शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

नव्या मुख्य न्यायाधीशांसमोर सर्किट बेंचबाबत बाजू मांडू

By admin | Updated: September 10, 2015 01:27 IST

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश जेव्हा नियुक्त होतील, तेव्हा त्यांच्यासमोर राज्य सरकारतर्फे कोल्हापूरच्या सर्किट बेंचच्या मागणीबाबत बाजू मांडली जाईल, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात व्हावे, ही राज्य सरकारची भूमिका आहे. त्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठराव करून तो मुख्य न्यायाधीशांकडे पाठविला होता. तसेच एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्याची ग्वाहीही ठरावात दिली होती. त्यामुळे राज्य सरकारने कोल्हापूरकरांना दिलेल्या ‘शब्दा’प्रमाणे आपली भूमिका पार पाडली आहे; परंतु मुख्य न्यायाधीश मोहित शहा यांनी सर्व न्यायाधीशांसमोर हा विषय ठेवला होता. कोल्हापूरला सर्किट बेंचची आवश्यकता नाही, असे त्यांचे मत आहे. सरकार आता नवीन मुख्य न्यायाधीश जेव्हा नियुक्त होतील, तेव्हा ही मागणी पुन्हा त्यांच्यासमोर मांडेल, असे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले. कोल्हापूरला सर्किट बेंच व्हावे ही सरकारची स्पष्ट भूमिका असून ती पार पाडलेली आहे. यापुढेही ती पार पाडली जाईल. कोल्हापूरच्या सर्किट बेंचचा निर्णय झाला तेव्हा पुणे, अमरावती शहराचीही मागणी पुढे आली होती; परंतु मंत्रिमंडळ बैठकीत कोल्हापूरसाठीचा ठराव केला, असे पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)