शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
5
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
6
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
7
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
8
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
9
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
10
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
11
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
12
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
13
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
14
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
15
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
16
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
17
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
18
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
19
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

पूरस्थिती कायम; पंचगंगेची पातळी उतरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 12:52 AM

पूरस्थिती कायम; पंचगंगेची पातळी उतरली

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या पाच-सहा दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाचा जोर रविवारी कमी झाला. पंचगंगेची पातळी कमी होऊन ४१ फूट ३ इंचांवर आली असली तरी पूरस्थिती कायम आहे. धरणक्षेत्रात सुरू असलेल्या पावसाने राधानगरी धरण ९२ टक्के भरून २२०० क्युसेक प्रतिसेकंद विसर्ग सुरू राहिला. पावसाचा जोर ओसरला तरी पूरस्थिती कायम होती. पंचगंगेची पातळी इंचइंचाने कमी होत असली तरी पसरलेले पाणी रस्त्यांवर असल्याने अद्याप राज्यमार्गांसह अन्य ३१ मार्ग बंद असून, ५५ बंधारे पाण्याखाली आहेत.जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला. रविवारी सकाळपर्यंत गेल्या चोवीस तासांत १७९.०३ मि.मी. पावसाची नोंद झाली असून यामध्ये गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक ३१.५० मि.मी. पाऊस पडला. त्याखालोखाल आजरा, राधानगरी, चंदगड, शाहूवाडी, पन्हाळा तालुक्यांत पाऊस झाला. धरणक्षेत्रातील पावसाने रविवारी राधानगरी धरणामध्ये भर पडून ते ९२ टक्के भरले. येथून २२०० क्युसेक प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग सुरू राहिला. पावसाचा जोर कमी झाल्याने पंचगंगेची पाणीपातळी रविवारी दिवसभरात इंचाइंचाने कमी झाली. यामध्ये शनिवारी (दि. २२) धोक्याच्या पातळीजवळ ४१ फूट ९ इंचांवर असलेली पंचगंगेची पातळी कमी होऊन ती रविवारी सायंकाळी सहापर्यंत ४१ फूट ३ इंचांवर आली. अद्याप पाणी धोक्याच्या पातळीजवळ असल्याने पूरस्थिती कायम आहे.एस.टी.चे २९ वाहतूक मार्ग बंदअतिवृष्टीने जिल्ह्यातील २९ मार्गांवरील एस. टी. बसची वाहतूक अंशत: तसेच पूर्णत: बंद करण्यात आली असून, काही ठिकाणी पर्यायी मार्गांनी वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. कोल्हापूर-रत्नागिरी, गारगोटी-सावर्डे, गारगोटी-बाचणी, गारगोटी-केळेवाडी, गारगोटी-मालवाडी, मलकापूर-गावडी, कोल्हापूर-गगनबावडा, कोल्हापूर-रंकाळा, रंकाळा-बावेली, रंकाळा-कुंभवडे, रंकाळा-चौके, रंकाळा-बुरंबाळ, रंकाळा-स्वयंभूवाडी, रंकाळा-गगनबावडा, रंकाळा-अणुस्कुरा, रंकाळा-गुडाळ, रंकाळा-भोगावती, रंकाळा-तारळे, इचलकरंजी-कागल, इचलकरंजी-बोरगाव, कागल-बस्तवडे, कागल-नंद्याळ, कागल-इचलकरंजी, राधानगरी-तारळे, राधानगरी-शिरगाव, गगनबावडा-कोल्हापूर, गगनबावडा-धुंदवडे या मार्गांवरील वाहतूक अंशत: व पूर्णत: बंद झाली आहे.पावणेपाच लाखांचे नुकसानकागल, भुदरगड, शाहूवाडी, करवीर, राधानगरी तालुक्यांत पावसामुळे पक्क्या व कच्च्या घरांसह जनावरांच्या गोठ्यांची पडझड होऊन १९ सार्वजनिक व खासगी मालमत्तेचे ४ लाख ८८ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले. जिल्ह्यात ४०८.२५ मिलिमीटर पाऊसजिल्ह्यात गेल्या २४ तासांत रविवारी सकाळी आठपर्यंत १७९.०३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक गगनबावडा तालुक्यात ३१.५० मि.मी., राधानगरीमध्ये २०.३३ मि.मी., चंदगडमध्ये २३.८३ मि.मी., आजऱ्यात २६.५० मि.मी., कागलमध्ये ५.७१ मि.मी., शाहूवाडीत २३.३३ मि.मी., भुदरगडमध्ये १२.०० मि.मी., हातकणंगलेमध्ये २.८७ मि.मी., शिरोळमध्ये १.८५ मि.मी., पन्हाळ्यात २४.५७ मि.मी., करवीरमध्ये ४.५४ मि.मी., गडहिंग्लज मध्ये २.०० मि.मी. पाऊस पडला आहे.जिल्ह्यातील ३१ मार्ग बंदजिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे पाच राज्यमार्गांसह नऊ प्रमुख जिल्हा, १२ इतर जिल्हा व पाच ग्रामीण असे ३१ मार्ग बंद झाले आहेत. यामध्ये चंदगड-इब्राहिमपूर-चितळे-शिगरवाडी-आजरा, कोल्हापूर-गारगोटी-गडहिंग्लज-चंदगड, कोल्हापूर-चिखली-यवलूज-पुनाळ-बाजारभोगाव-करंजफेण, आदी प्रमुख राज्यमार्ग; शेणवडे-अणदूर-धुंदवडे-राशिवडे, येवती-बाचणी-साके-सावर्डे, आकनूर-खिंडी व्हरवडे-गुडाळ-तारळे-पडसाळी-गारिवडे, आदी प्रमुख जिल्हा मार्ग, शाहूवाडी-कोळगाव-टेकोली-पणुंद्रे, कुडित्रे-वाकरेपाटी-खुपिरे-शिंदेवाडी, कोल्हापूर-वाघाची तालीम उत्तरेश्वर पेठ-शिंगणापूर, आदी इतर जिल्हा मार्ग व शिरोळ-सोंडमोळी, आरे-सावरवाडी, म्हसवे-गारगोटी, इचलकरंजी-चंदूर-रुई, तिसंगी-टेकवाडी, आदी ग्रामीण मार्गांचा समावेश आहे.