शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

मित्र धावले, माणुसकीचा धागा केला घट्ट; रस्त्यावर बाटल्या गोळा करून जगणाऱ्या वर्गमित्राला दिलं नवं जीवन

By विश्वास पाटील | Updated: July 18, 2022 11:35 IST

विवेक अत्यंत हुशार. कोल्हापुरातील नामांकित हॉटेलमध्ये व्यवस्थापक होते. चांगले सुंदर आयुष्य सुरू होतं; परंतु काही कारणांतून व आर्थिक फसवणुकीतून वैफल्य आले. मनस्थिती बिघडली.

विश्वास पाटीलकोल्हापूर : सख्ख्या भावालाही ओळख न दाखविणाऱ्यांची संख्या समाजात वाढू लागली असताना रस्त्यावर काचेच्या बाटल्या गोळा करून पोट भरणाऱ्या व जेम्सस्टोन व्यापारी संकुलाच्या पायरीवर गेली अनेक दिवस झोपणाऱ्या शाळेतील ३३ वर्षांपूर्वीच्या वर्गमित्राला नवे जीवन देण्याचा प्रयत्न येथील सेंट झेविअर्स शाळेतील १९८९ च्या बॅचमधील मित्रांनी सुरू केला आहे. विवेक चिटणीस (वय ४९, रा. मूळ राजारामपुरी), असे त्या मित्राचे नाव आहे. सध्या त्यांना सावली केअर सेंटरमध्ये ठेवले आहे.विवेकचा शोध आणि त्यांना पुन्हा जीवनात उभे करण्याची मित्रांची धडपड याला समाजाने सलामच करायला हवा. मित्रच मित्रासाठी काय करू शकतात याचे हे जगात भारी उदाहरण कोल्हापूरने घालून दिले आहे. त्यातून माणुसकीचा धागाच अधिक बळकट झाला. हे सगळे रविराज निंबाळकर, अमर क्षीरसागर, तुषार पाटील, अभिजित भोसले, शिरीष पाटील, प्रदीप मुदलियार व इतर मित्रांनी मित्रासाठी केले. जे घडले ते सारेच अचंबित करणारे.विवेक चिटणीस हे सेंट झेविअर्सचे माजी विद्यार्थी. वर्गात अत्यंत हुशार. त्यांचे आई व भाऊ सध्या अमेरिकेत. विवेक स्वत: कोल्हापुरातील नामांकित हॉटेलमध्ये व्यवस्थापक होते. चांगले सुंदर आयुष्य सुरू होतं; परंतु काही कारणांतून व आर्थिक फसवणुकीतून वैफल्य आले. मनस्थिती बिघडली. नोकरीही सोडली. रस्त्यावरील रिकाम्या बाटल्या गोळा करून त्या विकायच्या व मिळेल ते पोटाला खावून जगायचे असा दिनक्रम.चार-पाच दिवसांपूर्वी रविराज निंबाळकर यांना ते दाभोळकर कॉर्नरला पाठीवर पोते घेऊन बाटल्या गोळा करताना आढळले. त्यांचा विश्वासच बसला नाही. त्यांनी शाहूपुरी पोलिसांकडे जाऊन सीसीटीव्ही फुटेज पाहिले. ते बॅचच्या ग्रुपवर शेअर केले. शुक्रवारी दुपारी विवेक दामिनी हॉटेलच्या दारातून निघालेले तुषार पाटील यांना दिसले. त्यांनी त्यांची पाठ सोडली नाही. कनाननगरच्या कोपऱ्यावर थांबल्यावर त्यांनी मोबाइलवर फोटो घेतले व ते ग्रुपवर शेअर केले.पुढच्या काही मिनिटांत आठ-दहा मित्र लगेच गोळा झाले. रविराज यांनी विवेकशी संवाद साधल्यावर त्यांनी सगळ्यांना ओळखले. हस्तांदोलनही केले. लगेच त्याला मित्रांनी खाऊ घातले. मानसिक आधार दिला. आधीच नियोजन केल्यानुसार सावलीमध्ये नेऊन दाखल केले. मित्रांनीच त्याच्यासाठी नवे कपडे घेऊन दिले. त्यांच्यासाठी आता नोकरीचा शोध सुरू आहे. एक भरकटलेले आयुष्य पुन्हा मित्रप्रेमामुळे नव्याने फुलत आहे.

डोळ्यात पाणी...तुम्ही माझ्या आयुष्यात देव म्हणून आलात..नाही तर मी जीवनाला पार वैतागलो होतो रे..पंचगंगा नदीत उडी घेऊन मी जीवन संपवणार होतो..उद्याचा माझा दिवस शेवटचाच होता अशा भावना मित्र भेटल्यावर विवेकने व्यक्त केल्या आणि सर्वच वर्गमित्रांच्या डोळ्यांत पाणी आले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर