शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

पाचगावचा पाणीप्रश्न अद्यापही कोरडाच

By admin | Updated: December 10, 2015 01:01 IST

उपाययोजना नाहीत : संघर्ष थांबणार की राजकारण करून पाचगावकरांना पाण्याची ढाल बनविणार

ज्योती पाटील-- पाचगाव -कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील पाण्यासाठी कळीचा मुद्दा ठरलेले पाचगाव आजही पाण्यासाठी चर्चेत आले. गेल्या अनेक वर्षांपासून पाचगावमध्ये पिण्याचे पाणी आणि त्यातून निर्माण झालेला संघर्ष काहींच्या जिवावर बेतला आहे. आतातरी हे थांबणार की पाण्यासाठी राजकारण करून पाचगावकरांना पाण्याची ढाल बनविणार, असा प्रश्न जनतेतून उपस्थित केला जात आहे.पाचगावचे वाढते विस्तारीकरण व वाढती लोकसंख्या पाहता प्रशासनाने कोणतीही उपाययोजना अद्याप केलेली नाही. लोकप्रतिनिधी व महापालिका यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनदेखील त्यांच्याकडून दखल घेतली जात नाही. गेल्या अनेक वर्षांपासून पाचगाव उपनगरातील लोकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. कळंबा तलावातून भारत निर्माण योजनेतून २००९/१० मध्ये नळ पाणीपुरवठा योजना करून या योजनेतून शांतीनगर ते पोवार कॉलनी व शिक्षक कॉलनीपर्यंतच्या सर्व भागास पिण्याचे पाणी पुरविले जाते. ही पाणीपुरवठा योजना महानगरपालिकेच्या नियंत्रणाखाली असून महापालिकेकडून पुरते दुर्लक्ष होताना दिसत आहे.१० मे २०१५ ला पाचगावमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेंतर्गत पाचगाव नळ पाणीपुरवठा योजनेचा प्रारंभ झाला. त्यावेळी खासदार धनंजय महाडिक यांनी माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचा खरपूस समाचार घेतला. त्यानंतर सतेज पाटील यांनी सांगितले, ही पाणी योजना आमच्या सरकारच्या काळात मंजूर झाली असून, त्याचा पाठपुरावा आम्ही केला आणि आता विरोधक त्याचे श्रेय घेत आहेत. यातून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप झाले. पाचगावमध्ये पाणी कोण आणणार आणि त्याचे श्रेय कोण घेणार? या दोन्ही गटांच्या वादामध्येच पाचगावकर पाण्याविना तडफडत आहेत. पाचगावमध्ये लोकांनी बंगले, घरे बांधूनदेखील पाण्याची दैनंदिन अवस्था पाहून अनेकांनी पाचगाव सोडून अन्य ठिकाणी वास्तव्य करण्यास सुरुवात केली आहे.यंदा पाऊस कमी झाल्यामुळे कळंबा तलावातील पाण्याची पातळी ओसरल्यामुळे पाणीसाठा संपत आला आहे. त्यामुळे उपनगरातील लोकांना पाण्याची चणचण भासू लागली आहे. पाचगावमध्ये ‘तळे उशाला अन् कोरड घशाला’ अशीच अवस्था झाली आहे. पाण्यासाठी अनेकवेळा ग्रामपंचायतीवर दगडफेक, मारामाऱ्या अशा अनेक घटना घडल्या आहेत.पाण्याचा संभाव्य धोका ओळखून पाचगाव ग्रामपंचायतीने पिण्याच्या पाण्याची टंचाई घोषित करण्याबाबतचा ग्रामपंचायतीचा ठराव करून १५ आॅगस्ट २०१५ ला झालेल्या ग्रामसभेत २०१५-१६ मध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई घोषित करून व टंचाई निवारणार्थ उपाययोजना राबविणे व टंचाई प्रतिबंधात्मक आराखडा तयार करून महाराष्ट्र भूजल अधिनियम १९९३ अंतर्गत कलम ४ अन्वये पिण्याच्या पाण्याची टंचाई घोषित करण्यात यावी यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन दिले आहे. त्यासाठी पाण्याची तात्पुरती उपाययोजना म्हणून भैरवनाथ सहकारी पाणीपुरवठा संस्था मर्या. गिरगाव आश्रमशाळा येथून फिल्टर हाऊस पाचगाव येथे पाईपलाईन टाकून पाणीपुरवठा करण्यात यावा तसेच शाहू सहकारी पाणीपुरवठा योजना आश्रमशाळा येथून फिल्टर हाऊस पाचगाव येथे पाईपलाईन टाकून पाणीपुरवठा करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे विनंती केल्याचे समजते. त्यासाठी अंदाजे नऊ लाख रुपयांचे अंदाजपत्रकही जोडले आहे. निवडणुकीवेळी लोकप्रतिनिधी येतात, पाण्याची घोषणा करतात. निवडणूक झाली की सांगतात, महापालिकेला विचारा. महापालिकेला विचारले की, कोणीही दाद देत नाही. १५ दिवसांतून एकदा पाणीपुरवठा केला जातो. तेही दुर्गंधीयुक्त पाणी पिण्याच्या लायकीचे नसलेले. मग सर्वसामान्यांना आधार घ्यावा लागतो, तो खासगी टँकरवाल्यांचा. कारण पालिकेच्या टँकरला फोन केला की, उडवाउडवीची उत्तरे मिळतात. ज्याचा वशिला मोठा त्याच्या दारात लगेच टँकरने पाणीपुरवठा केला जातो. - सौ. स्नेहल संजय सावंत, समृद्धीनगर, पाचगाव.पाचगाव उपनगरातील लोकांचा प्रश्न गंभीर आहे. त्यासाठी उपाययोजना म्हणून शासनदरबारी प्रश्न मांडला आहे. आणि त्याचा पाठपुरावा करत गिरगाव आश्रमशाळेजवळून पाण्याची उपलब्धता करून देण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविलेला आहे. तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेंतर्गत पाचगाव नळ पाणीपुरवठ्याचे काम चालू आहे.-भिकाजी गाडगीळ, ग्रामपंचायत सदस्य, पाचगाव.पाचगाव संघर्ष आणि भंग पावलेली शांतता जर खरोखर सुधारायची असेल तर पाणीप्रश्न निकालात निघायला हवा, अशी जनतेतून कळकळीची मागणी होत आहे.