शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
3
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
4
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
5
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
6
"आमदार माजलेत असं बाहेर म्हटलं जातंय, राजकारणाच्या पलीकडे जाणार की नाही?"; CM फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं
7
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
8
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
9
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
10
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
11
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी
12
Sara Ali Khan : फॅट टू फिट! ९६ किलो वजनाच्या साराने कसं कमी केलं तब्बल ४५ किलो वजन? 'हे' आहे टॉप सीक्रेट
13
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
14
Lunchbox Recipe: झटपट तयार होणारी 'पडवळ करी' एकदा ट्राय करा, दोन घास जास्तच जातील!
15
पाकव्याप्त काश्मीरमध्ये दिसला मसूद अजहर; आता बिलावल भुट्टो आपला शब्द खरा करणार का?
16
विदेशी सट्टेबाजांचा वायदे बाजारावर डाव, छोट्या गुंतवणूकदारांनो सजगतेनं करा बचाव!
17
विधिमंडळ परिसरात धक्काबुक्की प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिला, दोषींवर होणार अशी कारवाई 
18
सोन्याची झळाळी कमी होणार, चांदीची चमक मात्र वाढणार; १३ टक्क्यांच्या तेजीचा अंदाज, किती जाऊ शकतो भाव?
19
शाहरुख खानच्या मेकअप रुमबाहेर काढला फोटो, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केला आनंद
20
"मोदींच्या नेतृत्वाखाली २०२९ निवडणूक लढवावी लागणे ही भाजपची मजबुरी"; भाजप खासदाराचे विधान

पूर ओसरू लागला!

By admin | Updated: August 8, 2016 00:44 IST

पाण्याची फूग : पावसाची उसंत तरीही धोका पातळीवर दोन फुटांनी वाहतेय ‘पंचगंगा’

कोल्हापूर : राधानगरी धरणाचे खुले झालेले सातही स्वयंचलित दरवाजे रविवारी सकाळी बंद झाले. त्यामुळे धरणातून २२०० क्युसेक विसर्ग सुरू आहे. रविवारी पावसाचा जोर कमी असला तरी वारणा व कोयना धरणांतून मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या विसर्गामुळे पाण्याची फूग निर्माण झाल्याने जिल्ह्यातील पूरस्थिती कायम आहे. पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीवर दोन फुटांनी वाहत असून, सायंकाळी राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी ४४.९ फुटांवर गेली. मात्र, रात्री पूर ओसरू लागला असून, रात्री ११ वाजता पाणी पातळी ४४.८, १२ वाजता ४४.७ वर आली आहे. जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत ३६६.६४ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक ९७ मि.मी. पाऊस पडला आहे. पूरस्थितीमुळे ८ राज्य, तर १७ प्रमुख जिल्हा मार्गावर अद्याप पाणी असल्याने ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली असून, पर्यायी मार्गांवर त्याचा भार पडत आहे. नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने ६९ बंधारे अद्याप पाण्याखाली आहेत. गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले; परंतु शनिवारपासून पावसाने थोडी उसंत दिली. ती रविवारीही कायम राहिली. उन्हाचे दर्शनही काहीकाळ झाले. रविवारी दिवसभरात हलक्या सरी वगळता पावसाचा जोर दिसला नाही. धरण क्षेत्रातील पावसाचा जोर कमी झाल्याने शनिवारी सुरू असलेले राधानगरी धरणाचे सातही दरवाजे रविवारी सकाळी बंद करण्यात आले. मात्र ‘वारणे’तून १८ हजार क्युसेक्स व कोयना धरणातून १७ हजार १११ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्या तुलनेत अलमट्टी धरणातून अपेक्षेपेक्षा कमी विसर्ग होत असल्याने पाण्याची फूग निर्माण झाली असून त्यामुळे पूरस्थिती गंभीर झाली आहे. पंचगंगा नदी धोका पातळी ओलांडून दोन फुटांनी वाहत आहे. जिल्हा प्रशासनाने दिवसभरात शहरासह जिल्ह्यातील विविध ठिकाणी पाहणी करून नदीशेजारील भागात सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. पावसाचा जोर कमी झाल्याने राधानगरी धरणाचे सर्व दरवाजे बंद झाले. २२०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू ठेवण्यात आला. त्याचबरोबर वारणा धरणातून १८००० क्युसेक्स, ‘कासारी’तून ३६९७, ‘घटप्रभे’तून २७६७, ‘जांबरे’तून १२४९, ‘कडवी’तून ११२२, ‘कुंभी’तून ९५० व ‘कोदे’मधून ५९९ क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. आजरा, गडहिंग्लज, चंदगड मार्गांवरील वाहतूक बंद पूरपरिस्थिी व घाटात दरड कोसळल्याने आजरा तालुक्यातील नवले-देवकांडगाव या मार्गावरील, चंदगड तालुक्यातील गुडवळे, सावर्डे, कोळींद्रे, हलकर्णी या मार्गावरील व गडहिंग्लज तालुक्यातील यमेकोंड, शिरसंगी, किणे, नेसरी, हडलगे, कोवाड, उचगाव या मार्गावरील वाहतूक बंद असून ती पर्यायी मार्गांवरून सुरू ठेवण्यात आली आहे. जिल्ह्यातील २१० घरांची अंशत: पडझड पावसामुळे रविवारी सकाळी आठपर्यंत जिल्ह्यांत २१० घरांची अंशत: पडझड होऊन ३० लाख २६ हजार रुपयांचे नुकसान झाले. तालुकानिहाय पाऊस मिलीमीटरमध्ये असा- हातकणंगले-४.१२, शिरोळ-२.१४, पन्हाळा-३४.७१, शाहूवाडी-२४, राधानगरी-४५.१७, गगनबावडा-९७, करवीर-१३.२७, कागल-१४.०५, गडहिंग्लज-११, भुदरगड-३०.६०, आजरा-५९.७५,चंदगड-३०.८३. नदीभागातील लोकांना ६९ बंधारे पाण्याखाली पंचगंगा नदीवरील ७ बंधारे, भोगावती नदीवरील ६, तुळशी नदीवरील २, वारणा नदीवरील ९,कासारी नदीवरील ७, कुंभी नदीवरील ४, कडवी नदीवरील ३, धामणी नदीवरील ६, वेदगंगा नदीवरील ६, दूधगंगा नदीवरील ४, हिरण्यकेशी नदीवरील ५, घटप्रभा नदीवरील ५, ताम्रपर्णी नदीवरील २ व जांबरे नदीवरील ३ असे ६९ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. सतर्कतेचे आदेश राजाराम बंधाऱ्याने धोका पातळी ओलांडल्याने नदीकाठच्या व सखल भागांतील लोकांनी सतर्क राहावे, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने केले आहे. जयंती नाल्यावरील कचरा उचलण्यासाठी आवाहन पंचगंगेच्या पुराच्या पाण्यामुळे कोल्हापुरातील जयंती नालाही भरला आहे. यामुळे नाल्यातील कचरा काठावर तसेच पुलावरही आला आहे. पाणी वाढल्यास तो वाहून जाऊन जलप्रदूषण होईल किंवा पाणी ओसरले तर कचरा तेथेच राहून त्याची दुर्गंधी निर्माण होईल. हे टाळण्या-साठी तो कचरा तातडीने तेथून हलविण्याची गरज आहे. यासाठी महापालिका तसेच स्वयंसेवी संस्था, संघटनांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन ‘लोकमत’च्यावतीने करण्यात येत आहे. ‘अलमट्टी’चा विसर्ग वाढवायला हवा अलमट्टी धरणात प्रतिसेकंद १ लाख ६२ हजार ६६७ घनफूट पाण्याची आवक होत आहे. त्याच वेगाने हे पाणी या धरणातून विसर्ग होत आहे. कोयना व वारणा धरणांतून पाण्याचा मोठ्या प्रमाणात झालेला विसर्ग पाहता अलमट्टीमधूनही सद्य:स्थितीपेक्षा जादा विसर्ग होण्याची गरज आहे. येथील विसर्ग कमी असल्याने पाण्याची फूग निर्माण होऊन पंचगंगेसह इतर नद्यांच्या पाणीपातळी वाढ होत आहे.