शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
तुमच्या नावावरही दोन मतदार कार्ड आहेत का? असं तपासा आणि पुढच्या अडचणी टाळा
4
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
5
मतचोरीविरोधात काँग्रेसची "वोट चोरी के खिलाफ मैं राहुल गांधी के साथ" स्वाक्षरी मोहीम 
6
TCS, इन्फोसिससह टॉप IT कंपन्यांचे शेअर्स २६% पर्यंत कोसळले; ७ महिन्यांत कोट्यवधी रुपये पाण्यात; कारण आलं समोर
7
क्रूझ कंट्रोल, ३६०-डिग्री कॅमेरा... जे नव्हते तेच आणले...! Citroen C3X लाँच झाली, १५ नवीन इंटेलिजंट फिचर्स...
8
दिल्लीनंतर आता राजस्थानमध्येही भटक्या कुत्र्यांना हटविण्याचे आदेश; महाराष्ट्रात कधी?
9
पोटाच्या नसा तुटल्या, यकृत फाटलं; बॉयफ्रेंडसोबत मिळून पत्नीने पतीला बेदम मारलं! लेकीने केला आईचा गुन्हा उघड
10
देशावर आलं तर भारतीयांनी शपथच घेतली! अमेरिकन ब्रांड्सना करणार बॉयकॉट? McD, Coca-Cola, Amazon, Apple चं काय होणार
11
असीम मुनीरचा एकुलता एक मुलगा काय करतो? ज्याच्या जीवावर पाकिस्तान भारताला देतोय धमक्या
12
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
13
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, एका वर्षात अर्ध्या झाला शेअर; तरीही तज्ज्ञ म्हणतायत खरेदी करा!
14
...तर निवडणूक आयोगाला हृदयविकाराचा झटका आला असता का?; 'मतचोरी'वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
15
Health Tips: रात्री ब्रा काढून झोपल्याने ब्रेस्टसाईज वाढते की स्तन ओघळतात? डॉक्टर सांगतात...
16
शिव्यांची लाखोली, एकमेकांची कॉलर पकडली...; शिंदेसेनेच्या बैठकीत जोरदार राडा, पोलिसांची धावपळ
17
चीनवर ट्रम्प यांचं प्रेम जातंय उतू, टॅरिफवर ९० दिवसांची सूट; जिनपिंगना म्हटलं 'चांगला मित्र', कारण काय?
18
दहिसर टोल नाका वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करावा; प्रताप सरनाईकांची एकनाथ शिंदेंकडे मागणी
19
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
20
चोरांचा कारनामा! अवघ्या १८ मिनिटांत १४ कोटींचं सोनं, ५ लाखांवर डल्ला; हेल्मेट घालून आले अन्...

बेनिक्रेच्या पाणी योजनेला वनखात्याचे कुंपण

By admin | Updated: September 3, 2015 23:52 IST

पाण्याचे दुर्भिक्ष्य : लघु पाटबंधाऱ्यात अपुरा पाणीसाठा, ४00 फूट लांबीच्या पाईप खुदाईला परवानगी नाही

म्हाकवे : बेनिक्रे (ता. कागल) येथील पाणीटंचाईतून मुक्त होण्यासाठी ज्योतिर्लिंग पाणी वापर संस्थेच्या प्रयत्नातून वेदगंगा नदीवरून सुरुपली येथून स्वतंत्र पाणी योजना पूर्णत्वाकडे गेली आहे. मात्र, केवळ वनखात्याच्या हद्दीतील ४०० फूट लांबीच्या पाईप खुदाईला या खात्याने अद्याप परवानगीच न दिल्याने ही योजना अडखळली आहे. वनखात्याने येथील ग्रामस्थांच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य लक्षात घेऊन त्वरित परवानगी दिल्यास केवळ महिनाभरात ही योजना कार्यान्वित होऊ शकते, अशी स्थिती आहे.२०१३ मध्ये गावातील शेतकऱ्यांनी सामूहिकपणे कर्ज घेऊन सर्वच शेती ओलिताखाली आणण्यासाठी शासनाशी निखराची झुंज देऊन सुरुपली येथून वेदगंगेतून पाणी उपसा करण्याची परवानगी मिळविली. सुमारे अडीच कि.मी. अंतराच्या आणि सव्वातीन कोटी रुपये खर्चाच्या या पाणी योजनेचे काम अतिशय जलदगतीने करण्यात आले. नदीतून पाणी पाईपद्वारे येथील लघु पाटबंधारे प्रकल्पात टाकायचे आणि तेथून शेतीसह पिण्यासाठी वापरायचे असे नियोजन आहे. विशेष बाब म्हणजे पाणी योजनेसाठी लागणारा सर्व निधी शेतकऱ्यांनी कर्ज स्वरूपात उभा केला आहे.दरम्यान, येथील ज्योतिर्लिंग पाणीपुरवठा संस्थाही अतिशय काटेकोरपणे पाण्याचा वापर करीत आहे, परंतु यंदा अपुऱ्या पावसामुळे या प्रकल्पात पाणीसाठाच झालेला नाही. वेदगंगेतून आलेली पाणी योजना पूर्ण होण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष आण्णासाहेब वाडकर, उपाध्यक्ष गणपती इंगळे, बाळासाहेब शिंदे, रवी पाटील, वसंत जाधव, सचिव रवींद्र वाडकर, आदी शासनदरबारी हेलपाटे घालून पाठपुरावा करीत आहेत.परवानगीसाठी नागपूरकडे धावरहिवासी इथले, गायरान, शेतकरी, शेती, पाणी इथले; मात्र वनखात्याच्या हद्दीतून पाणी योजना नेण्यासाठी नागपुरातील अधिकारी परवानगी देणार, ही आश्चर्यकारक बाब आहे. तरीही शासकीय रितसर परवानगीचा सोपस्कार पूर्ण करण्यासाठी ग्रामस्थांनी नागपूर येथील कार्यालयात कागदपत्रे पोहोचवून पाण्याच्या दुर्भिक्ष्यापासून बचावासाठी प्रयत्न सुरूच ठेवले आहेत.शेतकऱ्यांच्या योगदानातून कोणत्याही शासकीय निधीशिवाय वेदगंगेतून पाणी योजना करण्याचे शिवधनुष्य उचलले आहे. वनखात्याच्या हद्दीतील केवळ ४०० फूट खुदाई करण्यासाठी नागपूर येथील कार्यालयात आम्ही फेऱ्या मारत आहोत. ही योजना त्वरित पूर्ण होऊन शेतीच्या उत्पादनात वाढ होणे गरजेचे आहे, अन्यथा शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर होणार आहे. - रवींद्र वाडकर, सचिव, ज्योतिर्लिंग पाणीपुरवठा संस्था