शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

पूरबाधित नुकसानीची माहिती एका क्लिकवर --ज्ञानदेव वाकुरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 23:42 IST

शेतकऱ्यांचे काम कुठेही अडता कामा नये, हेच माझे आजवरचे धोरण राहिले आहे. स्वत: कधी चहा घेत नाही. बाहेर गेलो तरी स्वत:चा डबा जवळ असतो; त्यामुळे कुणाच्या मिंध्यात असण्याचे कारण नाही. जे करायचे ते उत्तमच आणि सर्वांना विश्वासात घेऊनच. साहजिकच याचा परिणाम इतर सहकाऱ्यांवर दिसत असून, कृषी विभागाची प्रतिमाही बदलू लागली आहे. - ज्ञानदेव वाकुरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर

नसिम सनदी।कोल्हापूर : पूरबाधित गावातील पिकांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध करून देण्याचे शिवधनुष्य जिल्'ाच्या कृषी विभागाने यशस्वीपणे पेलले आहे. ड्रोन आणि सॅटेलाईट इमेजचा वापर करून तब्बल २८६ गावांतील पूरबुडीत पिकांचे पंचनामे पूर्ण करून ठेवले आहेत. ही सगळी माहिती आता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाईटवर अपलोड केली जात आहे. राज्यात पहिल्यांदाच अशा प्रकारचा उपक्रम राबविणारे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांच्याशी यानिमित्ताने साधलेला हा थेट संवाद.

प्रश्न : पंचनाम्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा केला?उत्तर : मुळातच कृषी विभागाकडे मनुष्यबळ अपुरे आहे. महापुरामुळे बाधित क्षेत्राचे प्रमाण जास्त होते. कमी कालावधीत एवढ्या प्रमाणावरील क्षेत्रात पोहोचणे अवघड असल्यानेच ड्रोन आणि सॅटेलाईटचा आधार घेतला. जवळपास ५०० कर्मचाºयांनी रात्रंदिवस सलग तीन आठवडे काम करून २८६ गावांतील ७८ हजार हेक्टर क्षेत्रावरील तीन लाख आठ हजार शेतकºयांचे पीक नुकसानीचे पंचनामे तयार केले. पाणी कुठवर पसरले आहे, याचे नकाशेही तयार केले आहेत. आता या सर्व माहितीचे वेबसाईटवर अपलोडिंग होणार आहे. आता परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज घेण्यासाठीची या तंत्राचा चांगल्या प्रकारे वापर करता येणार आहे.

प्रश्न : जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारीपदी नियुक्ती होऊन वर्ष झाले. वाटचालीतील ठळक बाबी कोणत्या?उत्तर : वर्षभरात खूप चांगले काम करता आले. मी स्वत: काम करतो, इतरांनीही चांगले काम करावे, असा आग्रह असतो. कोणावर कारवाई करण्यापेक्षा चूक दाखवून देऊन त्यांच्याकडून काम करवून घेण्यावर माझा कायम भर राहिला आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरात कृषी विभागात कधी वादाचे प्रसंग घडले नाहीत. सर्वांना सोबत घेऊनच काम केल्याने राज्यात कोल्हापूरने आदर्शवत काम केले आहे. यात विशेष करून गटशेतीचा उल्लेख करावा लागेल. १३ गटांची स्थापना करून पाच कोटी ७० लाखांचे अनुदान मिळाले. राज्यात हे दुसºया क्रमांकाचे काम आहे. बुलढाणा राज्यात प्रथम क्रमांकावर असला तरी गुणवत्तेच्या बाबतीत कोल्हापूरच पहिल्या क्रमांकाचा मानकरी आहे.

प्रश्न : कृषी योजना राबविताना काय दक्षता घेतली?उत्तर : योजनांचा लाभ देताना जाणीवपूर्वक दिरंगाई होते, असा आरोप होत होता, तो पहिल्यांदा खोडून काढण्याचा मी प्रयत्न केला. रोजच्या रोज पाठपुरावा करून कमीत कमी वेळेत लाभ मिळेल याकडे लक्ष दिले. यावर्षी तब्बल साडेतेरा कोटींची अवजारे विनातक्रार शेतकºयांच्या दारात पोहोचली. शेतकरी सन्मान योजनेचे काम तर मध्यरात्रीपर्यंत थांबून पूर्ण केले.सायकलवरून फिरणारा कृषी अधिकारीवाकुरे सायकलवरून थेट शेतकºयांच्या बांधावर जाणारे जिल्'ातीलच नव्हे तर राज्यातील पहिले कृषी अधिकारी आहेत. कुठल्याही तालुक्यात दौरा असू दे; ते गाडीला सायकल बांधूनच घेऊन जातात. रोज सकाळी किमान २५ किलोमीटर ते सायकलिंग करतातच. शिवाय बैठकीला गेले की वेळ मिळेल तशी सायकल काढून थेट शेतकºयांच्या बांधावर जातात.

आपली ओळख न सांगता शेतकºयांना भेटतात, अडीअडचणी समजून घेतात, परत कार्यालयात आल्यानंतर त्याची पडताळणी करून यंत्रणेला कामालाही लावतात. गेल्या वर्षभरात जवळपास ९0 हून अधिक गावांना त्यांनी अशाच सायकलीद्वारे भेटी दिल्या आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfloodपूर