शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

चौथ्यांदा मुदतवाढ तरीही काम ‘जैसे थे’

By admin | Updated: June 17, 2016 00:27 IST

सांगली-कोल्हापूर चौपदरीकरण : दिवसाला दीड लाख दंड आकारूनही सुप्रीम ढिम्मच

दत्ता बिडकर --- हातकणंगले-कोल्हापूर-सांगली रस्ता चौपदरीकरणाचे काम पूर्ण करण्यासाठी ठेकेदार सुप्रीम कंपनीला १0 जूनची चौथी मुदतवाढ देऊनही रस्त्याचे काम ‘जैसे थे’ आहे. अतिग्रे, हातकणंगले, तमदलगे, निमशिरगाव आणि उदगावमधील कामामध्ये कोणत्याही प्रकारची सुधारणा नाही. यामुळे या गावांमधील वाहतुकीची कोंडी आजही कायम आहे. ठेकेदार सुप्रीम कंपनीला दिवसाला दीड लाखाचा दंड आकारला जात असूनही कंपनी ढीम्मच आहे. चौपदरीकरण गेली चार वर्षे कासव गतीने सुरू आहे. चौपदरीकरणामध्ये जमीन आणि घरे गमावलेल्या लाभार्थ्यांना नुकसान भरपाई मिळण्यात महसूल विभागाकडून दिरंगाई झाली. हे कारण पुढे करून ठेकेदार सुप्रीम कंपनीने दोन वर्षे काम धिम्या गतीने सुरू केले. सुप्रीम कंपनीच्या निकृष्ट आणि दर्जाहीन कामाबाबत वारंवार तक्रारी होऊन शासन दरबारी याचा मोठा बोलबाला होऊन सुप्रीम कंपनीच्या कामाचे पडसाद थेट राज्य विधिमंडळामध्ये पोहोचले. २0१६ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या चौपदरीकरणाची दखल घेण्यात आली आणि सुप्रीम कंपनीने वेळत काम पूर्ण केले नसल्याचा ठपका ठेवून दररोज दीड लाख रुपयांचा दंड वसूल करण्याचे आदेश झाले. मात्र, हा दंड कोणी वसूल करायचा याबाबत आजही संभ्रम कायम आहे.सहा महिन्यांपूर्वीची परिस्थिती आजही कायम आहे. अतिग्रे ग्रामस्थांची घरे अद्याप हटविण्यात आलेली नाहीत. हातकणंगले पेठविभाग, शासकीय कार्यालय आणि एस.टी.डेपो समोरील स्थिती पूर्वीप्रमाणे आहे. वाहतूक कोंडीमुळे तालुक्याला येणाऱ्यांची परिस्थिती वाईट आहे. तमदलगे गावातील घरे आणि मंदिर अजूनही हलविण्यात आले नाही. निमशिरगाव येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचे पुनर्वसन करण्यात आले नाही. उदगावच्या गवती कुरणातील पूल आणि रस्ता अपूर्ण अवस्थेत आहे. उदगाव-जयसिंगपूर मार्गे होणाऱ्या तीन पदरी रस्त्याला अजून मुहूर्त नाही, अशी रस्ता चौपदरीकरणाची परिस्थिती आहे.जबाबदारी टाळणाऱ्यांवर कारवाई नाहीकोल्हापूर-सागली चौपदरीकरणाच्या कामाला आतापर्यंत ३१ मार्च २0१५, ३१ मे २0१५, ३0 आॅक्टोबर २0१५ आणि १0 जून २0१६ अशी चारवेळा मुदतवाढ देण्यात आली. ही मुदतवाढ पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी ठेकेदार सुप्रीम कंपनीला देऊनही कंपनीवर कोणताही परिणाम झाला नाही.चार वर्षे संपत आली तरी अतिग्रे, हातकणंगले, तमदलगे, निमशिरगाव आणि उदगावमधील जमीन संपादन आणि घरांचा कब्जा सुप्रीम कंपनीला मिळाला नाही. रस्ता चौपदरीकरणासाठी जमिनी ताब्यात देण्याचे काम प्रांताधिकारी, तहसीलदार, गावकामगार तलाठी, तर घरे ताब्यात देण्याची जबाबदारी जिल्हा परिषद प्रशासन व ज्या त्या गावचे ग्रामसेवक यांची असताना शासनाकडून त्यांच्यावर आजपर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही.ठेकेदार सुप्रीम कंपनीने निकृष्ट आणि वेळेत काम पूर्ण केले नसल्याचा प्रश्न अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये उपस्थित केला होता. कंपनीला काळ्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. यापुढे सुप्रीम कंपनी राज्यात काम करू शकत नाही. कंपनीला दररोज दीड लाख रुपये दंड आकारण्यात येत आहे. येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात पुन्हा हा प्रश्न उपस्थित करून कंपनीला जादा दंड आकारण्याची मागणी करणार आहे.- सुरेश हाळवणकर, आमदार हा रस्ता केद्र शासनाच्या राष्ट्रीय प्राधिकरणाकडे वर्ग करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंजुरी दिली आहे. हा रस्ता रत्नागिरी-नांदेड नॅशनल हायवेकडे वर्ग होणार आहे. दर्जेदार रस्ता सुप्रीम कंपनीने केलेला नाही. यामुळे कंपनीला कामाचे मूल्यमापन करून त्यांच्यावर आकारलेला दंड वसूल करून उर्वरित रक्कम कंपनीला देण्यात आल्यानंतर रस्ता राष्ट्रीय प्राधिकरणाकडे वर्ग होणार आहे,- राजू शेट्टी, खासदार