शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
3
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
4
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
5
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
6
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
7
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
8
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
9
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
10
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
11
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
13
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
14
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
15
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
16
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
17
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
18
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
19
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
20
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले

पूरबाधित नुकसानीची माहिती एका क्लिकवर --ज्ञानदेव वाकुरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 23:42 IST

शेतकऱ्यांचे काम कुठेही अडता कामा नये, हेच माझे आजवरचे धोरण राहिले आहे. स्वत: कधी चहा घेत नाही. बाहेर गेलो तरी स्वत:चा डबा जवळ असतो; त्यामुळे कुणाच्या मिंध्यात असण्याचे कारण नाही. जे करायचे ते उत्तमच आणि सर्वांना विश्वासात घेऊनच. साहजिकच याचा परिणाम इतर सहकाऱ्यांवर दिसत असून, कृषी विभागाची प्रतिमाही बदलू लागली आहे. - ज्ञानदेव वाकुरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर

नसिम सनदी।कोल्हापूर : पूरबाधित गावातील पिकांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध करून देण्याचे शिवधनुष्य जिल्'ाच्या कृषी विभागाने यशस्वीपणे पेलले आहे. ड्रोन आणि सॅटेलाईट इमेजचा वापर करून तब्बल २८६ गावांतील पूरबुडीत पिकांचे पंचनामे पूर्ण करून ठेवले आहेत. ही सगळी माहिती आता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाईटवर अपलोड केली जात आहे. राज्यात पहिल्यांदाच अशा प्रकारचा उपक्रम राबविणारे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांच्याशी यानिमित्ताने साधलेला हा थेट संवाद.

प्रश्न : पंचनाम्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा केला?उत्तर : मुळातच कृषी विभागाकडे मनुष्यबळ अपुरे आहे. महापुरामुळे बाधित क्षेत्राचे प्रमाण जास्त होते. कमी कालावधीत एवढ्या प्रमाणावरील क्षेत्रात पोहोचणे अवघड असल्यानेच ड्रोन आणि सॅटेलाईटचा आधार घेतला. जवळपास ५०० कर्मचाºयांनी रात्रंदिवस सलग तीन आठवडे काम करून २८६ गावांतील ७८ हजार हेक्टर क्षेत्रावरील तीन लाख आठ हजार शेतकºयांचे पीक नुकसानीचे पंचनामे तयार केले. पाणी कुठवर पसरले आहे, याचे नकाशेही तयार केले आहेत. आता या सर्व माहितीचे वेबसाईटवर अपलोडिंग होणार आहे. आता परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज घेण्यासाठीची या तंत्राचा चांगल्या प्रकारे वापर करता येणार आहे.

प्रश्न : जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारीपदी नियुक्ती होऊन वर्ष झाले. वाटचालीतील ठळक बाबी कोणत्या?उत्तर : वर्षभरात खूप चांगले काम करता आले. मी स्वत: काम करतो, इतरांनीही चांगले काम करावे, असा आग्रह असतो. कोणावर कारवाई करण्यापेक्षा चूक दाखवून देऊन त्यांच्याकडून काम करवून घेण्यावर माझा कायम भर राहिला आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरात कृषी विभागात कधी वादाचे प्रसंग घडले नाहीत. सर्वांना सोबत घेऊनच काम केल्याने राज्यात कोल्हापूरने आदर्शवत काम केले आहे. यात विशेष करून गटशेतीचा उल्लेख करावा लागेल. १३ गटांची स्थापना करून पाच कोटी ७० लाखांचे अनुदान मिळाले. राज्यात हे दुसºया क्रमांकाचे काम आहे. बुलढाणा राज्यात प्रथम क्रमांकावर असला तरी गुणवत्तेच्या बाबतीत कोल्हापूरच पहिल्या क्रमांकाचा मानकरी आहे.

प्रश्न : कृषी योजना राबविताना काय दक्षता घेतली?उत्तर : योजनांचा लाभ देताना जाणीवपूर्वक दिरंगाई होते, असा आरोप होत होता, तो पहिल्यांदा खोडून काढण्याचा मी प्रयत्न केला. रोजच्या रोज पाठपुरावा करून कमीत कमी वेळेत लाभ मिळेल याकडे लक्ष दिले. यावर्षी तब्बल साडेतेरा कोटींची अवजारे विनातक्रार शेतकºयांच्या दारात पोहोचली. शेतकरी सन्मान योजनेचे काम तर मध्यरात्रीपर्यंत थांबून पूर्ण केले.सायकलवरून फिरणारा कृषी अधिकारीवाकुरे सायकलवरून थेट शेतकºयांच्या बांधावर जाणारे जिल्'ातीलच नव्हे तर राज्यातील पहिले कृषी अधिकारी आहेत. कुठल्याही तालुक्यात दौरा असू दे; ते गाडीला सायकल बांधूनच घेऊन जातात. रोज सकाळी किमान २५ किलोमीटर ते सायकलिंग करतातच. शिवाय बैठकीला गेले की वेळ मिळेल तशी सायकल काढून थेट शेतकºयांच्या बांधावर जातात.

आपली ओळख न सांगता शेतकºयांना भेटतात, अडीअडचणी समजून घेतात, परत कार्यालयात आल्यानंतर त्याची पडताळणी करून यंत्रणेला कामालाही लावतात. गेल्या वर्षभरात जवळपास ९0 हून अधिक गावांना त्यांनी अशाच सायकलीद्वारे भेटी दिल्या आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfloodपूर