शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Election 2026: "राज ठाकरेंची भाषणं भारी, पण कामाच्या नावानं पाटी कोरी" असं कुणी म्हटलं? 
2
भाईंदरमध्ये आचार संहितेचा भंग, आठ दिवसानंतर गुन्हा दाखल, लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट!
3
Pakistan Accident: पाकिस्तानमध्ये भीषण अपघात; खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या बसची व्हॅनला धडक, १५ जणांचा मृत्यू
4
'लोकपाल'साठी आता ५ कोटी रुपयांच्या बीएमडब्ल्यू कार खरेदी केल्या जाणार नाहीत; निविदा केल्या रद्द
5
Nagpur: सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांना महापालिकेचा दणका; एकाच दिवसात ४४ जणांवर कारवाई!
6
Google: नव्या वर्षात गुगल पिक्सेल १० खरेदी करा आणखी स्वस्तात; फ्लिपकार्टची जबरदस्त ऑफर्स!
7
"उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा, नाहीतर..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचा इशारा
8
Nagpur: पूर्व नागपुरात ‘तूतू-मैमै’, खोपडे पिता-पुत्र आमदार वंजारींवर बरसले
9
इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
10
दुर्गापूजा, जन्माष्टमी, सरस्वती पूजन... सगळ्या सुट्या रद्द ! बांग्लादेशमध्ये हिंदूंवर आघात
11
Switzerland Blast: स्वित्झर्लंडमधील बारमधील स्फोट, दहशतवादी हल्ला की आणखी काही? पोलिसांनी केला मोठा खुलासा; आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू
12
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सिद्धीविनायकाचे घेतले दर्शन, पाहा फोटो
13
रोहित–विराटच्या निवृत्तीनंतर वनडे क्रिकेटच संपणार? अश्विन म्हणाला, FIFA फॉर्म्युलाच ठरेल 'तारणहार'
14
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
15
Viral Video: स्टेडियमला पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंवर आली टॅक्सीला धक्का मारण्याची वेळ
16
Jammu and Kashmir Champions League: भारतीय क्रिकेटपटूच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज, पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं, कोण आहे तो?
17
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
18
तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी 
19
Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!
20
सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

फसवणुकीस अधिकारीच जबाबदार : आयडीबीआयच्या अधिकाऱ्यांची सोमवारी चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 00:44 IST

पीक व पाईपलाईन कर्ज योजनेच्या नावाखाली बनावट सातबारा उतारे देऊन झालेल्या फसवणुकीस स्वत: ‘आयडीबीआय’ बँकेचा व्यवहारच कारणीभूत असल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले. कारण या सर्व व्यवहारांत बँकेने आधी कर्जवाटप केले व त्यानंतर संबंधित शेतकºयांच्या खात्यावर बोजा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू केली;

ठळक मुद्देबोजा नोंद न करता पीक कर्जवाटपपरंतु या प्रकरणी गावाची नाहक बदनामी होत असल्याची ग्रामस्थांची भावना

- विश्वास पाटील ।कोल्हापूर : पीक व पाईपलाईन कर्ज योजनेच्या नावाखाली बनावट सातबारा उतारे देऊन झालेल्या फसवणुकीस स्वत: ‘आयडीबीआय’ बँकेचा व्यवहारच कारणीभूत असल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले. कारण या सर्व व्यवहारांत बँकेने आधी कर्जवाटप केले व त्यानंतर संबंधित शेतकºयांच्या खात्यावर बोजा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू केली; परंतु कर्जाची नोंद संबंधित शेतकºयांच्या सातबारा उताºयावर झालेलीच नाही. त्यामुळे ही रक्कम वसूल होण्याची शक्यताही धूसर आहे.

या प्रकरणी बँकेच्या वरणगे (ता. करवीर) शाखेचे तत्कालीन व्यवस्थापक जयंत गंधे व बँक अधिकारी मनोजकुमार बोरसे यांना चौकशीसाठी सोमवारी (ता. २२) बोलाविले असल्याचे तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक अरविंद कांबळे यांनी सांगितले.या प्रकरणी म्हालसवडे येथील एकाच प्रकरणात राजाराम दादू पाटील व सुमित राजाराम पाटील यांना अटक करण्यात आली. त्यांना १५ तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. २३ लाखांच्या फसवणूकप्रकरणी एकाच कुटुंबातील सहाजणांवर गुन्हा दाखल झाला आहे.पीक कर्ज व्यवहारात शेतकºयाला तशी सहजासहजी फसवणूक करता येत नाही.

कारण त्याची प्रक्रिया क्लिष्ट असते. कर्जदार शेतकºयाने बँकेकडे कर्जमागणी केली व कर्ज मंजूर झाले तर बँक संबंधित शेतकºयाच्या सातबारा उताºयास इतर हक्कात नोंद करून आणावी, असे पत्र देते. रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार ज्यांचे पीक व इतर मध्यम मुदतीचे कर्ज एक लाखापेक्षा जास्त आहे, अशाच कर्जाची शेतकºयाच्या सातबारा उताºयावर नोंद होते. तसे हजार-दीड हजार रुपयांच्या स्टॅम्पवर प्रतिज्ञापत्र करून द्यावे लागते. तलाठ्याने दाखला दिल्यानंतरच बँक संबंधिताच्या खात्यावर पैसे वर्ग करते. परंतु या प्रकरणात बहुतांश प्रक्रिया धाब्यावर बसवूनच कर्जवाटप झाल्याचे चौकशीत पुढे आले आहे.आरळेचा संतोष पाटील फरारया प्रकरणातील सूत्रधार असलेल्या संतोष बळवंत पाटील (रा. आरळे) हा फरार आहे. राजाराम पाटील यांची एकत्रित कुटुंबाची १५ एकर जमीन आहे. त्यातील राजाराम पाटील याच्या नावावर प्रत्यक्षात साडेचार एकर जमीन असताना उतारे मात्र ३० एकर क्षेत्राचे दिले आहेत. हा उद्योग संतोष पाटील याने केल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. त्यापोटी त्याला दोन लाख रुपये कमिशन मिळाल्याचे चौकशीत पुढे आले आहे.शाखेमुळे वरणगेची बदनामीआयडीबीआय बँकेची शाखा वरणगे असली तरी वरणगेतील शेतकºयांनी फसवणूक केल्याचे आतापर्यंत तरी कुठेही चौकशीत पुढे आलेले नाही; परंतु या प्रकरणी गावाची नाहक बदनामी होत असल्याची ग्रामस्थांची भावना आहे.तलाठ्याचे शिक्के तयारकोणत्याही गावाच्या तलाठ्याचाच काय, तहसीलदारांचाही गोल शिक्का आता चार तासांत तयार करून मिळत असल्याचे महसूल विभागातीलच सूत्रांनी सांगितले. तलाठ्यांकडे जे उमेदवार म्हणून काम करतात, ते तलाठ्यांंची सही मारून दाखले वाटतात अशा तक्रारी आहेत. लोकमतने चौकशी केल्यावर ‘तुम्हाला कोणत्या गावच्या तलाठ्याचा शिक्का पाहिजे ते सांगा; तासात आणून देतो,’ असे एकाने छातीठोकपणे सांगितले !

 

टॅग्स :bankबँकfraudधोकेबाजीkolhapurकोल्हापूर