शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
4
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
5
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
6
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
7
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
8
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
9
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
10
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
11
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
12
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
13
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
14
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
15
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
16
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
17
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
18
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
19
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
20
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

पावसामुळे पालिकेचे चार कोटी खड्ड्यात

By admin | Updated: July 19, 2016 00:13 IST

इस्लामपुरातील चित्र : नवीन रस्त्यांचा फ्लॉप शो; निकृष्ट कामाबाबत विरोधक आवाज उठविणार

अशोक पाटील -- इस्लामपूर  पालिका हद्दीतील विविध ठिकाणच्या रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले आहे. या रस्त्यांवर जवळजवळ पावणेचार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. हे रस्ते पहिल्याच पावसात धुऊन गेल्याने ठिकठिकाणी पुन्हा खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यावर विरोधी पक्षांनी आवाज उठवला असला तरी, सत्तेच्या धुंदीत असलेल्या सत्ताधाऱ्यांना याचे काहीही देणे-घेणे नाही. त्यांनी या प्रकारावर मौन धारण करणे पसंद केले आहे.शहरातील विविध ठिकाणच्या रस्त्यांचे काम युनिटी बिल्डर्स अँड रोड कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लि., कराड यांना देण्यात आले होते. रस्ते तयार करताना ठेकेदाराने नियम व अटींचे पालन केलेले नाही. याविरोधात वेळोवेळी काँग्रेसचे वैभव पवार, त्यांचे बंधू विजय पवार यांनी काम बंद पाडून नियमाने रस्ते करण्याची मागणी केली होती. यावरुन अनेकवेळा सत्ताधाऱ्यांबरोबर खडाजंगीही झाली होती. तरीही मुजोर असलेल्या सत्ताधारी व ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचीच कामे केली आहेत. यामुळेच पहिल्याच पावसात सर्व काही धुऊन गेले आहे.शहरात विविध ठिकाणी केलेले रस्ते आणि त्यावर केलेला खर्च पाहता रस्त्याचा दर्जा सर्वसामान्यांच्या नजरेतून सुटत नाही. या रस्त्यातून किती लाखांचा मलिदा मिळाला, याची आकडेमोड करण्यात विरोधकांनी डोकी लावली आहेत. आतापर्यंत शहरात झालेल्या रस्त्यांवरील खर्च : १. आष्टा नाका ते तहसील कार्यालयापर्यंत (७४ लाख ५० हजार ५००). २. आष्टा नाका ते संभूआप्पा मठ ते मुरारराव शिंदे घर (४९ लाख ९२ हजार). ३. शिराळा नाका ते मोमीन मोहल्ला ते उर्दू हायस्कूल ते जयसिंह टॉकीज (६१ लाख ६५ हजार ५००). ४. झरी नाका ते आझाद चौक ते संभाजी चौक ते यल्लमा चौक (७४ लाख ९९ हजार ८००). ५. जुनी भाजी मंडई ते शाळा नं. १ पर्यंत (६२ लाख २० हजार. ६. शिराळा नाका ते गणेश मंदिर ते कापूसखेड नाका (४३ लाख २५ हजार). ७. यल्लम्मा चौक ते जुना बहे नाका (४३ लाख २५ हजार), असे पावणेचार कोटी रुपये खर्ची पडले आहेत. या रकमेच्या तुलनेत रस्ते झालेत का? याची चौकशी होणे गरजेचे आहे, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. रस्त्यांची कामे देताना ठेकेदाराकडून करारपत्र घेण्यात येते. या करारपत्राप्रमाणे रस्त्याची कामे झालीच नाहीत. करारपत्रावरील काही तारखा हाताने लिहिल्या आहेत. त्यामुळे पालिका आणि ठेकेदार यांच्यामध्ये झालेला करारही संशय निर्माण करणारा असल्याचा आरोपही विरोधकांकडून होत आहे.एकंदरीत शहरातील झालेली सर्वच विकासकामे निकृष्ट दर्जाची झाली असून, पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इस्लामपूर शहरासह जिल्ह्यातील विकास कामांवर नवोदित राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनीही बैठका घेऊन लक्ष घातले आहे. यातून काय साध्य होणार, हे आगामी काळातच समजणार आहे.