शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

पूरबाधित नुकसानीची माहिती एका क्लिकवर --ज्ञानदेव वाकुरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 23:42 IST

शेतकऱ्यांचे काम कुठेही अडता कामा नये, हेच माझे आजवरचे धोरण राहिले आहे. स्वत: कधी चहा घेत नाही. बाहेर गेलो तरी स्वत:चा डबा जवळ असतो; त्यामुळे कुणाच्या मिंध्यात असण्याचे कारण नाही. जे करायचे ते उत्तमच आणि सर्वांना विश्वासात घेऊनच. साहजिकच याचा परिणाम इतर सहकाऱ्यांवर दिसत असून, कृषी विभागाची प्रतिमाही बदलू लागली आहे. - ज्ञानदेव वाकुरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर

नसिम सनदी।कोल्हापूर : पूरबाधित गावातील पिकांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध करून देण्याचे शिवधनुष्य जिल्'ाच्या कृषी विभागाने यशस्वीपणे पेलले आहे. ड्रोन आणि सॅटेलाईट इमेजचा वापर करून तब्बल २८६ गावांतील पूरबुडीत पिकांचे पंचनामे पूर्ण करून ठेवले आहेत. ही सगळी माहिती आता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाईटवर अपलोड केली जात आहे. राज्यात पहिल्यांदाच अशा प्रकारचा उपक्रम राबविणारे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांच्याशी यानिमित्ताने साधलेला हा थेट संवाद.

प्रश्न : पंचनाम्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा केला?उत्तर : मुळातच कृषी विभागाकडे मनुष्यबळ अपुरे आहे. महापुरामुळे बाधित क्षेत्राचे प्रमाण जास्त होते. कमी कालावधीत एवढ्या प्रमाणावरील क्षेत्रात पोहोचणे अवघड असल्यानेच ड्रोन आणि सॅटेलाईटचा आधार घेतला. जवळपास ५०० कर्मचाºयांनी रात्रंदिवस सलग तीन आठवडे काम करून २८६ गावांतील ७८ हजार हेक्टर क्षेत्रावरील तीन लाख आठ हजार शेतकºयांचे पीक नुकसानीचे पंचनामे तयार केले. पाणी कुठवर पसरले आहे, याचे नकाशेही तयार केले आहेत. आता या सर्व माहितीचे वेबसाईटवर अपलोडिंग होणार आहे. आता परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज घेण्यासाठीची या तंत्राचा चांगल्या प्रकारे वापर करता येणार आहे.

प्रश्न : जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारीपदी नियुक्ती होऊन वर्ष झाले. वाटचालीतील ठळक बाबी कोणत्या?उत्तर : वर्षभरात खूप चांगले काम करता आले. मी स्वत: काम करतो, इतरांनीही चांगले काम करावे, असा आग्रह असतो. कोणावर कारवाई करण्यापेक्षा चूक दाखवून देऊन त्यांच्याकडून काम करवून घेण्यावर माझा कायम भर राहिला आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरात कृषी विभागात कधी वादाचे प्रसंग घडले नाहीत. सर्वांना सोबत घेऊनच काम केल्याने राज्यात कोल्हापूरने आदर्शवत काम केले आहे. यात विशेष करून गटशेतीचा उल्लेख करावा लागेल. १३ गटांची स्थापना करून पाच कोटी ७० लाखांचे अनुदान मिळाले. राज्यात हे दुसºया क्रमांकाचे काम आहे. बुलढाणा राज्यात प्रथम क्रमांकावर असला तरी गुणवत्तेच्या बाबतीत कोल्हापूरच पहिल्या क्रमांकाचा मानकरी आहे.

प्रश्न : कृषी योजना राबविताना काय दक्षता घेतली?उत्तर : योजनांचा लाभ देताना जाणीवपूर्वक दिरंगाई होते, असा आरोप होत होता, तो पहिल्यांदा खोडून काढण्याचा मी प्रयत्न केला. रोजच्या रोज पाठपुरावा करून कमीत कमी वेळेत लाभ मिळेल याकडे लक्ष दिले. यावर्षी तब्बल साडेतेरा कोटींची अवजारे विनातक्रार शेतकºयांच्या दारात पोहोचली. शेतकरी सन्मान योजनेचे काम तर मध्यरात्रीपर्यंत थांबून पूर्ण केले.सायकलवरून फिरणारा कृषी अधिकारीवाकुरे सायकलवरून थेट शेतकºयांच्या बांधावर जाणारे जिल्'ातीलच नव्हे तर राज्यातील पहिले कृषी अधिकारी आहेत. कुठल्याही तालुक्यात दौरा असू दे; ते गाडीला सायकल बांधूनच घेऊन जातात. रोज सकाळी किमान २५ किलोमीटर ते सायकलिंग करतातच. शिवाय बैठकीला गेले की वेळ मिळेल तशी सायकल काढून थेट शेतकºयांच्या बांधावर जातात.

आपली ओळख न सांगता शेतकºयांना भेटतात, अडीअडचणी समजून घेतात, परत कार्यालयात आल्यानंतर त्याची पडताळणी करून यंत्रणेला कामालाही लावतात. गेल्या वर्षभरात जवळपास ९0 हून अधिक गावांना त्यांनी अशाच सायकलीद्वारे भेटी दिल्या आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfloodपूर