शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

पाच हजार नळजोडण्या बेकायदेशीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2017 00:54 IST

इचलकरंजी नगरपालिका सभा : दंडात्मक कारवाईचा निर्णय; खास पथक नेमून शोधमोहीम राबविणार

इचलकरंजी : शहरात असलेल्या इमारतींच्या संख्येच्या प्रमाणात पाणीपुरवठ्याच्या नळजोडण्यांचे प्रमाण अल्प आहे. नगरपालिका हद्दीत किमान पाच हजार नळ जोडण्या बेकायदेशीर असून, त्या शोधून संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय नगरपालिकेच्या बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. यासाठी खास पथक नेमून शोधमोहीम राबविण्याचे यावेळी ठरविण्यात आले.नगरपालिकेची सर्वसाधारण सभा १६ फेब्रुवारी रोजी आयोजित केली होती. मात्र, कोरोची (ता. हातकणंगले) येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवडणूक प्रचारसभा असल्यामुळे ही सभा तहकूब ठेवण्यात आली होती. बुधवारी दुपारी साडेबारा वाजता नगराध्यक्ष अ‍ॅड. अलका स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली.सभेमध्ये शहरात असलेल्या अवैध घरगुती नळजोडण्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा विषय चर्चेस आला असताना मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी शहरात ५६ हजार मालमत्ता असून, ३५ हजार पाणीपुरवठा करणाऱ्या नळजोडण्या आहेत, असे स्पष्ट केले. याच विषयावर बोलताना जलअभियंता सुरेश कमळे म्हणाले, शहरामध्ये पाणीपुरवठा विभागाकडून केलेल्या सर्वेक्षणात २२ हजार इमारतींमध्ये नळ जोडण्या नसल्याचे आढळून आले आहे. वास्तविक पाहता इमारतींच्या तुलनेमध्ये आणखीन दहा हजारांहून अधिक नळजोडण्या असणे आवश्यक आहे. मात्र, यापैकी किमान पाच हजार नळ जोडण्या बेकायदेशीर असाव्यात. अशा नळजोडण्या शोधून घरगुती नळासाठी तीन वर्षांची पाणीपट्टी व पाच हजार रुपये दंड, तसेच औद्योगिक नळासाठी तीन वर्षांची पाणीपट्टी व २५ हजार रुपये दंड अशी तरतूद करावी. जलअभियंत्यांनी सूचविलेल्या प्रस्तावानुसार सभागृहाने दंडात्मक कारवाई करण्याचा प्रस्ताव एकमताने संमत केला.बेकायदेशीर नळ जोडण्यांबाबत बोलताना नगरसेवक बावचकर यांनी नगरपालिकेने वॉटर आॅडीट करून घ्यावे, हा मुद्दा आग्रहाने मांडला. ते म्हणाले, यापूर्वी अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार यांनी काही अवैध नळ जोडण्या शोधून काढल्या होत्या. त्यांच्यावर कोणती कारवाई केली, असा प्रश्न विचारला. मात्र, त्यावर प्रशासनाला कोणताही खुलासा करता आला नाही. याच सभेमध्ये नगरपालिकेच्या मालकीची मंगल कार्यालये मक्ता पद्धतीने भाड्याने देणे व भाडेवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. श्रीमंत घोरपडे नाट्यगृह लग्न व अन्य कार्यांसाठी भाड्याने देण्याचा प्रस्ताव मात्र सभेमध्ये फेटाळण्यात आला. हागणदारीमुक्तीची घोषणा बहुमतानेइचलकरंजी शहर हागणदारीमुक्त झाले असल्याची घोषणा सत्तारूढ आघाडीने बहुमताने केली. याच घोषणेबाबत विरोधी कॉँग्रेस व शाहू आघाडीने जोरदार विरोध केला. तेव्हा सत्तारूढ आणि विरोधक यांच्यामध्ये शाब्दिक चकमक उडाली. नगरसेवक शशांक बावचकर, विठ्ठल चोपडे, आदींनी हागणदारीमुक्तीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत नगरपालिकेच्या सार्वजनिक शौचालयातील अस्वच्छतेचे वाभाडे काढले आणि शहरामध्ये अद्यापही अनेक ठिकाणी नागरिक उघड्यावर शौच करीत असल्याचे गुडमॉर्निंग पथकाला आढळून येत आहे. त्यानंतर मुख्याधिकारी डॉ. रसाळ व आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार यांनी केलेल्या खुलाशानंतरसुद्धा विरोधक समाधानी झाले नाहीत. अखेर सत्तारूढ आघाडीने हागणदारीमुक्तीचा प्रस्ताव ३२ विरुद्ध २६ मतांनी मंजूर केला.