शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चाने ‘गोंधळ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 18:23 IST

कोल्हापूर जिल्हा गोंधळी, जोशी, वासुदेव, बागडी समाज मंडळाच्यावतीने सोमवारी आपल्या विविध मागण्यांसाठी विराट मोर्चा काढत शासनाला जाग आणण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘आई-दादा उदं-उदं बोला’ अशा सुरात संभाळ वाद्यांसह गोंधळ घातला.

ठळक मुद्देगोंधळी, जोशी, वासुदेव, बागडी समाजाचा मोर्चा मागण्या मान्य न झाल्यास मंत्रालयावर धडक

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा गोंधळी, जोशी, वासुदेव, बागडी समाज मंडळाच्यावतीने सोमवारी आपल्या विविध मागण्यांसाठी विराट मोर्चा काढत शासनाला जाग आणण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘आई-दादा उदं-उदं बोला’ अशा सुरात संभाळ वाद्यांसह गोंधळ घातला.

शासनाने मागण्या मान्य न केल्यास भविष्यात राज्यभरातून मंत्रालयावर मोर्चा काढण्याचाही इशारा यावेळी देण्यात आला. समाज मंडळाचे अध्यक्ष व इचलकरंजीचे माजी नगराध्यक्ष सुभाष भोजणे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चात महिलांचा सहभाग लक्षणीय होता. मोर्चाला शिवसेनेच्या जिल्ह्यातील आमदार व नेत्यांनी उपस्थित राहून पाठिंबा दर्शविला.मोर्चाला दसरा चौकातून प्रारंभ झाला. मोर्चा व्हिनस कॉर्नर, असेंब्ली रोड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. मोर्चामध्ये गोंधळी समाजाच्यावतीने शासनाला जाग आणण्यासाठी संभाळ वाद्यासह ‘उदं गं अंबे’चा गजर संपूर्ण मार्गावर केला. गोंधळी वाद्याच्या तालावर नाचत सहभागी झाले होते. मोर्चात प्रत्येकजण डोक्यावर ‘आम्ही गोंधळी’ लिहिलेल्या भगव्या टोप्या परिधान करून, खांद्यावर भगवे, लाल-पिवळे झेंडे घेऊन सहभागी झाले होते. अनेकांच्या हातात मागण्यांचे फलक झळकत होते.मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यावर तेथे समाज मंडळाचे अध्यक्ष सुभाष भोजणे यांनी, समाजाच्या मागण्या मान्य न केल्यास भविष्यात मंत्रालयावर मोर्चा काढण्यासाठी एकजुटीने सज्ज रहा, असे आवाहन केले. कार्याध्यक्ष बबन कावडे यांनीही, सरकारवर टीका करीत मागण्या मान्य करण्यासाठी प्रसंगी पायातील हातात घेण्याची वेळ सरकारने आणू नये, असाही इशारा दिला.आमदार सुजित मिणचेकर यांनी, समाजाच्या मागण्यांबाबत शिवसेनेचे सर्व आमदार, नेते तुमच्या पाठीशी असून, अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून आवाज उठविण्याची ग्वाही दिली. आमदार राजेश क्षीरसागर आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धैयशील माने हेही मोर्चात सहभागी झाले होते. शिष्ठमंडळाच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना निवेदन दिले.मोर्चात, अध्यक्ष सुभाष भोजणे, कार्याध्यक्ष बबन कावडे, अभिजित गजगेश्वर, बाळासाहेब काळे, महेश भिसे, विजय काळे, परिवहन सभापती राहुल चव्हाण, नगरसेवक दिलीप पवार, इचलकरंजीच्या नगरसेविका लक्ष्मीबाई धातुंडे, उदय धातुंडे, रत्नाकर विटेकरी, बाळासाहेब धुमाळ, शंकर धातुंडे, सदाशिव सरवदे, अभिजित भिसे, कल्पना जोशी, आदी सहभागी झाले होते.

डोक्यावर भांडी, पिंजऱ्यात पोपटजोशी समाजाचा फिरून भांडी विक्रीचा व्यवसाय असल्याने मोर्चात डोक्यावर बुट्टीत भांडी घेऊन अनेक महिला सहभागी झाल्या होत्या, तर पोपटांचे पिंजरे डोक्यावर घेऊन पुरुष मोर्चात सहभागी झाले होते.

पारंपरिक वेशात गोंधळी, वासुदेवमोर्चात गोंधळी समाजाचे कार्यकर्ते गळ्यात कवड्यांची माळ, डोक्यावर पगडी, अंगात लाल झब्बा, अशा गणवेशात संभाळ वाद्य वाजवत सहभागी झाले होते. वासुदेव समाजाचे कार्यकर्ते डोक्यावर मोरपिसांची पगडी, हातात लटकणारी टाळ वाजवत, पांढऱ्या गणवेशात सहभागी झाले होते.

मागण्या

  1. भारत सरकार नियुक्त व दादा इदाते आयोग समितीची शिफारशी लागू करा.
  2. गोंधळी, जोशी, वासुदेव, बागडी समाजाची जातनिहाय जनगणना करावी.
  3. एससी, एसटीच्या धर्तीवर भटक्या विमुक्तांसाठी स्वतंत्र तिसरी सूची कायमस्वरूपी आयोगाला घटनात्मक दर्जा द्यावा.
  4.  जातीच्या दाखल्यासाठी १९६१ पूर्वी दाखल्याची अट रद्द करून शासन जीआर २००८ प्रमाणे पुनर्जिवित करावे.
  5. शासकीय गायरानच्या जमिनी गोंधळी, जोशी, वासुदेव, बागडी समाजासाठी घरकुल योजनेला द्याव्यात.
  6.  गोंधळी, जोशी, वासुदेव, बागडी समाजाला २.५ टक्के आरक्षण असून, ते आता जनगणनेच्या प्रमाणात वाढवून मिळावे.
  7. भटक्या विमुक्त जाती जमातीसाठी क्रिमिलर अट सरसकट रद्द करावी.

 

 

टॅग्स :Morchaमोर्चाkolhapurकोल्हापूर