शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
3
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
4
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
5
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
6
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
7
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
8
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
10
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
11
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
12
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
13
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
14
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
15
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
16
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
17
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
18
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
19
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
20
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश

७ वर्षांत केवळ ७० रुपये वाढली एफआरपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:27 IST

काेल्हापूर : शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू. उत्पादनाखर्चापेक्षा ५० टक्के अधिकचा नफा देऊ असे सांगत केंद्रात सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने ...

काेल्हापूर : शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू. उत्पादनाखर्चापेक्षा ५० टक्के अधिकचा नफा देऊ असे सांगत केंद्रात सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने सात वर्षांत केवळ ७० रुपयांची एफआरपी वाढविली आहे. याउलट खतांच्या, औषधांच्या किंमती मात्र दुपटीने वाढविल्या. त्यामुळे आता ऊस पिकवायचा की नाही तेवढे सांगा, म्हणण्याची वेळ आली आहे.

इंधन, खते, औषधे यांच्या भरमसाट वाढलेल्या किमती पाहता एफआरपीत किमान २०० रुपये वाढ मिळेल, अशी अपेक्षा होती; पण मिळालेली ५० रुपयांची वाढ पाहिल्यावर राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला, अशीच काहीशी गत ऊस उत्पादकांची झाली आहे. ही एफआरपी पाहून लॉकडाऊन आणि महापुरामुळे पिचलेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखेच असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

उसाच्या उत्पादन खर्चात गेल्या वर्षभरात भरमसाट वाढ झाली आहे. ट्रॅक्टर, बैलजोडीच्या मशागतीच्या खर्चात प्रतिएकर तीन हजारांनी वाढ झाली आहे. पेट्रोल, डिझेलच्या दरात लिटरमागे ३५ ते ४० रुपयांनी वाढ झाल्याने त्यावर अवलंबून असणारे सर्व बजेटच बिघडले आहे. बियाण्यांच्या किमतीत टनामागे दीड ते दोन हजारांनी वाढ झाली आहे. शेणखत, कंपाेस्ट खतही ट्रॉलीमागे दोन हजारांनी वाढले आहे. ६०० रुपयांना एक पोते मिळणारे पोटॅश आता ९०० वर गेले आहे. डीएपीसह अन्य संयुक्त व मिश्र खते प्रत्येकी गोणीमागे ३०० रुपयांनी वाढली आहेत. कीटकनाशके, सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या किमतीही गगनाला भिडल्या आहेत. एवढे सगळे करून ऊस पीक जोमदार आणले तर पुन्हा अतिवृष्टी, महापूर याचे संकट समोर आहेच. त्यातूनही वाचले तर पुढे तोडणीच्या वेळी साखर कारखानदार व तोडणी यंत्रणेकडून शेतकऱ्यांची होणारी लूट पाहिली तर उसाची लागणच नको या मानसिकतेपर्यंत शेतकरी पाेहोचला आहे.

चौकट

केंद्र सरकारने बुधवारी येत्या हंगामासाठी प्रतिक्विंटल पाच रुपये याप्रमाणे प्रतिटन २९० रुपये एफआरपी जाहीर केली. गेल्या वर्षीपेक्षा यात केवळ किलोला ५ पैसे, क्विंटलला ५ रुपये तर टनाला ५० रुपये वाढ मिळणार आहे.

चौकट

वर्षनिहाय मिळालेली एफआरपी (रुपयांत)

२०१४ : २२०

२०१५: २३०

२०१६ : २३०

२०१७ : २५५

२०१८: २७५

२०१९ : २७५

२०२० : २८५

२०२१ : २९०

चौकट

रिकव्हरी बेसचाही फटका

एफआरपीत वाढ होत नाही, त्यातच एफआरपीसाठी उताऱ्याचा बेस गेल्या वर्षीपासून ८.५ टक्क्यांवरून १० टक्क्यांवर नेण्यात आला. म्हणजेच दीड टक्का उताऱ्याचे नुकसान शेतकऱ्यांना सोसावे लागले. हा टक्का शेतकऱ्यांना प्रतिटन ४०० ते ५०० रुपयांना घेऊन बुडला आहे.

प्रतिक्रिया

कृषिमूल्य आयोगाने दिलेल्या उत्पादनखर्चाच्या आकडेवारीवर एफआरपी निश्चित केली जाते, असे सरकार म्हणते. आयोग हादेखील सरकारचाच भाग आहे. एकाच सरकारच्या दोन्ही बाजू असतानाही एकमेकांकडे बोट दाखवून शेतकऱ्यांशी खेळणे बंद करायला हवे. नाही तर हेच शेतकरी या दोन्ही यंत्रणांना गाडल्याशिवाय राहणार नाहीत.

- के. एम. पाटील, निलजी, गडहिंग्लज