शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

शिरोळ दत्तच्या निवडणुकीकडे लक्ष : सा. रे. पाटील यांच्या -निधनानंतर कारखान्याची पहिलीच निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 00:08 IST

कारखान्याच्या ४२ वर्षांच्या इतिहासात मागील निवडणुकीत प्रथमच श्री दत्त साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली होती. कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक

ठळक मुद्दे२१ संचालक मंडळासाठी २७ जुलैला मतदान

संदीप बावचे ।शिरोळ : कारखान्याच्या ४२ वर्षांच्या इतिहासात मागील निवडणुकीत प्रथमच श्री दत्त साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली होती. कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. येत्या २७ जुलैला मतदान होणार आहे.

माजी आमदार स्व. सा. रे. पाटील यांच्या निधनानंतर ही पहिलीच निवडणूक होत आहे. कारखान्याच्या माध्यमातून विश्वस्त म्हणून काम करीत असताना सामाजिक विकास, वैचारिक परिवर्तन व उत्कृष्ट प्रशासनाची सांगड घालून सा. रे. पाटील यांनी काम केले होते. तीच शिदोरी घेऊन दत्त उद्योग समूहातील गणपतराव पाटील यांनी निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी ठेवली आहे.

महाराष्ट्र व कर्नाटक मल्टिस्टेट म्हणून कारखान्याचे कार्यक्षेत्र आहे. शिरोळ, हातकणंगले, करवीर, कागल, चिकोडी, अथणी तालुक्यांतील सभासदांचा यात समावेश आहे. सा. रे. पाटील यांच्या निधनानंतर दत्त उद्योग समूहाची धुरा गणपतराव पाटील यांच्याकडे आली आहे. शेतकरी व कामगार या दोन घटकांना बरोबर घेऊन गणपतराव पाटील यांनी गेल्या चार वर्षांत आपली वाटचाल सुरू ठेवली आहे.

नवनवीन प्रयोग करून क्षारपड जमीन सुधारणा, सेंद्रिय ऊस शेती, एकरी २०० टन ऊस उत्पादन यासह अनेक प्रभावी योजना कारखान्याच्या माध्यमातून राबविल्या जात आहेत.२१ संचालक मंडळाच्या निवडणुकीचे बिगुल वाजल्यामुळे या निवडणुकीकडे सभासदांचे लक्ष्य लागले आहे.

ऊसदराच्या प्रश्नावरून आंदोलन करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नेहमीच दत्त विरोधी भूमिका घेतली होती. मात्र, सा. रे. पाटील यांच्या निधनानंतर झालेल्या शोकसभा कार्यक्रमात माजी खासदार राजू शेट्टी यांनी सा. रे. पाटील यांच्यासोबत आपले केवळ वैचारिक मतभेद होते, असे सांगितले होते. दरम्यान, कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली असून, विरोधी गटाकडून पॅनेलसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र, विरोधी पॅनेलसाठी कोणता गट पुढे येणार, हे देखील महत्त्वाचे आहे. केवळ विरोधाला विरोध म्हणून विरोधी गटाकडून पॅनेल लावण्याचीही तयारी सुरू झाली आहे. मात्र, प्रत्यक्षात कोणत्याही गटाकडून अजून निवडणूक लढविण्याची घोषणा झालेली दिसून येत नाही.

मागील निवडणूक बिनविरोध करून सा. रे. पाटील यांनी दत्तवरील आपले वर्चस्व सिद्ध करून दाखविले होते. त्यांच्या निधनानंतर ही पहिलीच निवडणूक असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे दत्तच्या निवडणुकीकडे लक्ष्य केंद्रीत झाले आहे.इच्छुकांकडून फिल्डिंगसा. रे. पाटील यांच्यासह ज्येष्ठ संचालक युसूफसाहेब मेस्री, खेमा कांबळे यांच्या निधनाने या रिक्त जागांवर उमेदवार म्हणून कोणाला संधी मिळणार, याबाबत आतापासूनच उत्सुकता लागून राहिली असली, तरी सत्ताधारी गटाकडून आपल्याला संधी मिळावी, यासाठी अनेक इच्छुकांकडून फिल्डिंग लावली जात आहे. एकूण २१ संचालक निवडले जाणार असून, २७ हजार २०५ सभासद मतदानास पात्र आहेत.

टॅग्स :Electionनिवडणूकkolhapurकोल्हापूर