शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

ॲट्रासिटीतील वारसांना दरमहा ५ हजार पेन्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2021 12:21 IST

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शतकोत्तर रौप्यमहोत्सव १४ एप्रिल २०१६ ला झाला. त्यानिमित्त या पेन्शनच्या रकमेत शासनाने वाढ केली आहे.

कोल्हापूर : अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक (ॲट्रॉसिटी) कायद्यांतर्गत जिल्ह्यात दाखल झालेल्या खून, आत्महत्या आणि मृत्यू प्रकरणांमध्ये पीडित वारसांना दरमहा प्रत्येकी ५ हजार रुपये पेन्शन देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी त्यासंदर्भातील बैठक बुधवारी घेऊन या कामांना प्राधान्य देण्याची सूचना केली आहे. या कायद्यांतर्गत २०११ पासून ते आजपर्यंत १५ प्रकरणी पेन्शन देण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात असून लवकरच पेन्शन अदा केली जाईल.

तसेच १९९५ ते २०११ च्या प्रकरणांची शहानिशा करण्याची कार्यवाही पोलीस विभाग व समाज कल्याण विभागाच्या वतीने सुरू असल्याचे समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी सांगितले. या कायद्यानुसार संबंधित व्यक्तीचा खून झाल्यानंतर त्याच्या वारसांना ८ लाख २५ हजार रुपयांची मदत तीन टप्प्यात मिळते. त्यातील २५ टक्के प्रथम गुन्हे अहवाल नोंद होताच मिळतात. दोषारोप पत्र दाखल होताच आणखी ५० टक्के मिळतात. उर्वरित २५ टक्के खटल्याचा निकाल लागल्यावर मिळतात.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शतकोत्तर रौप्यमहोत्सव १४ एप्रिल २०१६ ला झाला. त्यानिमित्त या पेन्शनच्या रकमेत शासनाने वाढ केली आहे. २०१६ नंतर ॲट्रासिटीच्या ज्या घटनामध्ये मृत्यू झाला आहे, त्यांच्या वारसांना ५ हजार रुपये पेन्शन दिली जाते. त्यापूर्वीच्या घटनांतील वारसांना दरमहा ३ हजार रुपये दिले जातात.

कागदपत्रांअभावी वीस प्रकरणे प्रलंबित - लोंढे

कोल्हापूर जिल्ह्यात २०११ नंतर १५ घटनांमध्ये खून, मृत्यू, आत्महत्या झाल्या आहेत. कायदेशीर वारस जिवंत असेपर्यंत त्यांना ही पेन्श न देण्याची कायद्यात तरतूद आहे.  जिल्ह्यात १९९५ पासून २०११ पर्यंत किती अशा घटना घडल्या याचा शोध पोलीस ठाणे व न्यायालयीन खटल्याच्या माहितीच्या आधारे घेतला जात आहे. या कालावधीतीलही सुमारे १५ प्रकरणे असावीत असा अंदाज आहे. अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अधिनियम १९८९ अंतर्गत जानेवारी २०२१ ते आजअखेर कागदपत्रांअभावी २० प्रकरणे तर पोलीस तपासावरील १२ प्रकरणे प्रलंबित असल्याची माहितीही सहायक आयुक्त लोंढे यांनी दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAtrocity Actअॅट्रॉसिटी कायदा