शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
3
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
4
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
5
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
6
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
7
आयोग नव्हे, मतदारच राजा !
8
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
9
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
10
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
11
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
12
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
13
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
14
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
15
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
16
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
17
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
18
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
19
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
20
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)

कोल्हापूरचा फॉर्म्युला पाळा, अन्यथा तोडी बंद

By admin | Updated: November 6, 2016 00:36 IST

रघुनाथदादा पाटील : जिल्हाधिकाऱ्यांनी तोडगा काढावा; कार्यकर्त्यांची सांगलीत निदर्शने

सांगली : यंदाच्या एकरकमी एफआरपीसह टनास १७५ रुपये जास्त देण्याच्या कोल्हापूरच्या फॉर्म्युल्यापेक्षा एक रुपयाही कमी सांगली जिल्ह्यातील शेतकरी घेणार नाहीत. कारखानदारांनी दराची घोषणा केल्याशिवाय तोडी होऊ देणार नाही, असा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी शनिवारी सांगलीत पत्रकार परिषदेत दिला. जिल्हाधिकाऱ्यांनी साखर कारखानदारांशी चर्चा करून दराची घोषणा करावी, अन्यथा आंदोलनामुळे जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास संघटना त्यास जबाबदार राहणार नाही. यासंबंधीचे निवेदन जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांना संघटनेने दिले आहे.पाटील म्हणाले की, उसाची तोडणी झाल्यापासून चौदा दिवसात शेतकऱ्यांना एफआरपी आणि त्यावर १७५ रुपये दिले पाहिजेत. त्यानंतर हंगाम बंद होताना सर्व हिशेब करून उपपदार्थ नसणाऱ्या कारखान्यांनी एकूण साखरेच्या ७० टक्के रक्कम शेतकऱ्यांना द्यावी आणि उर्वरित ३० टक्के रकमेत त्यांचा खर्च भागवायचा आहे. उपपदार्थ निर्मिती करणाऱ्या कारखान्यांनी ७५ टक्के रक्कम शेतकऱ्यांना द्यायची आहे आणि उर्वरित २५ टक्के रकमेत खर्च भागवायचा आहे. याचा सर्व हिशेब केल्यानंतर शेतकऱ्यांना अंतिम दर प्रतिटन ३५०० रुपयेच मिळणार आहे. यामुळे या बैठकीतील तोडगा आम्हाला मान्य आहे, असे ते म्हणाले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी याप्रश्नी निदर्शनेही केली. (प्रतिनिधी) तीव्र आंदोलन!सांगली जिल्ह्यातील साखर कारखानदारांना कोल्हापूरचा फॉर्म्युला मान्य नसेल, तर त्यांनी त्यापेक्षा जादा दर द्यावा. परंतु, त्यापेक्षा एक रुपयाही कमी घेतला जाणार नाही. कारखान्यांनी गळीत हंगाम सुरु करण्यापूर्वी दर जाहीर करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. एकाही कारखान्याची तोड चालू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.