शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

‘दत्त-आसुर्ले’वरून संचालक मंडळात धुसफुस

By admin | Updated: August 9, 2016 00:24 IST

अवसायक काळातील व्याजाबाबत मतभेद : बँक अडचणीत असताना कारखान्यांवर मेहरनजर का ?

कोल्हापूर : आसुर्ले-पोर्ले (ता. पन्हाळा) येथील दत्त सहकारी साखर कारखान्याविरोधात सहकार न्यायालयातील दाखल केलेले दावे मागे घेतल्यावरून जिल्हा बॅँकेच्या संचालक मंडळात धुसफुस सुरू आहे. बॅँक अडचणीत आहे, संस्थांना आठ वर्षे लाभांश मिळत नसताना कारखान्यावर एवढी मेहरनजर कशाबद्दल? असा सवाल एका ज्येष्ठ संचालकाने उपस्थित केला आहे. बँकेचे ८४ कोटी रुपये वसूल झाले असले तरी अवसायन काळातील व्याजाबाबत प्रलंबित असलेले दावे मागे घेऊ नयेत, असा आग्रह होता; पण कार्यकारी समितीने परस्पर निर्णय घेत दावे मागे घेऊन मग संचालक मंडळाच्या सभेपुढे ठेवल्याचा आरोप होत आहे. ‘दत्त’कारखान्याच्या थकीत कर्जापोटी २००६ ला कारखाना अवसायनात काढला. जिल्हा बँकेने थकीत ८४ कोटी रुपयांच्या कर्जासाठी कारखान्याविरोधात सहकार न्यायालयात अनेक याचिका दाखल केल्या होत्या. त्यामध्ये अवसायन काळातील व्याज मिळावे, अशी याचिका होती. बऱ्याच प्रयत्नांनंतर प्रशासक प्रतापसिंह चव्हाण यांनी २०१२ मध्ये कारखान्याचा ताबा घेत १०८ कोटीला ‘दालमिया’ला विक्री करून बॅँकेचे ८४ कोटी वसूल केले. त्यामुळे संचालक मंडळ कार्यरत झाल्यापासून दावे मागे घेण्यासाठी रेटा सुरू होता. दावे मागे घेतल्याने एका ज्येष्ठ संचालकाने नाराजी व्यक्त करत अवसायन काळातील ६० कोटी व्याज होते. सभासदांना एक दमडीही लाभांश दिलेला नसताना कारखान्याच्या संचालक मंडळावर एवढी मेहरनजर कशासाठी, असा सवाल त्यांनी उपस्थित केल्याचे समजते. यावरून संचालक मंडळात धुसफुस सुरू आहे.‘दत्त’च्या कर्जाबाबत प्रशासक काळात ‘एनओसी’ दिलेली आहे. त्यांच्या अवसायक काळातील व्याजाबाबत कायदेशीर सल्ला घेऊन दावे मागे घेतले आहेत. काही संचालकांचे वेगळे मत आहे. त्याबाबत कायदेशीर सल्ला घेऊन पुढील निर्णय घेऊ.- आमदार हसन मुश्रीफ अध्यक्ष, जिल्हा बॅँक