शहरं
Join us  
Trending Stories
1
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
2
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
3
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
4
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
5
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
6
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
7
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
8
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
9
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
10
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
11
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
12
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
13
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
14
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
15
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
16
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
17
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
18
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
19
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
20
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी

राष्ट्रीय महामार्गावरील चार उड्डाणपूल पुन्हा उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 00:33 IST

तानाजी पोवार । कोल्हापूर : महापूर आल्यानंतर राष्टÑीय महामार्गावर पाणी येऊन प्रमुख दळणवळण ठप्प होते. याचा फटका अनेक राज्यांना ...

तानाजी पोवार ।कोल्हापूर : महापूर आल्यानंतर राष्टÑीय महामार्गावर पाणी येऊन प्रमुख दळणवळण ठप्प होते. याचा फटका अनेक राज्यांना बसत आहे. त्यासाठी मुंबई ते चेन्नई या एशियन महामार्ग ४८ वरील कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख चार उड्डाणपूल पाडून ते नव्याने उभारण्यात येणार आहेत. त्याबाबत सर्वेक्षण पूर्ण झाले असून, तसा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविला आहे. त्याला सहापदरीकरणातच मूर्त स्वरूप येणार आहे.कोल्हापूर जिल्ह्यात यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने महापुराचे पाणी अक्षरश: सांगली फाट्याजवळ राष्टÑीय महामार्गावर आले. सुमारे सहा दिवस महामार्गावर पाणी राहिल्याने राष्टÑीय महामार्गावरील वाहतूक व्यवस्था कोलमडली. अनेक राज्यांच्या दळणवळण व्यवस्थेला याचा फटका बसला. महामार्ग पाण्याखाली गेल्यामुळे जिल्ह्यात डिझेल-पेट्रोलसह भाजीपाल्याची टंचाई तीव्रतेने भासली. त्यामुळे पाण्याखाली जाणारे मार्ग उचलून घेण्यात येणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गावरील गांधीनगर, उजळाईवाडी विमानतळ, उचगाव, कागल हे चार प्रमुख उड्डाणपूल पाडून ते नव्याने उभारण्यात येणार आहेत. त्यांची उंची तितकीच ठेवून लांबी आणखी दहा मीटर वाढविण्यात येणार आहे.सध्या गांधीनगर, उजळाईवाडी विमानतळ, उचगाव, कागल या उड्डाणपुलांची लांबी कमी आहे. ते उड्डाणपूल पाडून सहापदरीकरणांतर्गत नव्याने जादा लांबीचे उड्डाणपूल उभारण्यात येणार आहेत. पूरस्थिती ओसरल्यानंतर त्याबाबतचे सर्वेक्षण खासगी कंपनीद्वारे करून तो प्रस्ताव केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे.उड्डाणपुलाची रुंदी वाढणारमहामार्गावरील प्रमुख जुने उड्डाणपूल पाडून त्या ठिकाणी नव्याने दीर्घ लांबीचे उड्डाणपूल उभारण्यात येणार आहेत. सध्याच्या पुलाखाली वाहतुकीसाठी १० बाय १० असे एकूण २० मीटरचे गाळे आहेत. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते; पण नव्याने होणाºया उड्डाणपुलाखालील रस्ता उचलण्यात येणार असून, सुमारे २० बाय २० लांबीचे असे दोन गाळे एकूण ४० मीटरचे होणार आहेत. त्यामुळे वाहतुकीच्या कोंडीपासून व पुराच्या पाण्यापासून मुक्तता होणार आहे.‘बास्केट ब्रिज’चा रस्ता थेट कोल्हापुरातसहापदरीकरणाच्या कामातच गाजावाजा होऊन अडकलेल्या ‘बास्केट ब्रिज’ला मूर्त स्वरूप येईल. महामार्गावरून पंचगंगा नदीच्या पैलतीरापासून शिरोली नाक्यापर्यंत असा सुमारे १२६० मीटर लांबीचा वक्र होऊन शहरात प्रवेश करणारा हा ‘बास्केट ब्रिज’ आहे. महामार्गावरून कोल्हापुरात प्रवेश करणारी वाहतूक थेट बास्केट ब्रिजवरून शहरात येणार आहे.