शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

तळ ठोकलेले पोलीस बाडबिस्तारा उचलणार

By admin | Updated: May 11, 2015 01:07 IST

विनंती बदल्यांचा फॉर्म्युला : अर्ज सादर करण्याचा १५ मे अंतिम दिवस

एकनाथ पाटील / कोल्हापूर अनेक वर्षांपासून एकाच तालुक्यात अथवा पोलीस ठाण्यात तळ ठोकलेल्या पोलिसांच्या बदल्या होणार आहेत. पोलीस प्रशासनाने विनंती बदल्यांचा ‘फॉर्म्युला’ वापरला असून, सेवा बजाविलेला तालुका सोडून इतर कोणत्याही तीन पोलीस ठाण्यांची मागणी पोलिसांना करता येणार आहे. बदल्यांचा धडाका दि. १६ ते ३१ मेअखेर पूर्ण होत असल्याने ठाण्यात ‘वजन मारणाऱ्या’ पोलिसांना लवकरच बाडबिस्तारा उचलावा लागणार आहे. ‘मार्च एंडिंग’ची धांदल संपताच पोलीस प्रशासनात बदल्यांच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. कोल्हापूर पोलीस दलात सुमारे २९०० पोलीस कर्मचारी आहेत, तर जिल्ह्यात २९ पोलीस ठाणी आहेत. यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, वाहतूक शाखा, जिल्हा विशेष शाखा, आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखा, नियंत्रण कक्ष, पोलीस मुख्यालय, आदी ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा जास्त वर्षे सेवा बजाविणाऱ्या पोलिसांच्या बदल्या करण्यात येत आहेत. तसेच २००७ मधील सार्वत्रिक बदलीच्या वेळी ज्यांच्या बदल्या झालेल्या आहेत, त्यांच्याही नियमांनुसार बदल्या करण्यात येणार असल्याने अनेक वर्षे एकाच तालुक्यात अथवा पोलीस ठाण्यात तळ ठोकून बसलेल्या पोलिसांना आपला बिस्तारा उचलावा लागणार आहे. विनंती बदल्यांसाठी अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिवस शुक्रवार (दि. १५) पर्यंत आहे. ज्या पोलीस ठाण्यात यापूर्वी सेवा केली असेल, त्या पोलीस ठाण्याची मागणी करता येणार नाही. तसेच एकाच तालुक्यात यापूर्वी १२ वर्षे सेवा बजावलेली आहे, अशा तालुक्यामध्ये पुन्हा बदलीसाठी अर्ज करता येणार नाही. मागणी केलेल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्याचे गाव नसावे, आदी नियम सक्तीचे करण्यात आले आहेत. १६ मेपासून बदल्यांच्या अर्जांची छाननी होऊन मुलाखती होतील. त्यानंतर ३१ मेअखेर बदल्यांचा टप्पा पूर्ण होईल. सर्वांना माहिती देण्याची सूचना पोलीस ठाण्यातील प्रभारी अधिकाऱ्यांनी आपल्या ठाण्यातील कर्मचाऱ्यांचे अर्ज स्वतंत्र न पाठविता ते एकत्रित करून कार्यालयास सादर करावेत. बदल्यांच्या परिपत्रकाची माहिती सलग तीन दिवस हजेरीवर वाचून दाखवावी तसेच नोटीस बोर्डावर प्रत लावण्यात यावी. जे कर्मचारी आजारी रजेवर किंवा प्रतिनियुक्तीवर असतील, त्यांनाही याची माहिती द्यावी, अशा सूचना पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी केल्या आहेत. —————————————————- ‘कसुरी अहवाल’ ज्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या वर्तनाने खात्याच्या शिस्तीस बाधा येत असेल, अशा पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदलीसाठी ‘कसुरी अहवाल’ सादर करण्याचे आदेश पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना डॉ. शर्मा यांनी दिले आहेत. ‘खात्यां’साठी चढाओढ अतिमहत्त्वाचे खाते म्हणजे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (एलसीबी) व शहर वाहतूक शाखा (ट्रॅफिक). तिथे काम करण्यासाठी अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांत चढाओढ असते. या दोन्ही ठिकाणी सलग तीन वर्षे सेवा पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात येणार आहेत. ही दोन्ही खाती ‘मलईदार’ असल्याने बहुतांश पोलिसांनी या खात्यांना प्राधान्य दिले आहे.