शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

महापुराने शेतीचे ६६ कोटींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापू : जिल्ह्यातील पंचगंगा, भोगावतीसह इतर नद्या व ओढ्यांना आलेल्या पुराने ५८ हजार ५०० हेक्टरमधील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापू : जिल्ह्यातील पंचगंगा, भोगावतीसह इतर नद्या व ओढ्यांना आलेल्या पुराने ५८ हजार ५०० हेक्टरमधील पिके बाधित झाली आहेत. यामुळे साधारणत: ६६ कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शिवारातील पाणी कमी झाल्यानंतर नुकसानाचे पंचनामे केले जाणार आहेत. शिरोळ, हातकणंगले आणि करवीर तालुक्यातील पिकांचे जास्त नुकसान झाले आहे.

महापुरामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. पंचगंगा, भोगावती, कुंभी, कासारी, वारणासह इतर नद्या व ओढ्यांच्या परिसरातील भात, सोयाबीन, भुईमूग ही पिके अक्षरश: उद्ध्वस्त झाली आहेत. अनेक ठिकाणी उभ्या पिकांसह जमिनी वाहून गेल्या आहेत. पाऊस कमी झाला असला तरी पिके अद्याप पाण्याखाली आहेत. शिरोळ तालुक्यात सर्वाधिक २० हजार हेक्टरवरील क्षेत्र बाधित झाले आहे. त्यापाठोपाठ करवीर, हातकणंगले, चंदगड तालुक्यातील हजारो हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे.

सध्या पुराचे पाणी ओसरु लागले असले तरी अद्याप पिके पाण्यात आहेत. पावसाने अशीच उसंत दिली तर आणखी तीन, चार दिवसांनी पिकांचे पंचनामे सुरु होऊ शकतात.

कोटः

नजर अंदाजानुसार जिल्ह्यात ५८ हजार ५०० हेक्टरवरील पिके बाधित झाली आहेत. पाऊस थांबला असला तरी शिवारात अद्याप पाणी आहे. त्यामुळे तीन-चार दिवसात पंचनामे सुरु होतील.

- ज्ञानदेव वाकुरे

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर.

नजर अंदाजानुसार बाधित क्षेत्र, हेक्टरमध्ये

तालुका बाधित क्षेत्र

शिरोळ : २० हजार

करवीर - ७ हजार

हातकणंगले - ७ हजार ५००

चंदगड - २ हजार १००

पन्हाळा - ३ हजार ३००

राधानगरी - ३ हजार ६००

भुदरगड - ३ हजार ९००

गगनबावडा - ९००

शाहुवाडी - २ हजार २००

आजरा - १ हजार ३००

गडहिंग्लज- १ हजार ६००

कागल - ३ हजार ६००