शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
2
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
3
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
4
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
6
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
7
सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय
8
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
9
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
10
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
11
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
12
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
13
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
14
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
15
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
16
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
17
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
18
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
19
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
20
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 

फसवणुकीस अधिकारीच जबाबदार : आयडीबीआयच्या अधिकाऱ्यांची सोमवारी चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 00:44 IST

पीक व पाईपलाईन कर्ज योजनेच्या नावाखाली बनावट सातबारा उतारे देऊन झालेल्या फसवणुकीस स्वत: ‘आयडीबीआय’ बँकेचा व्यवहारच कारणीभूत असल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले. कारण या सर्व व्यवहारांत बँकेने आधी कर्जवाटप केले व त्यानंतर संबंधित शेतकºयांच्या खात्यावर बोजा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू केली;

ठळक मुद्देबोजा नोंद न करता पीक कर्जवाटपपरंतु या प्रकरणी गावाची नाहक बदनामी होत असल्याची ग्रामस्थांची भावना

- विश्वास पाटील ।कोल्हापूर : पीक व पाईपलाईन कर्ज योजनेच्या नावाखाली बनावट सातबारा उतारे देऊन झालेल्या फसवणुकीस स्वत: ‘आयडीबीआय’ बँकेचा व्यवहारच कारणीभूत असल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले. कारण या सर्व व्यवहारांत बँकेने आधी कर्जवाटप केले व त्यानंतर संबंधित शेतकºयांच्या खात्यावर बोजा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू केली; परंतु कर्जाची नोंद संबंधित शेतकºयांच्या सातबारा उताºयावर झालेलीच नाही. त्यामुळे ही रक्कम वसूल होण्याची शक्यताही धूसर आहे.

या प्रकरणी बँकेच्या वरणगे (ता. करवीर) शाखेचे तत्कालीन व्यवस्थापक जयंत गंधे व बँक अधिकारी मनोजकुमार बोरसे यांना चौकशीसाठी सोमवारी (ता. २२) बोलाविले असल्याचे तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक अरविंद कांबळे यांनी सांगितले.या प्रकरणी म्हालसवडे येथील एकाच प्रकरणात राजाराम दादू पाटील व सुमित राजाराम पाटील यांना अटक करण्यात आली. त्यांना १५ तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. २३ लाखांच्या फसवणूकप्रकरणी एकाच कुटुंबातील सहाजणांवर गुन्हा दाखल झाला आहे.पीक कर्ज व्यवहारात शेतकºयाला तशी सहजासहजी फसवणूक करता येत नाही.

कारण त्याची प्रक्रिया क्लिष्ट असते. कर्जदार शेतकºयाने बँकेकडे कर्जमागणी केली व कर्ज मंजूर झाले तर बँक संबंधित शेतकºयाच्या सातबारा उताºयास इतर हक्कात नोंद करून आणावी, असे पत्र देते. रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार ज्यांचे पीक व इतर मध्यम मुदतीचे कर्ज एक लाखापेक्षा जास्त आहे, अशाच कर्जाची शेतकºयाच्या सातबारा उताºयावर नोंद होते. तसे हजार-दीड हजार रुपयांच्या स्टॅम्पवर प्रतिज्ञापत्र करून द्यावे लागते. तलाठ्याने दाखला दिल्यानंतरच बँक संबंधिताच्या खात्यावर पैसे वर्ग करते. परंतु या प्रकरणात बहुतांश प्रक्रिया धाब्यावर बसवूनच कर्जवाटप झाल्याचे चौकशीत पुढे आले आहे.आरळेचा संतोष पाटील फरारया प्रकरणातील सूत्रधार असलेल्या संतोष बळवंत पाटील (रा. आरळे) हा फरार आहे. राजाराम पाटील यांची एकत्रित कुटुंबाची १५ एकर जमीन आहे. त्यातील राजाराम पाटील याच्या नावावर प्रत्यक्षात साडेचार एकर जमीन असताना उतारे मात्र ३० एकर क्षेत्राचे दिले आहेत. हा उद्योग संतोष पाटील याने केल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. त्यापोटी त्याला दोन लाख रुपये कमिशन मिळाल्याचे चौकशीत पुढे आले आहे.शाखेमुळे वरणगेची बदनामीआयडीबीआय बँकेची शाखा वरणगे असली तरी वरणगेतील शेतकºयांनी फसवणूक केल्याचे आतापर्यंत तरी कुठेही चौकशीत पुढे आलेले नाही; परंतु या प्रकरणी गावाची नाहक बदनामी होत असल्याची ग्रामस्थांची भावना आहे.तलाठ्याचे शिक्के तयारकोणत्याही गावाच्या तलाठ्याचाच काय, तहसीलदारांचाही गोल शिक्का आता चार तासांत तयार करून मिळत असल्याचे महसूल विभागातीलच सूत्रांनी सांगितले. तलाठ्यांकडे जे उमेदवार म्हणून काम करतात, ते तलाठ्यांंची सही मारून दाखले वाटतात अशा तक्रारी आहेत. लोकमतने चौकशी केल्यावर ‘तुम्हाला कोणत्या गावच्या तलाठ्याचा शिक्का पाहिजे ते सांगा; तासात आणून देतो,’ असे एकाने छातीठोकपणे सांगितले !

 

टॅग्स :bankबँकfraudधोकेबाजीkolhapurकोल्हापूर