शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

राजर्षी शाहू यांना ‘भारतरत्न’ मिळण्यासाठी लोकचळवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 00:07 IST

< p >कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराज यांना ‘भारतरत्न’ किताब मिळण्यासाठी जनमताचा दबाव वाढविण्याची गरज आहे. याअंतर्गत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करणारे लेखी पत्र, प्रस्ताव पाठवायचे आहेत. त्यासाठी कोल्हापुरातून लोकचळवळ उभारली जाणार आहे. या चळवळीच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपले ठराव आणि विविध सामाजिक, शैक्षणिक, उद्योग-व्यापार, आदी क्षेत्रांतील ...

<p>कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराज यांना ‘भारतरत्न’ किताब मिळण्यासाठी जनमताचा दबाव वाढविण्याची गरज आहे. याअंतर्गत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करणारे लेखी पत्र, प्रस्ताव पाठवायचे आहेत. त्यासाठी कोल्हापुरातून लोकचळवळ उभारली जाणार आहे. या चळवळीच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपले ठराव आणि विविध सामाजिक, शैक्षणिक, उद्योग-व्यापार, आदी क्षेत्रांतील संस्था, संघटना आणि नागरिकांनी आपली पत्रे माझ्याकडे पाठवावीत, असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेद्वारे केले.खासदार महाडिक म्हणाले, राजर्षी शाहू महाराज यांना ‘भारतरत्न’ हा किताब जाहीर व्हावा, अशी मागणी संसदेमध्ये मी केली; पण केंद्र सरकारकडून हा सर्वोच्च नागरी किताब मिळवायचा असेल, तर लोकचळवळ उभारण्याची गरज आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या जनतेला सोबत घेऊन, नवी लोकचळवळ उभारली जाणार आहे. तिची सुरुवात पत्र, ठराव आणि प्रस्ताव जमा करण्यापासून होणार आहे. कोल्हापुरातील विविध क्षेत्रांतील संस्था, संघटनांनी हिंदी अथवा इंग्रजीत पत्र तयार करावे. त्यासह नागरिकांनी वैयक्तिकपणे पत्रे लिहून ती माझ्याकडे जमा करावीत. सर्व पत्रे आणि प्रस्ताव एकत्र करून, अन्य काही लोकप्रतिनिधींसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून,राजर्षी शाहू महाराज यांना ‘भारतरत्न’ किताब मिळावा, अशी विनंतीकेली जाईल. त्यासाठी कोल्हापूरकरांच्या भावना त्या पत्रांद्वारे सादर करतील. कोल्हापूरसह राज्यातील काही खासदारांचे शिष्टमंडळ बनविले जाईल. कोल्हापूरची जनभावना आणि खासदारांची एकत्र ताकद पणाला लावून, राजर्षी शाहू महाराज यांना हा सर्वोच्च किताब मिळावा यासाठी प्रयत्न केले जातील. दि. २५ आॅगस्टपर्यंत कोल्हापुरातील राजेश मोटर्सशेजारील माझ्या कार्यालयात आपले पत्र, ठराव, प्रस्ताव पोस्ट अथवा ई-मेलद्वारे जमा करावेत.‘लोकमत’ने मांडला मुद्दाकुणाला ‘भारतरत्न’ द्यावा, याचा निर्णय पंतप्रधान कार्यालय घेत असल्याने हा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच हातात आहे. देशात व राज्यातही भाजपचेच सरकार असल्याने महाराष्ट्र सरकारने त्यासाठी पंतप्रधानांकडे राजर्षी शाहू महाराजांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान मिळावा, यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी ‘लोकमत’ने शनिवार (दि. २८)च्या अंकात ‘राजर्षी शाहूंचा ‘भारतरत्न’ पंतप्रधानांच्या हातात’ या वृत्ताद्वारे मांडली. त्यानंतर हा किताब मिळविण्याच्या दिशेने लोकचळवळ उभारण्याचे पडलेले हे पाऊल महत्त्वपूर्ण ठरणार आहे.सर्व खासदारांना ‘शाहूचरित्रा’सह पाठविणार पत्रया किताबासाठीच्या मागणीला समर्थन द्यावे, यासाठी देशातील सर्व खासदार, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, सर्व आमदारांना पत्रे पाठविणार आहे. राजर्षी शाहूंच्या कार्याची महती या सर्व खासदारांना समजावी यासाठी त्यांना ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी लिहिलेल्या ‘शाहू चरित्र’ची इंग्रजी भाषेतील आवृत्ती या पत्रासमवेत पाठविणार असल्याचे खासदार महाडिक यांनी सांगितले.