथ्वीराज जाचक, आदी उपस्थित होते. ...अन्यथा गाळप परवाने न देण्याची शिफारस मागील एफआरपीप्रमाणे देय रक्कम दिल्याशिवाय आगामी हंगामासाठी गाळप परवाने देऊ नयेत, अशी शिफारसही या मंडळाने सरकारला केली आहे.