शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

मृत्यूच्या दाखल्यासाठी नातेवाईकांची उडते तारांबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:22 IST

कोल्हापूर : कोविडने मृत्यू झाल्यास सरकारी यंत्रणेकडूनच पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातात परंतु तोच एखाद्या कोरोना नसलेल्या रुग्णाचा घरीच ...

कोल्हापूर : कोविडने मृत्यू झाल्यास सरकारी यंत्रणेकडूनच पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातात परंतु तोच एखाद्या कोरोना नसलेल्या रुग्णाचा घरीच नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्यांचे मृत्यू प्रमाणपत्र मिळविताना नातेवाईकांची चांगलीच तारांबळ उडत आहे. मंगळवारी सकाळी देवकर पाणंदमधील एका कुटुंबाला अशाच अडचणींना सामोरे जावे लागले. तब्बल दोन-अडीच तास प्रयत्न केल्यानंतर अखेर आयसोलेशन रुग्णालयाकडूनच प्रमाणपत्र मिळाले.

घडले ते असे : या ज्येष्ठ नागरिकांचे किडनीच्या आजाराने पहाटे निधन झाले. त्यांच्यावर महावीर महाविद्यालयांजवळील एका मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात मागील आठवड्यात उपचार करण्यात आले होते. त्यामुळे निधन झाल्यावर कुटुंबीयांनी त्यांच्याकडे वैद्यकीय फाईल दाखवून मृत्यू प्रमाणपत्राची विनंती केली; परंतु त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. अन्य चार ते पाच खासगी डॉक्टर्सना संपर्क साधण्यात आला; परंतु आम्ही रुग्णाला पाहिले नसल्याने मृत्यू प्रमाणपत्र कसे देणार, अशी विचारणा करून त्यांनी असमर्थता दाखविली. त्यामुळे अंत्यसंस्कारासही तास-दीड तास विलंब झाला. अखेर आयसोलेशन रुग्णालयाशी संपर्क साधण्यात आला. तिथे कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर मग साडेआठ वाजण्याच्या सुमारास प्रमाणपत्र मिळाले. शेवटी महापालिकेचीच यंत्रणा अखेरच्या घटकेलाही उपयोगी पडल्याची भावना कुटुंबीयांनी व्यक्त केली.

------

ही लागतात कागदपत्रे

महापालिकेच्या आयसोलेशन किंवा अन्य कोणत्याही दवाखान्यातून मृत्यूचा दाखला हवा असल्यास ज्या व्यक्तीचे निधन झाले आहे, त्याच्या आधारकार्डची झेरॉक्स व त्यांच्या कुटुंबीयांच्या संबंधित व्यक्तीची आधारकार्ड झेरॉक्स जोडून अर्ज दिल्यानंतर त्या दवाखान्यातून वैद्यकीय अधिकारी निधन झालेल्या व्यक्तीच्या घरी येतात व तपासणी करून मृत्यू झाल्याचे प्रमाणपत्र देतात; परंतु व्यक्तीचे निधन रात्री-अपरात्री झाल्यावर झेरॉक्सपासून अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते.