शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘दत्त-आसुर्ले’वरून संचालक मंडळात धुसफुस

By admin | Updated: August 9, 2016 00:24 IST

अवसायक काळातील व्याजाबाबत मतभेद : बँक अडचणीत असताना कारखान्यांवर मेहरनजर का ?

कोल्हापूर : आसुर्ले-पोर्ले (ता. पन्हाळा) येथील दत्त सहकारी साखर कारखान्याविरोधात सहकार न्यायालयातील दाखल केलेले दावे मागे घेतल्यावरून जिल्हा बॅँकेच्या संचालक मंडळात धुसफुस सुरू आहे. बॅँक अडचणीत आहे, संस्थांना आठ वर्षे लाभांश मिळत नसताना कारखान्यावर एवढी मेहरनजर कशाबद्दल? असा सवाल एका ज्येष्ठ संचालकाने उपस्थित केला आहे. बँकेचे ८४ कोटी रुपये वसूल झाले असले तरी अवसायन काळातील व्याजाबाबत प्रलंबित असलेले दावे मागे घेऊ नयेत, असा आग्रह होता; पण कार्यकारी समितीने परस्पर निर्णय घेत दावे मागे घेऊन मग संचालक मंडळाच्या सभेपुढे ठेवल्याचा आरोप होत आहे. ‘दत्त’कारखान्याच्या थकीत कर्जापोटी २००६ ला कारखाना अवसायनात काढला. जिल्हा बँकेने थकीत ८४ कोटी रुपयांच्या कर्जासाठी कारखान्याविरोधात सहकार न्यायालयात अनेक याचिका दाखल केल्या होत्या. त्यामध्ये अवसायन काळातील व्याज मिळावे, अशी याचिका होती. बऱ्याच प्रयत्नांनंतर प्रशासक प्रतापसिंह चव्हाण यांनी २०१२ मध्ये कारखान्याचा ताबा घेत १०८ कोटीला ‘दालमिया’ला विक्री करून बॅँकेचे ८४ कोटी वसूल केले. त्यामुळे संचालक मंडळ कार्यरत झाल्यापासून दावे मागे घेण्यासाठी रेटा सुरू होता. दावे मागे घेतल्याने एका ज्येष्ठ संचालकाने नाराजी व्यक्त करत अवसायन काळातील ६० कोटी व्याज होते. सभासदांना एक दमडीही लाभांश दिलेला नसताना कारखान्याच्या संचालक मंडळावर एवढी मेहरनजर कशासाठी, असा सवाल त्यांनी उपस्थित केल्याचे समजते. यावरून संचालक मंडळात धुसफुस सुरू आहे.‘दत्त’च्या कर्जाबाबत प्रशासक काळात ‘एनओसी’ दिलेली आहे. त्यांच्या अवसायक काळातील व्याजाबाबत कायदेशीर सल्ला घेऊन दावे मागे घेतले आहेत. काही संचालकांचे वेगळे मत आहे. त्याबाबत कायदेशीर सल्ला घेऊन पुढील निर्णय घेऊ.- आमदार हसन मुश्रीफ अध्यक्ष, जिल्हा बॅँक