शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
2
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
3
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावांचा समावेश
4
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
5
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
6
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
7
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
8
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
9
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
10
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
11
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
12
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
13
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
14
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
15
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
16
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
17
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
18
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
19
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
20
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?

बेनिक्रेच्या पाणी योजनेला वनखात्याचे कुंपण

By admin | Updated: September 3, 2015 23:52 IST

पाण्याचे दुर्भिक्ष्य : लघु पाटबंधाऱ्यात अपुरा पाणीसाठा, ४00 फूट लांबीच्या पाईप खुदाईला परवानगी नाही

म्हाकवे : बेनिक्रे (ता. कागल) येथील पाणीटंचाईतून मुक्त होण्यासाठी ज्योतिर्लिंग पाणी वापर संस्थेच्या प्रयत्नातून वेदगंगा नदीवरून सुरुपली येथून स्वतंत्र पाणी योजना पूर्णत्वाकडे गेली आहे. मात्र, केवळ वनखात्याच्या हद्दीतील ४०० फूट लांबीच्या पाईप खुदाईला या खात्याने अद्याप परवानगीच न दिल्याने ही योजना अडखळली आहे. वनखात्याने येथील ग्रामस्थांच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य लक्षात घेऊन त्वरित परवानगी दिल्यास केवळ महिनाभरात ही योजना कार्यान्वित होऊ शकते, अशी स्थिती आहे.२०१३ मध्ये गावातील शेतकऱ्यांनी सामूहिकपणे कर्ज घेऊन सर्वच शेती ओलिताखाली आणण्यासाठी शासनाशी निखराची झुंज देऊन सुरुपली येथून वेदगंगेतून पाणी उपसा करण्याची परवानगी मिळविली. सुमारे अडीच कि.मी. अंतराच्या आणि सव्वातीन कोटी रुपये खर्चाच्या या पाणी योजनेचे काम अतिशय जलदगतीने करण्यात आले. नदीतून पाणी पाईपद्वारे येथील लघु पाटबंधारे प्रकल्पात टाकायचे आणि तेथून शेतीसह पिण्यासाठी वापरायचे असे नियोजन आहे. विशेष बाब म्हणजे पाणी योजनेसाठी लागणारा सर्व निधी शेतकऱ्यांनी कर्ज स्वरूपात उभा केला आहे.दरम्यान, येथील ज्योतिर्लिंग पाणीपुरवठा संस्थाही अतिशय काटेकोरपणे पाण्याचा वापर करीत आहे, परंतु यंदा अपुऱ्या पावसामुळे या प्रकल्पात पाणीसाठाच झालेला नाही. वेदगंगेतून आलेली पाणी योजना पूर्ण होण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष आण्णासाहेब वाडकर, उपाध्यक्ष गणपती इंगळे, बाळासाहेब शिंदे, रवी पाटील, वसंत जाधव, सचिव रवींद्र वाडकर, आदी शासनदरबारी हेलपाटे घालून पाठपुरावा करीत आहेत.परवानगीसाठी नागपूरकडे धावरहिवासी इथले, गायरान, शेतकरी, शेती, पाणी इथले; मात्र वनखात्याच्या हद्दीतून पाणी योजना नेण्यासाठी नागपुरातील अधिकारी परवानगी देणार, ही आश्चर्यकारक बाब आहे. तरीही शासकीय रितसर परवानगीचा सोपस्कार पूर्ण करण्यासाठी ग्रामस्थांनी नागपूर येथील कार्यालयात कागदपत्रे पोहोचवून पाण्याच्या दुर्भिक्ष्यापासून बचावासाठी प्रयत्न सुरूच ठेवले आहेत.शेतकऱ्यांच्या योगदानातून कोणत्याही शासकीय निधीशिवाय वेदगंगेतून पाणी योजना करण्याचे शिवधनुष्य उचलले आहे. वनखात्याच्या हद्दीतील केवळ ४०० फूट खुदाई करण्यासाठी नागपूर येथील कार्यालयात आम्ही फेऱ्या मारत आहोत. ही योजना त्वरित पूर्ण होऊन शेतीच्या उत्पादनात वाढ होणे गरजेचे आहे, अन्यथा शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर होणार आहे. - रवींद्र वाडकर, सचिव, ज्योतिर्लिंग पाणीपुरवठा संस्था