शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

पुरामुळे सात व्यक्ती व २७ जनावरांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:22 IST

जिल्हा परिषदेत झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पूरस्थितीचा आढावा घेतला. ते म्हणाले की, पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या ५४.५ ...

जिल्हा परिषदेत झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पूरस्थितीचा आढावा घेतला. ते म्हणाले की, पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या ५४.५ फुटावर असून, संथ गतीने पाणी ओसरत आहे. जिल्ह्यात एनडीआरएफच्या ६ तुकड्या दाखल झाल्या असून, बचाव कार्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. भारतीय लष्कर दलाची ७० जवानांची एक तुकडी शिरोळ परिसरातील मदत कार्यासाठी दाखल झाली आहे.

बाधित कुटुंबांना गहू, तांदूळ व तूर डाळ मोफत देण्यात येणार आहे.

सध्या राष्ट्रीय महामार्ग एनएच ४, २५ पैकी १७ राज्य मार्ग पाण्याखाली असल्याने बंद आहेत, तर १५ पुलांवर पाणी आले आहे. जिल्ह्यात ११२ जिल्हा मार्ग असून, त्यापैकी ५५ मार्ग व ३२ पूल पाण्याखाली गेल्याने बंद आहेत. पूर ओसरल्यानंतर रोगराई पसरु नये म्हणून स्वच्छता व आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.

---

पाणी पुरवठाही ठप्प

पुरामुळे ३९९ नळ पाणी पुरवठा केंद्रे बंद असून, तीन केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. येत्या २४ तासांत ३८ केंद्रे तर ४८ तासांत ८२ केंद्रे सुरू होतील. पुढील पाच दिवसात उर्वरित २९६ केंद्रे सुरू करण्याचे नियोजन केले आहे.

----

महावितरणची १० उपकेंद्रे बंद

महापुरामुळे महावितरणची जिल्ह्यातील १० उपकेंद्रे व ७५ हजार वीज वाहिन्या बंद आहेत. याचा १११ गावांना पूर्ण फटका बसला आहे, तर ३४ गावे अंशत: बाधित झाली आहेत. यामुळे १ लाख १२ हजार ९६१ ग्राहकांच्या वीज पुरवठ्यावर परिणाम झाला आहे.

---

नातेवाइकांकडे स्थलांतरीत : ६७ हजार १११

निवारा कक्षेत : ८ हजार ९१५

कोविड रुग्ण- छावणीमध्ये स्थलांतरीत :- ४२

स्थलांतरीत जनावरे- २५ हजार ५७३

पूरबाधित गावे: ३६६

जनावरांचा मृत्यू : २७

---

धरणक्षेत्रातील पाऊस(मीमी) आजपर्यंत : गतवर्षी (२०२०),

राधानगरी : २६०० : १९००

तुळशी- २८४४ : १०९८

कासारी- २७१७ : १७९७

कुंभी- ४३५२ : ३५९७

कोल्हापूर: ९४३ : ४२७

----

दिव्यांगांना अनुदान

जिल्ह्यातील दिव्यांगांना प्रत्येक व्यक्तीला ५०० रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील २४ हजार लाभार्थ्यांना १ कोटी २१ लाख २१ हजार रुपये जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत वाटप करण्यात येणार आहेत.

---

गर्भवतींची काळजी

या दोन दिवसात जिल्ह्यातील पूरबाधित गावांतील ९० गर्भवती महिलांचे सुरक्षित स्थलांतर करून त्यांना पुढील उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. यापैकी ४ महिलांची यशस्वी प्रसूती झाली आहे.

----