शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पूरबाधित नुकसानीची माहिती एका क्लिकवर --ज्ञानदेव वाकुरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 23:42 IST

शेतकऱ्यांचे काम कुठेही अडता कामा नये, हेच माझे आजवरचे धोरण राहिले आहे. स्वत: कधी चहा घेत नाही. बाहेर गेलो तरी स्वत:चा डबा जवळ असतो; त्यामुळे कुणाच्या मिंध्यात असण्याचे कारण नाही. जे करायचे ते उत्तमच आणि सर्वांना विश्वासात घेऊनच. साहजिकच याचा परिणाम इतर सहकाऱ्यांवर दिसत असून, कृषी विभागाची प्रतिमाही बदलू लागली आहे. - ज्ञानदेव वाकुरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर

नसिम सनदी।कोल्हापूर : पूरबाधित गावातील पिकांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध करून देण्याचे शिवधनुष्य जिल्'ाच्या कृषी विभागाने यशस्वीपणे पेलले आहे. ड्रोन आणि सॅटेलाईट इमेजचा वापर करून तब्बल २८६ गावांतील पूरबुडीत पिकांचे पंचनामे पूर्ण करून ठेवले आहेत. ही सगळी माहिती आता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाईटवर अपलोड केली जात आहे. राज्यात पहिल्यांदाच अशा प्रकारचा उपक्रम राबविणारे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांच्याशी यानिमित्ताने साधलेला हा थेट संवाद.

प्रश्न : पंचनाम्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा केला?उत्तर : मुळातच कृषी विभागाकडे मनुष्यबळ अपुरे आहे. महापुरामुळे बाधित क्षेत्राचे प्रमाण जास्त होते. कमी कालावधीत एवढ्या प्रमाणावरील क्षेत्रात पोहोचणे अवघड असल्यानेच ड्रोन आणि सॅटेलाईटचा आधार घेतला. जवळपास ५०० कर्मचाºयांनी रात्रंदिवस सलग तीन आठवडे काम करून २८६ गावांतील ७८ हजार हेक्टर क्षेत्रावरील तीन लाख आठ हजार शेतकºयांचे पीक नुकसानीचे पंचनामे तयार केले. पाणी कुठवर पसरले आहे, याचे नकाशेही तयार केले आहेत. आता या सर्व माहितीचे वेबसाईटवर अपलोडिंग होणार आहे. आता परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज घेण्यासाठीची या तंत्राचा चांगल्या प्रकारे वापर करता येणार आहे.

प्रश्न : जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारीपदी नियुक्ती होऊन वर्ष झाले. वाटचालीतील ठळक बाबी कोणत्या?उत्तर : वर्षभरात खूप चांगले काम करता आले. मी स्वत: काम करतो, इतरांनीही चांगले काम करावे, असा आग्रह असतो. कोणावर कारवाई करण्यापेक्षा चूक दाखवून देऊन त्यांच्याकडून काम करवून घेण्यावर माझा कायम भर राहिला आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरात कृषी विभागात कधी वादाचे प्रसंग घडले नाहीत. सर्वांना सोबत घेऊनच काम केल्याने राज्यात कोल्हापूरने आदर्शवत काम केले आहे. यात विशेष करून गटशेतीचा उल्लेख करावा लागेल. १३ गटांची स्थापना करून पाच कोटी ७० लाखांचे अनुदान मिळाले. राज्यात हे दुसºया क्रमांकाचे काम आहे. बुलढाणा राज्यात प्रथम क्रमांकावर असला तरी गुणवत्तेच्या बाबतीत कोल्हापूरच पहिल्या क्रमांकाचा मानकरी आहे.

प्रश्न : कृषी योजना राबविताना काय दक्षता घेतली?उत्तर : योजनांचा लाभ देताना जाणीवपूर्वक दिरंगाई होते, असा आरोप होत होता, तो पहिल्यांदा खोडून काढण्याचा मी प्रयत्न केला. रोजच्या रोज पाठपुरावा करून कमीत कमी वेळेत लाभ मिळेल याकडे लक्ष दिले. यावर्षी तब्बल साडेतेरा कोटींची अवजारे विनातक्रार शेतकºयांच्या दारात पोहोचली. शेतकरी सन्मान योजनेचे काम तर मध्यरात्रीपर्यंत थांबून पूर्ण केले.सायकलवरून फिरणारा कृषी अधिकारीवाकुरे सायकलवरून थेट शेतकºयांच्या बांधावर जाणारे जिल्'ातीलच नव्हे तर राज्यातील पहिले कृषी अधिकारी आहेत. कुठल्याही तालुक्यात दौरा असू दे; ते गाडीला सायकल बांधूनच घेऊन जातात. रोज सकाळी किमान २५ किलोमीटर ते सायकलिंग करतातच. शिवाय बैठकीला गेले की वेळ मिळेल तशी सायकल काढून थेट शेतकºयांच्या बांधावर जातात.

आपली ओळख न सांगता शेतकºयांना भेटतात, अडीअडचणी समजून घेतात, परत कार्यालयात आल्यानंतर त्याची पडताळणी करून यंत्रणेला कामालाही लावतात. गेल्या वर्षभरात जवळपास ९0 हून अधिक गावांना त्यांनी अशाच सायकलीद्वारे भेटी दिल्या आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfloodपूर