शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

राजर्षी शाहू यांना ‘भारतरत्न’ मिळण्यासाठी लोकचळवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 00:07 IST

< p >कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराज यांना ‘भारतरत्न’ किताब मिळण्यासाठी जनमताचा दबाव वाढविण्याची गरज आहे. याअंतर्गत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करणारे लेखी पत्र, प्रस्ताव पाठवायचे आहेत. त्यासाठी कोल्हापुरातून लोकचळवळ उभारली जाणार आहे. या चळवळीच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपले ठराव आणि विविध सामाजिक, शैक्षणिक, उद्योग-व्यापार, आदी क्षेत्रांतील ...

<p>कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराज यांना ‘भारतरत्न’ किताब मिळण्यासाठी जनमताचा दबाव वाढविण्याची गरज आहे. याअंतर्गत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करणारे लेखी पत्र, प्रस्ताव पाठवायचे आहेत. त्यासाठी कोल्हापुरातून लोकचळवळ उभारली जाणार आहे. या चळवळीच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपले ठराव आणि विविध सामाजिक, शैक्षणिक, उद्योग-व्यापार, आदी क्षेत्रांतील संस्था, संघटना आणि नागरिकांनी आपली पत्रे माझ्याकडे पाठवावीत, असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेद्वारे केले.खासदार महाडिक म्हणाले, राजर्षी शाहू महाराज यांना ‘भारतरत्न’ हा किताब जाहीर व्हावा, अशी मागणी संसदेमध्ये मी केली; पण केंद्र सरकारकडून हा सर्वोच्च नागरी किताब मिळवायचा असेल, तर लोकचळवळ उभारण्याची गरज आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या जनतेला सोबत घेऊन, नवी लोकचळवळ उभारली जाणार आहे. तिची सुरुवात पत्र, ठराव आणि प्रस्ताव जमा करण्यापासून होणार आहे. कोल्हापुरातील विविध क्षेत्रांतील संस्था, संघटनांनी हिंदी अथवा इंग्रजीत पत्र तयार करावे. त्यासह नागरिकांनी वैयक्तिकपणे पत्रे लिहून ती माझ्याकडे जमा करावीत. सर्व पत्रे आणि प्रस्ताव एकत्र करून, अन्य काही लोकप्रतिनिधींसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून,राजर्षी शाहू महाराज यांना ‘भारतरत्न’ किताब मिळावा, अशी विनंतीकेली जाईल. त्यासाठी कोल्हापूरकरांच्या भावना त्या पत्रांद्वारे सादर करतील. कोल्हापूरसह राज्यातील काही खासदारांचे शिष्टमंडळ बनविले जाईल. कोल्हापूरची जनभावना आणि खासदारांची एकत्र ताकद पणाला लावून, राजर्षी शाहू महाराज यांना हा सर्वोच्च किताब मिळावा यासाठी प्रयत्न केले जातील. दि. २५ आॅगस्टपर्यंत कोल्हापुरातील राजेश मोटर्सशेजारील माझ्या कार्यालयात आपले पत्र, ठराव, प्रस्ताव पोस्ट अथवा ई-मेलद्वारे जमा करावेत.‘लोकमत’ने मांडला मुद्दाकुणाला ‘भारतरत्न’ द्यावा, याचा निर्णय पंतप्रधान कार्यालय घेत असल्याने हा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच हातात आहे. देशात व राज्यातही भाजपचेच सरकार असल्याने महाराष्ट्र सरकारने त्यासाठी पंतप्रधानांकडे राजर्षी शाहू महाराजांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान मिळावा, यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी ‘लोकमत’ने शनिवार (दि. २८)च्या अंकात ‘राजर्षी शाहूंचा ‘भारतरत्न’ पंतप्रधानांच्या हातात’ या वृत्ताद्वारे मांडली. त्यानंतर हा किताब मिळविण्याच्या दिशेने लोकचळवळ उभारण्याचे पडलेले हे पाऊल महत्त्वपूर्ण ठरणार आहे.सर्व खासदारांना ‘शाहूचरित्रा’सह पाठविणार पत्रया किताबासाठीच्या मागणीला समर्थन द्यावे, यासाठी देशातील सर्व खासदार, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, सर्व आमदारांना पत्रे पाठविणार आहे. राजर्षी शाहूंच्या कार्याची महती या सर्व खासदारांना समजावी यासाठी त्यांना ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी लिहिलेल्या ‘शाहू चरित्र’ची इंग्रजी भाषेतील आवृत्ती या पत्रासमवेत पाठविणार असल्याचे खासदार महाडिक यांनी सांगितले.