शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
2
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
3
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
4
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
5
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
6
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
7
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
8
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
9
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित
10
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
11
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
12
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
13
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
14
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
15
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
16
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
17
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
18
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
19
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
20
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...

पन्हाळ्याचे माजी नगराध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब भोसले यांचे पु्ण्यात निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 13:35 IST

पन्हाळा गिरिस्थान नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आणि ज्येष्ठ पत्रकार विष्णु उर्फ बाळासाहेब रावसो भोसले (वय ६७) यांचे आज सकाळी हृदयविकाराने निधन झाले. भारतीय जनता पक्षाचे ते राष्ट्रीय परिषद सदस्य आणि कोल्हापूर जिल्हा (ग्रामीण) अध्यक्ष होते. पन्हाळा तालुका पत्रकार संघटनेचे ते संस्थापक अध्यक्ष होते. 

ठळक मुद्देपन्हाळ्याचे माजी नगराध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब भोसले यांचे पु्ण्यात निधन पन्हाळा तालुका पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष

पन्हाळा : पन्हाळा गिरिस्थान नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आणि ज्येष्ठ पत्रकार विष्णु उर्फ बाळासाहेब रावसो भोसले (वय ६७) यांचे आज सकाळी हृदयविकाराने निधन झाले. भारतीय जनता पक्षाचे ते राष्ट्रीय परिषद सदस्य आणि कोल्हापूर जिल्हा (ग्रामीण) अध्यक्ष होते. पन्हाळा तालुका पत्रकार संघटनेचे ते संस्थापक अध्यक्ष होते. बाळासाहेब धाकटी कन्या डॉ. कोमल हिच्या विवाह समारंभासाठी १० फेब्रुवारी रोजी आळंदी येथे गेले होते. विवाह समारंभ झाल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्यांना पुणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथेच त्यांच्यावर बायपासची शस्त्रक्रियाही करण्यात आली. पण उपचारादरम्यानच आज त्यांची प्राणज्योत मालवली.बाळासाहेब १९९५ मध्ये पन्हाळ्याचे नगराध्यक्ष होते. त्यांच्या कारकीर्दीतच सोमेश्वर तलावाचा गाळ काढण्यात आला. पन्हाळा ग्रामीण रुग्णालयाच्या उभारणीत त्यांचा मोठा वाटा होता तसेच पन्हाळगडावरील शिवतीर्थ तलाव विकसित करण्यासाठी ते धडपडत होते. मसाई पठार विकासासाठी त्यांनी सादर केलेली योजना सरकारकडे प्रलंबित आहे.१९८0 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून त्यांनी पन्हाळा मतदारसंघातून निवडणूकही लढविली होती. पन्हाळा विकास आघाडीच्या माध्यमातून ते पन्हाळ्याच्या विकासासाठी सातत्याने धडपडत होते. पन्हाळा तालुका पत्रकार संघाची स्थापना त्यांनी केली. या माध्यमातून तालुक्यातील पत्रकारांना त्यांनी एकत्र आणले. सांगलीच्या नवसंदेश आणि नंतर सामना दैनिकातून ते लिहित होते. सध्याही नवसंदेशमधून सातत्याने ते लिखाण करत होते.पन्हाळगडावरील प्राचीन अंबाबाई मंदिर भक्त मंडळामध्येही ते सक्रिय होते. या मंदिराचा जीर्णोध्दारही त्यांनी केला होता. पन्हाळा, जोतिबा, वीरशिवा काशिद आदी ऐतिहासिक व पौराणिक विषयावरील छोटेखानी पुस्तिका त्यांनी लिहिल्या आहेत. त्यांचा कल  होता. पन्हाळगडावर येणाऱ्या पर्यटकांसाठी त्यांनी ऐतिहासिक आणि दुर्लक्षित परिसरात माहितीचे फलक लावले होते.त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली असा परिवार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर