शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीच्या शोधात त्या भरकटल्या....चार दिवस उपाशी-गडचिरोलीतील शाळकरी मुलींना कोल्हापुर पोलीसांचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 21:21 IST

सैरभैर झालेल्या अवस्थेत त्या रेल्वे स्टेशन परिसरात फिरत होत्या. रात्रीचा मुक्काम येथील फुटपाथवर करीत होत्या. रात्रगस्त घालत असताना शाहुपूरी पोलीसांना या मुली दिसल्या.

ठळक मुद्देबेपत्ता झालेल्या मुली सुखरुप डोळ्यासमोर पाहून आई-वडीलांनी अश्रू ढाळले. त्यांनी व गडचिरोली पोलीसांनी शाहुपूरी पोलीसांचे कौतुक केले.

एकनाथ पाटील

कोल्हापूर : परिसर नक्षलवादी, कमालीची बेकारी, आई-वडीलांवर आपला बोझ नको, काम करुन पोट भरायचे असा मनाशी निश्चिय करीत त्या विचाराने गडचिरोलीतून घराबाहेर पडला. नोकरीच्या शोधात भरकटलेल्या या मुली महाराष्ट्र एकस्प्रेस रेल्वेने थेट कोल्हापुरात आल्या. मराठी नीट बोलता येत नाही, कोणाची ओळख नाही, की परिसर अनोळखी. चार दिवस उपाशीपोटी त्यांचा मुक्काम रेल्वे स्टेशनवरील फुटपाथवर होता. या मुली शाहुपूरी पोलीसांच्या नजरेला पडल्या अन त्यांची कहाणी ऐकून सगळेच गहिवरले. पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी त्यांना जेवण देवून गडचिरोली पोलीसांशी संपर्क साधून आई-वडीलांच्या ताब्यात सुखरुप दिले.

निकिता शिवराज पदा (वय १८), नम्रता जयराम पदा (१७, दोघी  रा. माळंदा, धानोरा, गडचिरोली), रागिनी सगरुजी गावडे (१८, रा. चवेला ता. धानोरा, गडचिरोली) अशी त्यांची नावे आहेत. मुलींना सुखरुप पालकांच्या ताब्यात दिलेबद्दल शाहुपूरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक मोरे, कॉन्स्टेबल राम तळपे, सविता पाटील, ज्योती कांबळे यांचे कौतुक होत आहे.

कोल्हापूर रेल्वे स्टेशन परिसरात गेल्या चार दिवसापासून तीन मुली संशयितरित्या फिरत आहेत अशी माहिती शाहुपूरी पोलीसांना मिळाली. १३ जुलैला त्यांना ताब्यात घेवून चौकशी केली असता धानोरा-गडचिरोली येथून नोकरीच्या शोधात भरकटल्या आणि महाराष्ट्र एक्स्प्रेसने कोल्हापुरात आल्याचे समजले. त्या तिघीही आदिवासी जंगल भागातल्या आहेत. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची. दहावीपर्यंत शिक्षण झाले आहे. नोकरी करुन पोट भरायचे असा मनाशी विचार करुन त्या घरातून बाहेर पडल्या. महाराष्ट्र एक्स्प्रेसने त्या थेट कोल्हापूर रेल्वे स्टेशनवर आल्या. परिसर नवखा, कोणाशी ओळख नाही, जवळ पैसे नाहीत, मराठी निट बोलता येत नाही अशा परिस्थितीत त्या भेदरुन गेल्या. गेली चार दिवस त्या उपाशी होत्या. तिघींनाही अशक्यतपणा आला होता.

सैरभैर झालेल्या अवस्थेत त्या रेल्वे स्टेशन परिसरात फिरत होत्या. रात्रीचा मुक्काम येथील फुटपाथवर करीत होत्या. रात्रगस्त घालत असताना शाहुपूरी पोलीसांना या मुली दिसल्या. त्यांना पोलीस ठाण्यात आनले. विश्वासात घेत विचारपूस केल्यानंतर खरा प्रकार पुढे आला. उपाशी असल्याने त्यांना जेवण दिले. सीपीआर रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करुन कसबा बावडा येथील तेजस्विनी महिला सुधारगृहात ठेवले. निरीक्षक मोरे यांनी गडचिरोलीच्या पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधून माहिती दिली.

मुलींच्या आई-वडीलांना घेवून तेथील पोलीस कोल्हापुरात आले. बेपत्ता झालेल्या मुली सुखरुप डोळ्यासमोर पाहून आई-वडीलांनी अश्रू ढाळले. त्यांनी व गडचिरोली पोलीसांनी शाहुपूरी पोलीसांचे कौतुक केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPolice Stationपोलीस ठाणे