शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

राजर्षी शाहू यांना ‘भारतरत्न’ मिळण्यासाठी लोकचळवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 00:07 IST

< p >कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराज यांना ‘भारतरत्न’ किताब मिळण्यासाठी जनमताचा दबाव वाढविण्याची गरज आहे. याअंतर्गत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करणारे लेखी पत्र, प्रस्ताव पाठवायचे आहेत. त्यासाठी कोल्हापुरातून लोकचळवळ उभारली जाणार आहे. या चळवळीच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपले ठराव आणि विविध सामाजिक, शैक्षणिक, उद्योग-व्यापार, आदी क्षेत्रांतील ...

<p>कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराज यांना ‘भारतरत्न’ किताब मिळण्यासाठी जनमताचा दबाव वाढविण्याची गरज आहे. याअंतर्गत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करणारे लेखी पत्र, प्रस्ताव पाठवायचे आहेत. त्यासाठी कोल्हापुरातून लोकचळवळ उभारली जाणार आहे. या चळवळीच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपले ठराव आणि विविध सामाजिक, शैक्षणिक, उद्योग-व्यापार, आदी क्षेत्रांतील संस्था, संघटना आणि नागरिकांनी आपली पत्रे माझ्याकडे पाठवावीत, असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेद्वारे केले.खासदार महाडिक म्हणाले, राजर्षी शाहू महाराज यांना ‘भारतरत्न’ हा किताब जाहीर व्हावा, अशी मागणी संसदेमध्ये मी केली; पण केंद्र सरकारकडून हा सर्वोच्च नागरी किताब मिळवायचा असेल, तर लोकचळवळ उभारण्याची गरज आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या जनतेला सोबत घेऊन, नवी लोकचळवळ उभारली जाणार आहे. तिची सुरुवात पत्र, ठराव आणि प्रस्ताव जमा करण्यापासून होणार आहे. कोल्हापुरातील विविध क्षेत्रांतील संस्था, संघटनांनी हिंदी अथवा इंग्रजीत पत्र तयार करावे. त्यासह नागरिकांनी वैयक्तिकपणे पत्रे लिहून ती माझ्याकडे जमा करावीत. सर्व पत्रे आणि प्रस्ताव एकत्र करून, अन्य काही लोकप्रतिनिधींसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून,राजर्षी शाहू महाराज यांना ‘भारतरत्न’ किताब मिळावा, अशी विनंतीकेली जाईल. त्यासाठी कोल्हापूरकरांच्या भावना त्या पत्रांद्वारे सादर करतील. कोल्हापूरसह राज्यातील काही खासदारांचे शिष्टमंडळ बनविले जाईल. कोल्हापूरची जनभावना आणि खासदारांची एकत्र ताकद पणाला लावून, राजर्षी शाहू महाराज यांना हा सर्वोच्च किताब मिळावा यासाठी प्रयत्न केले जातील. दि. २५ आॅगस्टपर्यंत कोल्हापुरातील राजेश मोटर्सशेजारील माझ्या कार्यालयात आपले पत्र, ठराव, प्रस्ताव पोस्ट अथवा ई-मेलद्वारे जमा करावेत.‘लोकमत’ने मांडला मुद्दाकुणाला ‘भारतरत्न’ द्यावा, याचा निर्णय पंतप्रधान कार्यालय घेत असल्याने हा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच हातात आहे. देशात व राज्यातही भाजपचेच सरकार असल्याने महाराष्ट्र सरकारने त्यासाठी पंतप्रधानांकडे राजर्षी शाहू महाराजांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान मिळावा, यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी ‘लोकमत’ने शनिवार (दि. २८)च्या अंकात ‘राजर्षी शाहूंचा ‘भारतरत्न’ पंतप्रधानांच्या हातात’ या वृत्ताद्वारे मांडली. त्यानंतर हा किताब मिळविण्याच्या दिशेने लोकचळवळ उभारण्याचे पडलेले हे पाऊल महत्त्वपूर्ण ठरणार आहे.सर्व खासदारांना ‘शाहूचरित्रा’सह पाठविणार पत्रया किताबासाठीच्या मागणीला समर्थन द्यावे, यासाठी देशातील सर्व खासदार, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, सर्व आमदारांना पत्रे पाठविणार आहे. राजर्षी शाहूंच्या कार्याची महती या सर्व खासदारांना समजावी यासाठी त्यांना ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी लिहिलेल्या ‘शाहू चरित्र’ची इंग्रजी भाषेतील आवृत्ती या पत्रासमवेत पाठविणार असल्याचे खासदार महाडिक यांनी सांगितले.