शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
2
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
3
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
4
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
5
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
6
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
7
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
8
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
9
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
10
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
11
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
12
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
13
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
14
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
15
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
16
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
17
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
18
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
19
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
20
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...

पाचगावचा पाणीप्रश्न अद्यापही कोरडाच

By admin | Updated: December 10, 2015 01:01 IST

उपाययोजना नाहीत : संघर्ष थांबणार की राजकारण करून पाचगावकरांना पाण्याची ढाल बनविणार

ज्योती पाटील-- पाचगाव -कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील पाण्यासाठी कळीचा मुद्दा ठरलेले पाचगाव आजही पाण्यासाठी चर्चेत आले. गेल्या अनेक वर्षांपासून पाचगावमध्ये पिण्याचे पाणी आणि त्यातून निर्माण झालेला संघर्ष काहींच्या जिवावर बेतला आहे. आतातरी हे थांबणार की पाण्यासाठी राजकारण करून पाचगावकरांना पाण्याची ढाल बनविणार, असा प्रश्न जनतेतून उपस्थित केला जात आहे.पाचगावचे वाढते विस्तारीकरण व वाढती लोकसंख्या पाहता प्रशासनाने कोणतीही उपाययोजना अद्याप केलेली नाही. लोकप्रतिनिधी व महापालिका यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनदेखील त्यांच्याकडून दखल घेतली जात नाही. गेल्या अनेक वर्षांपासून पाचगाव उपनगरातील लोकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. कळंबा तलावातून भारत निर्माण योजनेतून २००९/१० मध्ये नळ पाणीपुरवठा योजना करून या योजनेतून शांतीनगर ते पोवार कॉलनी व शिक्षक कॉलनीपर्यंतच्या सर्व भागास पिण्याचे पाणी पुरविले जाते. ही पाणीपुरवठा योजना महानगरपालिकेच्या नियंत्रणाखाली असून महापालिकेकडून पुरते दुर्लक्ष होताना दिसत आहे.१० मे २०१५ ला पाचगावमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेंतर्गत पाचगाव नळ पाणीपुरवठा योजनेचा प्रारंभ झाला. त्यावेळी खासदार धनंजय महाडिक यांनी माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचा खरपूस समाचार घेतला. त्यानंतर सतेज पाटील यांनी सांगितले, ही पाणी योजना आमच्या सरकारच्या काळात मंजूर झाली असून, त्याचा पाठपुरावा आम्ही केला आणि आता विरोधक त्याचे श्रेय घेत आहेत. यातून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप झाले. पाचगावमध्ये पाणी कोण आणणार आणि त्याचे श्रेय कोण घेणार? या दोन्ही गटांच्या वादामध्येच पाचगावकर पाण्याविना तडफडत आहेत. पाचगावमध्ये लोकांनी बंगले, घरे बांधूनदेखील पाण्याची दैनंदिन अवस्था पाहून अनेकांनी पाचगाव सोडून अन्य ठिकाणी वास्तव्य करण्यास सुरुवात केली आहे.यंदा पाऊस कमी झाल्यामुळे कळंबा तलावातील पाण्याची पातळी ओसरल्यामुळे पाणीसाठा संपत आला आहे. त्यामुळे उपनगरातील लोकांना पाण्याची चणचण भासू लागली आहे. पाचगावमध्ये ‘तळे उशाला अन् कोरड घशाला’ अशीच अवस्था झाली आहे. पाण्यासाठी अनेकवेळा ग्रामपंचायतीवर दगडफेक, मारामाऱ्या अशा अनेक घटना घडल्या आहेत.पाण्याचा संभाव्य धोका ओळखून पाचगाव ग्रामपंचायतीने पिण्याच्या पाण्याची टंचाई घोषित करण्याबाबतचा ग्रामपंचायतीचा ठराव करून १५ आॅगस्ट २०१५ ला झालेल्या ग्रामसभेत २०१५-१६ मध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई घोषित करून व टंचाई निवारणार्थ उपाययोजना राबविणे व टंचाई प्रतिबंधात्मक आराखडा तयार करून महाराष्ट्र भूजल अधिनियम १९९३ अंतर्गत कलम ४ अन्वये पिण्याच्या पाण्याची टंचाई घोषित करण्यात यावी यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन दिले आहे. त्यासाठी पाण्याची तात्पुरती उपाययोजना म्हणून भैरवनाथ सहकारी पाणीपुरवठा संस्था मर्या. गिरगाव आश्रमशाळा येथून फिल्टर हाऊस पाचगाव येथे पाईपलाईन टाकून पाणीपुरवठा करण्यात यावा तसेच शाहू सहकारी पाणीपुरवठा योजना आश्रमशाळा येथून फिल्टर हाऊस पाचगाव येथे पाईपलाईन टाकून पाणीपुरवठा करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे विनंती केल्याचे समजते. त्यासाठी अंदाजे नऊ लाख रुपयांचे अंदाजपत्रकही जोडले आहे. निवडणुकीवेळी लोकप्रतिनिधी येतात, पाण्याची घोषणा करतात. निवडणूक झाली की सांगतात, महापालिकेला विचारा. महापालिकेला विचारले की, कोणीही दाद देत नाही. १५ दिवसांतून एकदा पाणीपुरवठा केला जातो. तेही दुर्गंधीयुक्त पाणी पिण्याच्या लायकीचे नसलेले. मग सर्वसामान्यांना आधार घ्यावा लागतो, तो खासगी टँकरवाल्यांचा. कारण पालिकेच्या टँकरला फोन केला की, उडवाउडवीची उत्तरे मिळतात. ज्याचा वशिला मोठा त्याच्या दारात लगेच टँकरने पाणीपुरवठा केला जातो. - सौ. स्नेहल संजय सावंत, समृद्धीनगर, पाचगाव.पाचगाव उपनगरातील लोकांचा प्रश्न गंभीर आहे. त्यासाठी उपाययोजना म्हणून शासनदरबारी प्रश्न मांडला आहे. आणि त्याचा पाठपुरावा करत गिरगाव आश्रमशाळेजवळून पाण्याची उपलब्धता करून देण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविलेला आहे. तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेंतर्गत पाचगाव नळ पाणीपुरवठ्याचे काम चालू आहे.-भिकाजी गाडगीळ, ग्रामपंचायत सदस्य, पाचगाव.पाचगाव संघर्ष आणि भंग पावलेली शांतता जर खरोखर सुधारायची असेल तर पाणीप्रश्न निकालात निघायला हवा, अशी जनतेतून कळकळीची मागणी होत आहे.