शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

चौदा दिवसांत सहा हजार कि.मी.चा प्रवास, ‘महिला सुरक्षे’चा संदेश देणार-दुचाकीवरून सात महिलांची देशभर भ्रमंती :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 00:37 IST

कोल्हापूर : भारतात महिलांवर होत असलेल्या अन्याय-अत्याचारांची चर्चा नेहमीच होत असते; पण हा देश महिलांसाठी तितकाच सुरक्षितही आहे, हा संदेश जगापर्यंत पोहोचविण्यासाठी ‘लेडीज आॅफ हर्ले’अंतर्गत सात

कोल्हापूर : भारतात महिलांवर होत असलेल्या अन्याय-अत्याचारांची चर्चा नेहमीच होत असते; पण हा देश महिलांसाठी तितकाच सुरक्षितही आहे, हा संदेश जगापर्यंत पोहोचविण्यासाठी ‘लेडीज आॅफ हर्ले’अंतर्गत सात महिलांनी देशातील राष्ट्रीय महामार्गांवरून दुचाकीवरून सहा हजार किलोमीटरचा प्रवास सुरू केला आहे. ही भ्रमंती १४ दिवसांची असून, त्यांचे गुरुवारी कोल्हापुरात भव्य स्वागत झाले.हर्ले डेव्हिडसन चालविणाऱ्या व्यक्तींचा हर्ले ओनर्स ग्रुप असून, यातील ‘लेडीज आॅफ हर्ले’ हा साहसी उपक्रम करणाºया महिलांचा मोटारसायकल रायडिंग ग्रुप आहे.यातील सुनीला कुंजीर (पुणे), सुनीता मांडे (मुंबई), शर्ली जॉर्ज, प्रवेशिका कटियार, कृपा रेड्डी (बंगलोर), उर्वशी देसाई (अहमदाबाद), अनुश्रीया गुलाटी (डेहराडून) या सात महिला रायडर्सनी ‘महिलांसाठी भारत सुरक्षित आहे,’ हा संदेश घेऊन ८ तारखेला राष्ट्रीय महामार्गावरून दुचाकीवरून प्रवास सुरू केला.दमण, उदयपूर, दिल्ली, कोलकाता, ओडिसा, चेन्नई, बंगलोर असा प्रवास करीत गुरुवारी त्या कोल्हापुरात आल्या. कोल्हापुरातील ‘वॉरिअर हॉग चॅप्टर’च्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सुनीता मांडे व सुनीता कुंजीर यांनी संवाद साधला. त्या म्हणाल्या, भारत महिलांसाठी असुरक्षित आहे, येथे महिलांवर अन्याय-अत्याचार होतात, या वाईट गोष्टी नेहमीच जगासमोर मांडल्या जातात. हे वास्तव असले तरी तितकेच सुरक्षितही वातावरण आहे, ही चांगली बाजू आम्हाला प्रकाशात आणायची होती. त्यासाठी आम्ही रोज दिवस-रात्र असा सहाशे किलोमीटरचा प्रवास करीत आहोत.या कालावधीत आम्हाला नागरिकांचा खूप चांगला अनुभव आला. लोक आमची खूप आस्थेने विचारपूस करायचे. आमच्यात कुठेही असुरक्षिततेची भावना नव्हती. इथून पुढे आम्ही मुंबईला जाऊन पुन्हा दमण येथे या राईडची सांगता करणार आहोत.दुचाकीवरून भारतभ्रमंतीला निघालेल्या ‘लेडीज आॅफ हर्ले ग्रुप’च्या महिलांचे गुरुवारी कोल्हापुरात स्वागत करण्यात आले.