शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

मजले ग्रामस्थ पाणीदार चळवळीसाठी एकवटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 00:18 IST

बाहुबली : वेळ पहाटे पाचची, २५ ते ३0 तरुणांचं टोळकं अंधार कापत झपाझप पावलं टाकत डोंगरावर चढतात. सगळ्यांच्या हातात खोरे, टिकाव, पाटी. तब्बल दोन तास घामटा फुटेपर्यंत राबतात. अन् पुन्हा साडेसातला डोंगरावरून उतरतात. हा दिनक्रम तब्बल दोन महिन्यांपासून सुरू आहे. कारण आहे आपल्या गावाला पाणीदार करायचे. गेल्या अनेक दशकांपासून मजले ...

बाहुबली : वेळ पहाटे पाचची, २५ ते ३0 तरुणांचं टोळकं अंधार कापत झपाझप पावलं टाकत डोंगरावर चढतात. सगळ्यांच्या हातात खोरे, टिकाव, पाटी. तब्बल दोन तास घामटा फुटेपर्यंत राबतात. अन् पुन्हा साडेसातला डोंगरावरून उतरतात. हा दिनक्रम तब्बल दोन महिन्यांपासून सुरू आहे. कारण आहे आपल्या गावाला पाणीदार करायचे. गेल्या अनेक दशकांपासून मजले (ता. हातकणंगले) गावात प्रचंड पाणी टंचाई आहे. त्यामुळे डिसेंबर संपला की गावकऱ्यांची बेचैनी वाढू लागते. जानेवारीपासूनच पाण्यासाठी चारी दिशा भटकाव्या लागते. नागरिकांनी पाणी फौंडेशनच्या मदतीने शोधायचे ठरविले आणि त्याला मूर्त रूप देण्यासाठी गेले दोन महिने श्रमदानातून गाव पाणीदार करण्यासाठी ग्रामस्थांचे पाय डोंगराकडे चालू लागले.कोल्हापूर जिल्हा तसा पाणीदार जिल्हा म्हणून ओळखला जातो; पण हातकणंगलेपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या डोंगराच्या कुशितील मजले गावाची परिस्थिती भीषण आहे. जानेवारी, फेब्रुवारी महिन्यांमध्ये गावातील सर्व तलाव, बोअर, विहिरी तळ गाठतात आणि सुरू होते पाण्यासाठी पायपीट. या गावासह १४ गावांसाठी एकत्रित पाणी योजना पंचगंगा नदीतूून करण्यात आली आहे; परंतु त्याची अनियमितता नेहमीचीच असते. त्यामुळे पाण्यासाठी वणवण ही ठरलेलीच आहे. आजूबाजूची सर्व गावे पाण्यानी संपन्न आहेत; पण कोणत्या कारणाने या गावच्या पाण्यासारख्या गंभीर प्रश्नाचीे शासन दरबारी दखल घेतली जात नाही. शासनाच्या नाकर्तेपणाची चर्चा न करता गावातील तरुण वर्गाने एकत्र येऊन यावर कायमस्वरूपी उपाय शोधण्याचे ठरविले. या तरुणांनी एकत्र येऊन पाणी फौंडेशनच्या उपक्रमाचा अभ्यास करून श्रमदानातून काम सुरू केले आहे.यानिमित्ताने युवा वर्ग एकत्र आला आणि अनेक बैठका करून काम तडीस नेण्याचे ठरविले. नियोजनानुसार गावच्या उत्तरेला असणाºया तब्बल १0२ हेक्टर डोंगराचा उपयोग करून घ्यावयाचे ठरविले. ‘पाणी आडवा पाणी जिरवा’ या संकल्पनेतून दोन महिन्यांपूर्वी श्रमदानास सुरुवात केली. दरम्यान, यासाठी अमिर खान यांच्या पाणी फौंडेशनचा अभ्यास दौरा केला. हिवरे बाजार, सातारा जिल्ह्यातील वेळू या गावांचा अभ्यास दौरा केला. डोंगरावर बंधारे बांधण्यास सुरुवात केली. छोटे-छोटे बंधारे त्याचबरोबर पाणी वाया जाऊ नये यासाठी दक्षता घेऊन काम सुरू आहे. यामुळे पाण्यासाठीची भटकंती थांबणार आहे.मदतीची आवश्यकता1 या गावातील कष्ट करणाºया ग्रामस्थांना आता आवश्यकता आहे ती मदतीची. कारण आता पावसाळ्यापूर्वी तालावातील गाळ काढणे आवश्यक असल्याने त्यासाठी लागणारा खर्च फार मोठा आहे. ते काम मनुष्याकरवी करणेही शक्य नाही. त्यामुळे समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन गावाके सुरू केलेल्या या कामास आर्थिक मदत करण्याची गरज आहे.2 पाणी फौंडेशनच्या माध्यमातून मजले गावातीलच, पण बाहेर नोकरी अथवा व्यवसाय करणाºया गावच्या व्यक्तींना देखील मदतीचे आवाहन केले आहेच. विशेष म्हणजे त्याला काहीअंशी यश देखील मिळत आहे; परंतु येणारा खर्च पाहता जिल्ह्यासह राज्यातील दानशूर व्यक्ती अथवा संस्थांनी मदत करावे, असे आवाहन गावकºयांनी केले आहे.