शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मजले ग्रामस्थ पाणीदार चळवळीसाठी एकवटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 00:18 IST

बाहुबली : वेळ पहाटे पाचची, २५ ते ३0 तरुणांचं टोळकं अंधार कापत झपाझप पावलं टाकत डोंगरावर चढतात. सगळ्यांच्या हातात खोरे, टिकाव, पाटी. तब्बल दोन तास घामटा फुटेपर्यंत राबतात. अन् पुन्हा साडेसातला डोंगरावरून उतरतात. हा दिनक्रम तब्बल दोन महिन्यांपासून सुरू आहे. कारण आहे आपल्या गावाला पाणीदार करायचे. गेल्या अनेक दशकांपासून मजले ...

बाहुबली : वेळ पहाटे पाचची, २५ ते ३0 तरुणांचं टोळकं अंधार कापत झपाझप पावलं टाकत डोंगरावर चढतात. सगळ्यांच्या हातात खोरे, टिकाव, पाटी. तब्बल दोन तास घामटा फुटेपर्यंत राबतात. अन् पुन्हा साडेसातला डोंगरावरून उतरतात. हा दिनक्रम तब्बल दोन महिन्यांपासून सुरू आहे. कारण आहे आपल्या गावाला पाणीदार करायचे. गेल्या अनेक दशकांपासून मजले (ता. हातकणंगले) गावात प्रचंड पाणी टंचाई आहे. त्यामुळे डिसेंबर संपला की गावकऱ्यांची बेचैनी वाढू लागते. जानेवारीपासूनच पाण्यासाठी चारी दिशा भटकाव्या लागते. नागरिकांनी पाणी फौंडेशनच्या मदतीने शोधायचे ठरविले आणि त्याला मूर्त रूप देण्यासाठी गेले दोन महिने श्रमदानातून गाव पाणीदार करण्यासाठी ग्रामस्थांचे पाय डोंगराकडे चालू लागले.कोल्हापूर जिल्हा तसा पाणीदार जिल्हा म्हणून ओळखला जातो; पण हातकणंगलेपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या डोंगराच्या कुशितील मजले गावाची परिस्थिती भीषण आहे. जानेवारी, फेब्रुवारी महिन्यांमध्ये गावातील सर्व तलाव, बोअर, विहिरी तळ गाठतात आणि सुरू होते पाण्यासाठी पायपीट. या गावासह १४ गावांसाठी एकत्रित पाणी योजना पंचगंगा नदीतूून करण्यात आली आहे; परंतु त्याची अनियमितता नेहमीचीच असते. त्यामुळे पाण्यासाठी वणवण ही ठरलेलीच आहे. आजूबाजूची सर्व गावे पाण्यानी संपन्न आहेत; पण कोणत्या कारणाने या गावच्या पाण्यासारख्या गंभीर प्रश्नाचीे शासन दरबारी दखल घेतली जात नाही. शासनाच्या नाकर्तेपणाची चर्चा न करता गावातील तरुण वर्गाने एकत्र येऊन यावर कायमस्वरूपी उपाय शोधण्याचे ठरविले. या तरुणांनी एकत्र येऊन पाणी फौंडेशनच्या उपक्रमाचा अभ्यास करून श्रमदानातून काम सुरू केले आहे.यानिमित्ताने युवा वर्ग एकत्र आला आणि अनेक बैठका करून काम तडीस नेण्याचे ठरविले. नियोजनानुसार गावच्या उत्तरेला असणाºया तब्बल १0२ हेक्टर डोंगराचा उपयोग करून घ्यावयाचे ठरविले. ‘पाणी आडवा पाणी जिरवा’ या संकल्पनेतून दोन महिन्यांपूर्वी श्रमदानास सुरुवात केली. दरम्यान, यासाठी अमिर खान यांच्या पाणी फौंडेशनचा अभ्यास दौरा केला. हिवरे बाजार, सातारा जिल्ह्यातील वेळू या गावांचा अभ्यास दौरा केला. डोंगरावर बंधारे बांधण्यास सुरुवात केली. छोटे-छोटे बंधारे त्याचबरोबर पाणी वाया जाऊ नये यासाठी दक्षता घेऊन काम सुरू आहे. यामुळे पाण्यासाठीची भटकंती थांबणार आहे.मदतीची आवश्यकता1 या गावातील कष्ट करणाºया ग्रामस्थांना आता आवश्यकता आहे ती मदतीची. कारण आता पावसाळ्यापूर्वी तालावातील गाळ काढणे आवश्यक असल्याने त्यासाठी लागणारा खर्च फार मोठा आहे. ते काम मनुष्याकरवी करणेही शक्य नाही. त्यामुळे समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन गावाके सुरू केलेल्या या कामास आर्थिक मदत करण्याची गरज आहे.2 पाणी फौंडेशनच्या माध्यमातून मजले गावातीलच, पण बाहेर नोकरी अथवा व्यवसाय करणाºया गावच्या व्यक्तींना देखील मदतीचे आवाहन केले आहेच. विशेष म्हणजे त्याला काहीअंशी यश देखील मिळत आहे; परंतु येणारा खर्च पाहता जिल्ह्यासह राज्यातील दानशूर व्यक्ती अथवा संस्थांनी मदत करावे, असे आवाहन गावकºयांनी केले आहे.