शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

७ वर्षांत केवळ ७० रुपये वाढली एफआरपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:27 IST

काेल्हापूर : शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू. उत्पादनाखर्चापेक्षा ५० टक्के अधिकचा नफा देऊ असे सांगत केंद्रात सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने ...

काेल्हापूर : शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू. उत्पादनाखर्चापेक्षा ५० टक्के अधिकचा नफा देऊ असे सांगत केंद्रात सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने सात वर्षांत केवळ ७० रुपयांची एफआरपी वाढविली आहे. याउलट खतांच्या, औषधांच्या किंमती मात्र दुपटीने वाढविल्या. त्यामुळे आता ऊस पिकवायचा की नाही तेवढे सांगा, म्हणण्याची वेळ आली आहे.

इंधन, खते, औषधे यांच्या भरमसाट वाढलेल्या किमती पाहता एफआरपीत किमान २०० रुपये वाढ मिळेल, अशी अपेक्षा होती; पण मिळालेली ५० रुपयांची वाढ पाहिल्यावर राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला, अशीच काहीशी गत ऊस उत्पादकांची झाली आहे. ही एफआरपी पाहून लॉकडाऊन आणि महापुरामुळे पिचलेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखेच असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

उसाच्या उत्पादन खर्चात गेल्या वर्षभरात भरमसाट वाढ झाली आहे. ट्रॅक्टर, बैलजोडीच्या मशागतीच्या खर्चात प्रतिएकर तीन हजारांनी वाढ झाली आहे. पेट्रोल, डिझेलच्या दरात लिटरमागे ३५ ते ४० रुपयांनी वाढ झाल्याने त्यावर अवलंबून असणारे सर्व बजेटच बिघडले आहे. बियाण्यांच्या किमतीत टनामागे दीड ते दोन हजारांनी वाढ झाली आहे. शेणखत, कंपाेस्ट खतही ट्रॉलीमागे दोन हजारांनी वाढले आहे. ६०० रुपयांना एक पोते मिळणारे पोटॅश आता ९०० वर गेले आहे. डीएपीसह अन्य संयुक्त व मिश्र खते प्रत्येकी गोणीमागे ३०० रुपयांनी वाढली आहेत. कीटकनाशके, सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या किमतीही गगनाला भिडल्या आहेत. एवढे सगळे करून ऊस पीक जोमदार आणले तर पुन्हा अतिवृष्टी, महापूर याचे संकट समोर आहेच. त्यातूनही वाचले तर पुढे तोडणीच्या वेळी साखर कारखानदार व तोडणी यंत्रणेकडून शेतकऱ्यांची होणारी लूट पाहिली तर उसाची लागणच नको या मानसिकतेपर्यंत शेतकरी पाेहोचला आहे.

चौकट

केंद्र सरकारने बुधवारी येत्या हंगामासाठी प्रतिक्विंटल पाच रुपये याप्रमाणे प्रतिटन २९० रुपये एफआरपी जाहीर केली. गेल्या वर्षीपेक्षा यात केवळ किलोला ५ पैसे, क्विंटलला ५ रुपये तर टनाला ५० रुपये वाढ मिळणार आहे.

चौकट

वर्षनिहाय मिळालेली एफआरपी (रुपयांत)

२०१४ : २२०

२०१५: २३०

२०१६ : २३०

२०१७ : २५५

२०१८: २७५

२०१९ : २७५

२०२० : २८५

२०२१ : २९०

चौकट

रिकव्हरी बेसचाही फटका

एफआरपीत वाढ होत नाही, त्यातच एफआरपीसाठी उताऱ्याचा बेस गेल्या वर्षीपासून ८.५ टक्क्यांवरून १० टक्क्यांवर नेण्यात आला. म्हणजेच दीड टक्का उताऱ्याचे नुकसान शेतकऱ्यांना सोसावे लागले. हा टक्का शेतकऱ्यांना प्रतिटन ४०० ते ५०० रुपयांना घेऊन बुडला आहे.

प्रतिक्रिया

कृषिमूल्य आयोगाने दिलेल्या उत्पादनखर्चाच्या आकडेवारीवर एफआरपी निश्चित केली जाते, असे सरकार म्हणते. आयोग हादेखील सरकारचाच भाग आहे. एकाच सरकारच्या दोन्ही बाजू असतानाही एकमेकांकडे बोट दाखवून शेतकऱ्यांशी खेळणे बंद करायला हवे. नाही तर हेच शेतकरी या दोन्ही यंत्रणांना गाडल्याशिवाय राहणार नाहीत.

- के. एम. पाटील, निलजी, गडहिंग्लज