शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
5
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
6
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
7
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
8
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
9
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
10
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
12
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
13
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
14
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
15
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
16
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
17
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
18
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
19
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
20
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन

पैसे मागणाऱ्यावर फौजदारी

By admin | Updated: February 23, 2015 00:18 IST

आधारकार्डसाठी प्रशासन सतर्क : चालढकल करणाऱ्या बॅँकांवरही नजर

]प्रवीण देसाई - कोल्हापूर -आधारकार्ड काढण्यासाठीही काही ठिकाणी लोकांना रांगेत उभे राहून शंभर रुपये मोजावे लागत आहेत; तर झिरो बॅलन्सवर खाती उघडा, असे सरकारचे स्पष्ट आदेश असतानाही त्यांना या योजनेतील बॅँकांकडून हरताळ फासला जात आहे. जिल्हा प्रशासनाने हा विषय अतिशय गांभीर्याने घेतला असून, ‘आधार’साठी पैसे घेणाऱ्यांवर फौजदारी केली जाणार आहे. शिवाय लोकांना नाडवणारे बॅँकांचे अधिकारी व कर्मचारी यांचीही गय केली जाणार नाही.रेशनचे अनुदान बॅँक खात्यावर जमा करण्याची योजना केंद्र सरकारने हाती घेतली आहे. दारिद्र्यरेषेखालील व पिवळ्या कार्डधारकांसाठी असणाऱ्या या योजनेची प्रत्यक्ष अमलबजावणी पुढील महिन्यापासून होण्याची शक्यता आहे. या योजनेंतर्गत कार्डवरील प्रत्येक व्यक्तीच्या नावावर शंभर रुपये जमा होणार आहेत. यासाठी नागरिकांचे बॅँक खाते व आधार कार्ड सक्तीचे केले आहे. त्यामुळे सध्या बॅँका व आधारकार्डसाठीे लोकांच्या रांगाच्या रांगा लागल्याचे चित्र आहे. आधारकार्ड हे नागरिकांना पूर्णपणे मोफत द्यायचे आहे. याचे पैसे सरकार संबंधित कंपनीला देणार आहे; परंतु काही ठिकाणी लोकांकडून कार्डसाठी शंभर-शंभर रुपये उकळले जात आहेत. याबाबत कोल्हापूर शहरासह इचलकरंजीतूनही जिल्हा प्रशासनाकडे तक्रारी आल्या आहेत. तसेच या योजनेसाठी झिरो बॅलन्सवर खाते उघडण्याचे आदेशही संबंधित बॅँकांना सरकारकडून देण्यात आले आहेत; परंतु या योजनेसाठी नेमलेल्या काही बॅँका सोडल्या, तर अन्य बॅँकांमध्ये हे खाते काढायला येणारा माणूस म्हणजे ‘फुकटचे गिऱ्हाईक’ या भावनेतूनच त्याच्याशी व्यवहार केला जात आहे. ‘खात्यावर काहीतरी भरा; त्याशिवाय खाते उघडता येणार नाही,’ असे सांगून त्यांना हेलपाटे मारायला लावले जात आहेत. या त्रासाने नागरिक हैराण झाले आहेत. या योजनेत जिल्ह्यातील जवळपास ४५ बॅँकांचा समावेश आहे. या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत योजनेवर याचा विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी आधारकार्डसाठी पैसे घेणाऱ्यांवर थेट फौजदारी करण्याचे पाऊल जिल्हा प्रशासनाने उचलले आहे. तसेच या योजनेसाठी बॅँकेत काढाव्या लागणाऱ्या खात्यासाठी त्यावर पैसे भरायला लावणे व ते न भरल्यास लोकांना हेलपाटे मारायला लावणे, आदी तक्रारींमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे यासाठी संबंधित बॅँकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावरही फौजदारी कारवाई होणार आहे. यासाठी संबंधित नागरिकांनी तोंडी तक्रार न देता ती लेखी स्वरूपात तहसीलदारांकडे द्यावयाची आहे. त्यानंतर त्यांच्यावर रितसर फौजदारी दाखल केली जाणार आहे. ‘आधार’ कार्डसाठी नागरिकांनी केंद्रचालकांना पैसे देण्याची गरज नाही; कारण त्यांना सरकारकडून पैसे दिले जात आहेत. तरीही जर कोणी पैसे मागत असेल, तर संबंधितांविरोधात थेट लेखी तक्रारी अर्ज तहसीलदारांकडे द्यावा. त्यानंतर त्यांच्यावर फौजदारी दाखल केली जाईल.- विवेक आगवणे, जिल्हा पुरवठा अधिकारी‘आधार’ केंद्रांना जोडली रेशन दुकानेया योजनेमध्ये आधार कार्डच्या केंद्रांना रेशनची दुकाने जोडण्याचे काम सुरू झाले आहे. याची सुरुवात इचलकरंजी येथून झाली आहे. कोल्हापूर शहरातही हे काम लवकरच सुरू होणार आहे. या केंद्रांमध्ये फलक लावणे अनिवार्य केले असून, नागरिकांना नि:शुल्क सेवा देण्यासंदर्भात केंद्रचालकांना बजावण्यात आले आहे. त्याचबरोबर कार्ड काढण्यासाठी होणाऱ्या जादा वेळामुळे नागरिकांना त्रास होत आहे, याचीही दखल प्रशासनाने घेतली आहे.