शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राला आरक्षणाचा ठराव संसदेत मंजूर करण्यास भाग पाडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:22 IST

या पत्रामध्ये समाजातर्फे आरक्षण संसदेतही मंजूर करून घेण्यास केंद्र सरकारला भाग पाडावे. यासोबतच समाजाला सक्षम करण्यासाठी सर्वपक्षीयांनी एकमत करून ...

या पत्रामध्ये समाजातर्फे आरक्षण संसदेतही मंजूर करून घेण्यास केंद्र सरकारला भाग पाडावे. यासोबतच समाजाला सक्षम करण्यासाठी सर्वपक्षीयांनी एकमत करून प्रयत्न करावेत, अन्यथा मराठा समाजाचा उद्रेक झाल्यास त्यास सर्वस्वी राज्यशासन व लोकप्रतिनिधी जबाबदार राहतील. सर्व मंत्री, खासदार, आमदार यांनी आपली लेखी भूमिका स्पष्ट करावी. यासह अन्य मागण्यांबाबतचे पत्र सकल मराठा समाज महाराष्ट्र राज्यातर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रविवारी पाठविण्यात आले. याच्या प्रति उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेसचे नेते व मंत्री अशोकराव चव्हाण यांनाही पाठविण्यात आल्या आहेत. या पत्रावर मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, दिलीप देसाई, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष ॲड. गुलाबराव घोरपडे, हर्षल सुर्वे, संदीप देसाई, शशिकांत पाटील, शाहीर दिलीप सावंत यांच्यासह शेकडो कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.

मागण्या अशा

- समाजाला घटनात्मक आरक्षण देण्यासाठी राज्य विधिमंडळात आरक्षणाचा ठराव करून तो केंद्राला पाठवावा. तेथे हा ठराव संसदेत मंजूर करून घेण्यास भाग पाडावे. राष्ट्रपतींच्या सहीने समाजाला घटनात्मक आरक्षण मिळवून देण्यासाठी कार्यवाही करावी.

-आरक्षण मिळेपर्यंत समाजाला राजर्षी शाहू महाराज शिक्षण, प्रशिक्षण, मानव विकास संस्था(सारथी) व कै. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची भरीव तरतूद करून संस्था सक्षम कराव्यात. त्यांचा विस्तार करावा. या संस्थांची उपकेंद्र राज्यभरात व्हावीत. या संस्थेवर मराठा समाजातील तज्ज्ञांचा समावेश करावा. सारथीसाठी २००० कोटींचा निधी द्यावा. कार्यक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती करा.

- अण्णासाहेब पाटील अर्थिक महामंडळात शैक्षणिक कर्जाचा समावेश करावा. कर्ज वितरणात सुलभता आणावी. कर्जाची मर्यादा वाढवावी. या महामंडळासाठी ५००० कोटीपर्यंत तरतूद करावी.

-राज्य शासनाने केंद्राला घटनात्मकरीत्या टिकणारे आरक्षण देण्यासाठी संसदेत तसा ठराव करण्यासाठी घटना दुरुस्तीकरिता भाग पाडावे.

- मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीकरिता ओबीसीप्रमाणे शैक्षणिक शुल्क रचना करावी.

- सरकारी नोकरीत मराठा आरक्षणातून ज्यांची निवड झाली आहे, त्यांना तत्काळ नोकरीवर रुजू करून घ्यावे.

- ओबीसीप्रमाणे मराठा समाजालाही नाेकरी व शिक्षणांमध्ये सुविधा द्या.

- कोरोनावर मात करण्यासाठी पक्षीय राजकारण थांबवावे.

-बाजारमूल्यांवर आधारित हमीभाव लागू करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा.

- छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार राज्य शासनाने भारतात परत आणावी.

- छत्रपती शिवाजी महाराजांची जिवंत स्मारक म्हणजे गडकिल्ले जतन व संवर्धन करण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत.