शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

मजले ग्रामस्थ पाणीदार चळवळीसाठी एकवटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 00:18 IST

बाहुबली : वेळ पहाटे पाचची, २५ ते ३0 तरुणांचं टोळकं अंधार कापत झपाझप पावलं टाकत डोंगरावर चढतात. सगळ्यांच्या हातात खोरे, टिकाव, पाटी. तब्बल दोन तास घामटा फुटेपर्यंत राबतात. अन् पुन्हा साडेसातला डोंगरावरून उतरतात. हा दिनक्रम तब्बल दोन महिन्यांपासून सुरू आहे. कारण आहे आपल्या गावाला पाणीदार करायचे. गेल्या अनेक दशकांपासून मजले ...

बाहुबली : वेळ पहाटे पाचची, २५ ते ३0 तरुणांचं टोळकं अंधार कापत झपाझप पावलं टाकत डोंगरावर चढतात. सगळ्यांच्या हातात खोरे, टिकाव, पाटी. तब्बल दोन तास घामटा फुटेपर्यंत राबतात. अन् पुन्हा साडेसातला डोंगरावरून उतरतात. हा दिनक्रम तब्बल दोन महिन्यांपासून सुरू आहे. कारण आहे आपल्या गावाला पाणीदार करायचे. गेल्या अनेक दशकांपासून मजले (ता. हातकणंगले) गावात प्रचंड पाणी टंचाई आहे. त्यामुळे डिसेंबर संपला की गावकऱ्यांची बेचैनी वाढू लागते. जानेवारीपासूनच पाण्यासाठी चारी दिशा भटकाव्या लागते. नागरिकांनी पाणी फौंडेशनच्या मदतीने शोधायचे ठरविले आणि त्याला मूर्त रूप देण्यासाठी गेले दोन महिने श्रमदानातून गाव पाणीदार करण्यासाठी ग्रामस्थांचे पाय डोंगराकडे चालू लागले.कोल्हापूर जिल्हा तसा पाणीदार जिल्हा म्हणून ओळखला जातो; पण हातकणंगलेपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या डोंगराच्या कुशितील मजले गावाची परिस्थिती भीषण आहे. जानेवारी, फेब्रुवारी महिन्यांमध्ये गावातील सर्व तलाव, बोअर, विहिरी तळ गाठतात आणि सुरू होते पाण्यासाठी पायपीट. या गावासह १४ गावांसाठी एकत्रित पाणी योजना पंचगंगा नदीतूून करण्यात आली आहे; परंतु त्याची अनियमितता नेहमीचीच असते. त्यामुळे पाण्यासाठी वणवण ही ठरलेलीच आहे. आजूबाजूची सर्व गावे पाण्यानी संपन्न आहेत; पण कोणत्या कारणाने या गावच्या पाण्यासारख्या गंभीर प्रश्नाचीे शासन दरबारी दखल घेतली जात नाही. शासनाच्या नाकर्तेपणाची चर्चा न करता गावातील तरुण वर्गाने एकत्र येऊन यावर कायमस्वरूपी उपाय शोधण्याचे ठरविले. या तरुणांनी एकत्र येऊन पाणी फौंडेशनच्या उपक्रमाचा अभ्यास करून श्रमदानातून काम सुरू केले आहे.यानिमित्ताने युवा वर्ग एकत्र आला आणि अनेक बैठका करून काम तडीस नेण्याचे ठरविले. नियोजनानुसार गावच्या उत्तरेला असणाºया तब्बल १0२ हेक्टर डोंगराचा उपयोग करून घ्यावयाचे ठरविले. ‘पाणी आडवा पाणी जिरवा’ या संकल्पनेतून दोन महिन्यांपूर्वी श्रमदानास सुरुवात केली. दरम्यान, यासाठी अमिर खान यांच्या पाणी फौंडेशनचा अभ्यास दौरा केला. हिवरे बाजार, सातारा जिल्ह्यातील वेळू या गावांचा अभ्यास दौरा केला. डोंगरावर बंधारे बांधण्यास सुरुवात केली. छोटे-छोटे बंधारे त्याचबरोबर पाणी वाया जाऊ नये यासाठी दक्षता घेऊन काम सुरू आहे. यामुळे पाण्यासाठीची भटकंती थांबणार आहे.मदतीची आवश्यकता1 या गावातील कष्ट करणाºया ग्रामस्थांना आता आवश्यकता आहे ती मदतीची. कारण आता पावसाळ्यापूर्वी तालावातील गाळ काढणे आवश्यक असल्याने त्यासाठी लागणारा खर्च फार मोठा आहे. ते काम मनुष्याकरवी करणेही शक्य नाही. त्यामुळे समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन गावाके सुरू केलेल्या या कामास आर्थिक मदत करण्याची गरज आहे.2 पाणी फौंडेशनच्या माध्यमातून मजले गावातीलच, पण बाहेर नोकरी अथवा व्यवसाय करणाºया गावच्या व्यक्तींना देखील मदतीचे आवाहन केले आहेच. विशेष म्हणजे त्याला काहीअंशी यश देखील मिळत आहे; परंतु येणारा खर्च पाहता जिल्ह्यासह राज्यातील दानशूर व्यक्ती अथवा संस्थांनी मदत करावे, असे आवाहन गावकºयांनी केले आहे.