शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

पुरामुळे सात व्यक्ती व २७ जनावरांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:22 IST

जिल्हा परिषदेत झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पूरस्थितीचा आढावा घेतला. ते म्हणाले की, पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या ५४.५ ...

जिल्हा परिषदेत झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पूरस्थितीचा आढावा घेतला. ते म्हणाले की, पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या ५४.५ फुटावर असून, संथ गतीने पाणी ओसरत आहे. जिल्ह्यात एनडीआरएफच्या ६ तुकड्या दाखल झाल्या असून, बचाव कार्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. भारतीय लष्कर दलाची ७० जवानांची एक तुकडी शिरोळ परिसरातील मदत कार्यासाठी दाखल झाली आहे.

बाधित कुटुंबांना गहू, तांदूळ व तूर डाळ मोफत देण्यात येणार आहे.

सध्या राष्ट्रीय महामार्ग एनएच ४, २५ पैकी १७ राज्य मार्ग पाण्याखाली असल्याने बंद आहेत, तर १५ पुलांवर पाणी आले आहे. जिल्ह्यात ११२ जिल्हा मार्ग असून, त्यापैकी ५५ मार्ग व ३२ पूल पाण्याखाली गेल्याने बंद आहेत. पूर ओसरल्यानंतर रोगराई पसरु नये म्हणून स्वच्छता व आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.

---

पाणी पुरवठाही ठप्प

पुरामुळे ३९९ नळ पाणी पुरवठा केंद्रे बंद असून, तीन केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. येत्या २४ तासांत ३८ केंद्रे तर ४८ तासांत ८२ केंद्रे सुरू होतील. पुढील पाच दिवसात उर्वरित २९६ केंद्रे सुरू करण्याचे नियोजन केले आहे.

----

महावितरणची १० उपकेंद्रे बंद

महापुरामुळे महावितरणची जिल्ह्यातील १० उपकेंद्रे व ७५ हजार वीज वाहिन्या बंद आहेत. याचा १११ गावांना पूर्ण फटका बसला आहे, तर ३४ गावे अंशत: बाधित झाली आहेत. यामुळे १ लाख १२ हजार ९६१ ग्राहकांच्या वीज पुरवठ्यावर परिणाम झाला आहे.

---

नातेवाइकांकडे स्थलांतरीत : ६७ हजार १११

निवारा कक्षेत : ८ हजार ९१५

कोविड रुग्ण- छावणीमध्ये स्थलांतरीत :- ४२

स्थलांतरीत जनावरे- २५ हजार ५७३

पूरबाधित गावे: ३६६

जनावरांचा मृत्यू : २७

---

धरणक्षेत्रातील पाऊस(मीमी) आजपर्यंत : गतवर्षी (२०२०),

राधानगरी : २६०० : १९००

तुळशी- २८४४ : १०९८

कासारी- २७१७ : १७९७

कुंभी- ४३५२ : ३५९७

कोल्हापूर: ९४३ : ४२७

----

दिव्यांगांना अनुदान

जिल्ह्यातील दिव्यांगांना प्रत्येक व्यक्तीला ५०० रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील २४ हजार लाभार्थ्यांना १ कोटी २१ लाख २१ हजार रुपये जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत वाटप करण्यात येणार आहेत.

---

गर्भवतींची काळजी

या दोन दिवसात जिल्ह्यातील पूरबाधित गावांतील ९० गर्भवती महिलांचे सुरक्षित स्थलांतर करून त्यांना पुढील उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. यापैकी ४ महिलांची यशस्वी प्रसूती झाली आहे.

----