शहरं
Join us  
Trending Stories
1
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
2
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या
3
आजचे राशीभविष्य- २२ सप्टेंबर २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास! आर्थिक लाभ होणार
4
ट्रम्प हे मित्र की शत्रू..अमेरिकेच्या २ निर्णयांनी भारताला बसला मोठा फटका; पुढे काय करायला हवं?
5
घोडबंदर भागातील धुमसता असंतोष राजकीय? शिंदेसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपा घालतंय खतपाणी
6
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
7
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
8
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
9
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
10
पाकिस्तानी ‘खेळाडूंना’ जपानमध्ये अटक; परदेशात जाण्यासाठी वापरला वेगळाच अन् अफलातून फंडा
11
राज्य सहकारी बँकेत पती-पत्नीला एकत्र नोकरीला असेल बंदी; विवाहानंतर ६० दिवसांत राजीनामा बंधनकारक
12
जनाब, आपल्या पायाखाली काय जळते ते पाहा...अमेरिकेची चाल, भारताभोवती तयार होतोय धोकादायक त्रिकोण
13
विशिष्ट समुदायासाठी उभारली जाते इमारत; गृहनिर्माण संस्थांना सदस्य निवडीचा अधिकार आहे का?
14
धगधगत्या ज्वालेतून आली जगन्माता, भक्ती दाटते नाव घेता...; कुलस्वामिनीच्या उत्सवाचे विविध रंग
15
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
16
दिवाळीच्या फटाक्यांवर सरसकट बंदीने प्रदूषणाचा प्रश्न सुटेल काय?
17
सुंदर पिचाई, नाडेला यांची ‘अळी मिळी गुपचिळी’ का?; आयटी क्षेत्रात मोठी अस्वस्थता
18
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
19
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
20
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन

ही तर शेतकऱ्यांची फसवणूक! वाढीव हमीभाव : घोषणेबाबत शेतकरी संघटना, नेते आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 00:39 IST

वाढीव हमीभावाची केंद्र सरकारने केलेली घोषणा म्हणजे शेतकºयांची केवळ आणि केवळ फसवणूक आहे, अशा शब्दांत शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी या निर्णयावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे

कोल्हापूर : वाढीव हमीभावाची केंद्र सरकारने केलेली घोषणा म्हणजे शेतकºयांची केवळ आणि केवळ फसवणूक आहे, अशा शब्दांत शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी या निर्णयावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. केंद्र सरकारने बुधवारी ही घोषणा केली होती.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी म्हणाले, भाजपचे नेते आपण शेतकºयांसाठी फार मोठे काम केल्याचे ढोल बडवीत आहेत; परंतु या निर्णयाचे विश्लेषण करण्याची हिंमत या नेत्यांनी दाखवावी; कारण शेतकºयांना केवळ आकड्यांचा भूलभुलैया दाखवून सरकारने फसवणूक केली आहे.

डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असतानाही अशाच पद्धतीने हमीभाव वाढ झाली होती. त्यापेक्षा या सरकारने वेगळे काहीही केलेले नाही. व्हॅट अस्तित्वात आल्यानंतर शेतकºयांच्या अनेक वस्तू त्यामधून वगळल्या गेल्या. मात्र ‘जीएसटी’ची अंमलबजावणी करताना ती दक्षता घेतली नाही. परिणामी, त्याची फळे शेतकºयांना भोगावी लागत आहेत. एकीकडे डिझेलचे भाव वाढले; खताच्या पिशवीचे वजनही ५० किलोंवरून ४५ किलोंवर आणून तिथेही धूळफेक केली. खतांची किंमतही वर्षभरात २० टक्क्यांनी वाढली असताना उत्पादन खर्चाचा विचार न करता ही वाढ जाहीर करण्यात आली आहे. यामुळे शेतकºयांचा काहीही फायदा होणार नाही. वाढीव खर्च देण्याचा निर्णय घेऊन यांनी वेगळे काय केले? शेतकºयांची ही चेष्टा असून शेतकरीच याला चोख उत्तर देतील.

शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील म्हणाले, ही दरवर्षी होणारी वाढ असून त्यालाच ‘दीडपट हमीभाव’ म्हणून शेतकºयांना गंडविण्याचा हा उद्योग आहे. भाताचा हमीभाव १५५० वरून १७५० रुपये केला आहे. वास्तविक भाताचा उत्पादनखर्च ३२५० रुपये असताना त्यावर ५० टक्के नफा गृहीत धरून अधिक १६२५ रुपये धरून ४८७५ रुपये इतका हमीभाव देणे आवश्यक होते; परंतु तसे झालेले नाही. हे केवळ एका धान्याचे उदाहरण आहे.

सर्व पिकांच्या बाबतीत केंद्र सरकारने हेच धोरण स्वीकारून शेतकºयांनी आत्महत्याच कराव्यात, अशी परिस्थिती निर्माण केली आहे. कॉँग्रेसने केलेले अनेक शेतकरीविरोधी कायदे रद्द करू, अशी घोषणाही या सरकारने केली होती. तिचीही कुठे अंमलबजावणी दिसत नाही. उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याचा जाहीरनामा यांनी काढला होता; परंतु केवळ आकड्यांचा खेळ करून त्याला दीडपट हमीभावाचा हा मुलामा देण्यात आला आहे. 

अनेक वर्षांची ही मागणी होती. त्यानुसार हमीभाव जाहीर करण्यात आला. शेतकºयांच्या पदरात यातून जे काही पडेल ते तात्पुरते असेल; परंतु भविष्यात याचे परिणाम चांगले होणार नाहीत. वास्तविक मागणी व पुरवठा या तत्त्वांचा अभ्यास करून बाजारातील तेजी-मंदीचा विचार आवश्यक आहे. शेतकºयांनीही मंदीची तयारी ठेवण्याची गरज आहे. मात्र, राजकारणासाठी केलेली ही घोषणा वास्तवात कितपत फायदेशीर आहे, हे शंकास्पद आहे.- प्रताप चिपळूणकर, प्रगतिशील शेतकरीफरक व दीडपट हमीभावाच्या सूत्राने निघणाारा दर यांतील तफावत शेतकºयांच्या बॅँक खात्यावर थेट भरण्याची व्यवस्था निर्माण करावी; तरच शेतकरी त्यांच्यावर विश्वास ठेवतील; अन्यथा लोकसभेच्या निवडणुकीसाठी ही एक जुमलेबाजी आहे, असेच शेतकरी मानतील.- नामदेव गावडे, भाकप नेतेभाजपचे नेते शेतकºयांसाठी फार मोठे काम केल्याचे ढोल बडवित आहेत. मात्र, आकड्यांचा भूलभुलैया दाखवून फसवणूक केली आहे. - राजू शेट्टी, खासदारदरवर्षी होणाºया वाढीला ‘दीडपट हमीभाव’ म्हणून गंडविण्याचा हा उद्योग आहे. ‘राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला’ अशी परिस्थिती आहे. - रघुनाथ पाटील

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टी