शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
4
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
5
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
6
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
7
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
8
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
9
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
10
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
11
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
12
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
13
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
14
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
15
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
16
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
17
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
18
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
19
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
20
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई

पूर ओसरू लागला!

By admin | Updated: August 8, 2016 00:44 IST

पाण्याची फूग : पावसाची उसंत तरीही धोका पातळीवर दोन फुटांनी वाहतेय ‘पंचगंगा’

कोल्हापूर : राधानगरी धरणाचे खुले झालेले सातही स्वयंचलित दरवाजे रविवारी सकाळी बंद झाले. त्यामुळे धरणातून २२०० क्युसेक विसर्ग सुरू आहे. रविवारी पावसाचा जोर कमी असला तरी वारणा व कोयना धरणांतून मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या विसर्गामुळे पाण्याची फूग निर्माण झाल्याने जिल्ह्यातील पूरस्थिती कायम आहे. पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीवर दोन फुटांनी वाहत असून, सायंकाळी राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी ४४.९ फुटांवर गेली. मात्र, रात्री पूर ओसरू लागला असून, रात्री ११ वाजता पाणी पातळी ४४.८, १२ वाजता ४४.७ वर आली आहे. जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत ३६६.६४ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक ९७ मि.मी. पाऊस पडला आहे. पूरस्थितीमुळे ८ राज्य, तर १७ प्रमुख जिल्हा मार्गावर अद्याप पाणी असल्याने ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली असून, पर्यायी मार्गांवर त्याचा भार पडत आहे. नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने ६९ बंधारे अद्याप पाण्याखाली आहेत. गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले; परंतु शनिवारपासून पावसाने थोडी उसंत दिली. ती रविवारीही कायम राहिली. उन्हाचे दर्शनही काहीकाळ झाले. रविवारी दिवसभरात हलक्या सरी वगळता पावसाचा जोर दिसला नाही. धरण क्षेत्रातील पावसाचा जोर कमी झाल्याने शनिवारी सुरू असलेले राधानगरी धरणाचे सातही दरवाजे रविवारी सकाळी बंद करण्यात आले. मात्र ‘वारणे’तून १८ हजार क्युसेक्स व कोयना धरणातून १७ हजार १११ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्या तुलनेत अलमट्टी धरणातून अपेक्षेपेक्षा कमी विसर्ग होत असल्याने पाण्याची फूग निर्माण झाली असून त्यामुळे पूरस्थिती गंभीर झाली आहे. पंचगंगा नदी धोका पातळी ओलांडून दोन फुटांनी वाहत आहे. जिल्हा प्रशासनाने दिवसभरात शहरासह जिल्ह्यातील विविध ठिकाणी पाहणी करून नदीशेजारील भागात सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. पावसाचा जोर कमी झाल्याने राधानगरी धरणाचे सर्व दरवाजे बंद झाले. २२०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू ठेवण्यात आला. त्याचबरोबर वारणा धरणातून १८००० क्युसेक्स, ‘कासारी’तून ३६९७, ‘घटप्रभे’तून २७६७, ‘जांबरे’तून १२४९, ‘कडवी’तून ११२२, ‘कुंभी’तून ९५० व ‘कोदे’मधून ५९९ क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. आजरा, गडहिंग्लज, चंदगड मार्गांवरील वाहतूक बंद पूरपरिस्थिी व घाटात दरड कोसळल्याने आजरा तालुक्यातील नवले-देवकांडगाव या मार्गावरील, चंदगड तालुक्यातील गुडवळे, सावर्डे, कोळींद्रे, हलकर्णी या मार्गावरील व गडहिंग्लज तालुक्यातील यमेकोंड, शिरसंगी, किणे, नेसरी, हडलगे, कोवाड, उचगाव या मार्गावरील वाहतूक बंद असून ती पर्यायी मार्गांवरून सुरू ठेवण्यात आली आहे. जिल्ह्यातील २१० घरांची अंशत: पडझड पावसामुळे रविवारी सकाळी आठपर्यंत जिल्ह्यांत २१० घरांची अंशत: पडझड होऊन ३० लाख २६ हजार रुपयांचे नुकसान झाले. तालुकानिहाय पाऊस मिलीमीटरमध्ये असा- हातकणंगले-४.१२, शिरोळ-२.१४, पन्हाळा-३४.७१, शाहूवाडी-२४, राधानगरी-४५.१७, गगनबावडा-९७, करवीर-१३.२७, कागल-१४.०५, गडहिंग्लज-११, भुदरगड-३०.६०, आजरा-५९.७५,चंदगड-३०.८३. नदीभागातील लोकांना ६९ बंधारे पाण्याखाली पंचगंगा नदीवरील ७ बंधारे, भोगावती नदीवरील ६, तुळशी नदीवरील २, वारणा नदीवरील ९,कासारी नदीवरील ७, कुंभी नदीवरील ४, कडवी नदीवरील ३, धामणी नदीवरील ६, वेदगंगा नदीवरील ६, दूधगंगा नदीवरील ४, हिरण्यकेशी नदीवरील ५, घटप्रभा नदीवरील ५, ताम्रपर्णी नदीवरील २ व जांबरे नदीवरील ३ असे ६९ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. सतर्कतेचे आदेश राजाराम बंधाऱ्याने धोका पातळी ओलांडल्याने नदीकाठच्या व सखल भागांतील लोकांनी सतर्क राहावे, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने केले आहे. जयंती नाल्यावरील कचरा उचलण्यासाठी आवाहन पंचगंगेच्या पुराच्या पाण्यामुळे कोल्हापुरातील जयंती नालाही भरला आहे. यामुळे नाल्यातील कचरा काठावर तसेच पुलावरही आला आहे. पाणी वाढल्यास तो वाहून जाऊन जलप्रदूषण होईल किंवा पाणी ओसरले तर कचरा तेथेच राहून त्याची दुर्गंधी निर्माण होईल. हे टाळण्या-साठी तो कचरा तातडीने तेथून हलविण्याची गरज आहे. यासाठी महापालिका तसेच स्वयंसेवी संस्था, संघटनांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन ‘लोकमत’च्यावतीने करण्यात येत आहे. ‘अलमट्टी’चा विसर्ग वाढवायला हवा अलमट्टी धरणात प्रतिसेकंद १ लाख ६२ हजार ६६७ घनफूट पाण्याची आवक होत आहे. त्याच वेगाने हे पाणी या धरणातून विसर्ग होत आहे. कोयना व वारणा धरणांतून पाण्याचा मोठ्या प्रमाणात झालेला विसर्ग पाहता अलमट्टीमधूनही सद्य:स्थितीपेक्षा जादा विसर्ग होण्याची गरज आहे. येथील विसर्ग कमी असल्याने पाण्याची फूग निर्माण होऊन पंचगंगेसह इतर नद्यांच्या पाणीपातळी वाढ होत आहे.