शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात चार हजार प्रकरणे निकाली

By admin | Updated: February 11, 2017 23:35 IST

राष्ट्रीय लोकअदालत : सांगलीत न्यायालयातील विविध खटल्यांमध्ये पाच कोटींचा दंड वसूल

सांगली : सांगली, मिरजेसह जिल्ह्यातील न्यायालयात शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकअदालतमध्ये ४०६८ प्रकरणे निकालात निघाली. यातून पाच कोटी चार लाखांचा दंड वसूल झाला. पक्षकारांमधून यास चांगला प्रतिसाद मिळाला. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव व प्रमुख जिल्हा न्यायाधीश एस. पी. तावडे यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करून राष्ट्रीय लोकअदालतचे उद्घाटन झाले. त्यांनी लोकअदालतचा उद्देश विशद केला. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव तथा दिवाणी न्यायाधीश सौ. एन. एच. मखरे यांनी प्रास्ताविक केले. जिल्ह्यात एकूण ६३ हजार २४३ प्रकरणे प्रलंबित आहेत. न्यायाधीशांची संख्या ५१ आहे. त्यामुळे लोकअदालतीत प्रलंबित प्रकरणांपैकी दहा हजार ३४६ प्रकरणे ठेवली होती. यातील ६५३ निकालात काढण्यात आली. तसेच दावापूर्व २९ हजार ६६ प्रकरणे ठेवली होती. यातील तीन हजार ४१५ प्रकरणे निकालात निघाली. जिल्ह्यात प्रत्येक तालुका न्यायालयातही लोकअदालतला पक्षकारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळपासून न्यायालयाच्या आवारात पक्षकारांनी गर्दी केली होती. सांगलीत जिल्हा न्यायालयात पॅनेलप्रमुख म्हणून न्यायाधीश सौ. एस. एस. सापटणेकर, वर्धन देसाई, जी. ए. रामटेके, श्रीपती पी. पी. खापे आदींनी काम पाहिले. यावेळी जिल्हा सरकारी वकील उल्हास चिप्रे, वकील संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. हरिष प्रताप उपस्थित होते. तसेच बँक, महावितरणचे अधिकारी व पक्षकार उपस्थित होते. विजय कडणे यांनी सूत्रसंचालन केले. अ‍ॅड. सत्यजित कुलकर्णी यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)सर्वाधिक प्रकरणे ‘दावापूर्व’चीदिवाणी, फौजदारी, वैवाहिक, मोटार अपघात, नुकसानभरपाई, बोगस धनादेश ही न्यायालयात प्रलंबित असणारी, तर दावापूर्व ग्रामपंचायत, महावितरण व बँकांची प्रकरणे निकालात निघाली. सर्वाधिक दावापूर्व प्रकरणे निकालात काढण्यासाठी पक्षकारांकडून प्रतिसाद मिळाला. सर्व दिवाणी, फौजदारी, सत्र न्यायालय, मोटार अपघात न्यायाधीकरण, सहकार, औद्योगिक व कामगार न्यायालयामध्ये लोकअदालतीचे आयोजन केले होते. यात प्रलंबित व दावापूर्व अशी एकूण ४०६८ प्रकरणी निकालात निघाल्याने पाच कोटी चार लाखांचा दंड वसूल झाला.आकडा वाढलागतवर्षी २९ हजार ३२९ दाखलपूर्व प्रकरणांपैकी २२६० प्रकरणे तडजोडीने निकालात काढली होती. प्रलंबित २१३ प्रकरणे निकाली निघाली होती. एक कोटी दहा लाखांचा दंडही झाला होता. यावर्षी प्रकरणे निकालात व दंड वसुलीचा आकडा वाढल्याचे दिसून येते.