शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

पाचगावचा पाणीप्रश्न अद्यापही कोरडाच

By admin | Updated: December 10, 2015 01:01 IST

उपाययोजना नाहीत : संघर्ष थांबणार की राजकारण करून पाचगावकरांना पाण्याची ढाल बनविणार

ज्योती पाटील-- पाचगाव -कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील पाण्यासाठी कळीचा मुद्दा ठरलेले पाचगाव आजही पाण्यासाठी चर्चेत आले. गेल्या अनेक वर्षांपासून पाचगावमध्ये पिण्याचे पाणी आणि त्यातून निर्माण झालेला संघर्ष काहींच्या जिवावर बेतला आहे. आतातरी हे थांबणार की पाण्यासाठी राजकारण करून पाचगावकरांना पाण्याची ढाल बनविणार, असा प्रश्न जनतेतून उपस्थित केला जात आहे.पाचगावचे वाढते विस्तारीकरण व वाढती लोकसंख्या पाहता प्रशासनाने कोणतीही उपाययोजना अद्याप केलेली नाही. लोकप्रतिनिधी व महापालिका यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनदेखील त्यांच्याकडून दखल घेतली जात नाही. गेल्या अनेक वर्षांपासून पाचगाव उपनगरातील लोकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. कळंबा तलावातून भारत निर्माण योजनेतून २००९/१० मध्ये नळ पाणीपुरवठा योजना करून या योजनेतून शांतीनगर ते पोवार कॉलनी व शिक्षक कॉलनीपर्यंतच्या सर्व भागास पिण्याचे पाणी पुरविले जाते. ही पाणीपुरवठा योजना महानगरपालिकेच्या नियंत्रणाखाली असून महापालिकेकडून पुरते दुर्लक्ष होताना दिसत आहे.१० मे २०१५ ला पाचगावमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेंतर्गत पाचगाव नळ पाणीपुरवठा योजनेचा प्रारंभ झाला. त्यावेळी खासदार धनंजय महाडिक यांनी माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचा खरपूस समाचार घेतला. त्यानंतर सतेज पाटील यांनी सांगितले, ही पाणी योजना आमच्या सरकारच्या काळात मंजूर झाली असून, त्याचा पाठपुरावा आम्ही केला आणि आता विरोधक त्याचे श्रेय घेत आहेत. यातून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप झाले. पाचगावमध्ये पाणी कोण आणणार आणि त्याचे श्रेय कोण घेणार? या दोन्ही गटांच्या वादामध्येच पाचगावकर पाण्याविना तडफडत आहेत. पाचगावमध्ये लोकांनी बंगले, घरे बांधूनदेखील पाण्याची दैनंदिन अवस्था पाहून अनेकांनी पाचगाव सोडून अन्य ठिकाणी वास्तव्य करण्यास सुरुवात केली आहे.यंदा पाऊस कमी झाल्यामुळे कळंबा तलावातील पाण्याची पातळी ओसरल्यामुळे पाणीसाठा संपत आला आहे. त्यामुळे उपनगरातील लोकांना पाण्याची चणचण भासू लागली आहे. पाचगावमध्ये ‘तळे उशाला अन् कोरड घशाला’ अशीच अवस्था झाली आहे. पाण्यासाठी अनेकवेळा ग्रामपंचायतीवर दगडफेक, मारामाऱ्या अशा अनेक घटना घडल्या आहेत.पाण्याचा संभाव्य धोका ओळखून पाचगाव ग्रामपंचायतीने पिण्याच्या पाण्याची टंचाई घोषित करण्याबाबतचा ग्रामपंचायतीचा ठराव करून १५ आॅगस्ट २०१५ ला झालेल्या ग्रामसभेत २०१५-१६ मध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई घोषित करून व टंचाई निवारणार्थ उपाययोजना राबविणे व टंचाई प्रतिबंधात्मक आराखडा तयार करून महाराष्ट्र भूजल अधिनियम १९९३ अंतर्गत कलम ४ अन्वये पिण्याच्या पाण्याची टंचाई घोषित करण्यात यावी यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन दिले आहे. त्यासाठी पाण्याची तात्पुरती उपाययोजना म्हणून भैरवनाथ सहकारी पाणीपुरवठा संस्था मर्या. गिरगाव आश्रमशाळा येथून फिल्टर हाऊस पाचगाव येथे पाईपलाईन टाकून पाणीपुरवठा करण्यात यावा तसेच शाहू सहकारी पाणीपुरवठा योजना आश्रमशाळा येथून फिल्टर हाऊस पाचगाव येथे पाईपलाईन टाकून पाणीपुरवठा करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे विनंती केल्याचे समजते. त्यासाठी अंदाजे नऊ लाख रुपयांचे अंदाजपत्रकही जोडले आहे. निवडणुकीवेळी लोकप्रतिनिधी येतात, पाण्याची घोषणा करतात. निवडणूक झाली की सांगतात, महापालिकेला विचारा. महापालिकेला विचारले की, कोणीही दाद देत नाही. १५ दिवसांतून एकदा पाणीपुरवठा केला जातो. तेही दुर्गंधीयुक्त पाणी पिण्याच्या लायकीचे नसलेले. मग सर्वसामान्यांना आधार घ्यावा लागतो, तो खासगी टँकरवाल्यांचा. कारण पालिकेच्या टँकरला फोन केला की, उडवाउडवीची उत्तरे मिळतात. ज्याचा वशिला मोठा त्याच्या दारात लगेच टँकरने पाणीपुरवठा केला जातो. - सौ. स्नेहल संजय सावंत, समृद्धीनगर, पाचगाव.पाचगाव उपनगरातील लोकांचा प्रश्न गंभीर आहे. त्यासाठी उपाययोजना म्हणून शासनदरबारी प्रश्न मांडला आहे. आणि त्याचा पाठपुरावा करत गिरगाव आश्रमशाळेजवळून पाण्याची उपलब्धता करून देण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविलेला आहे. तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेंतर्गत पाचगाव नळ पाणीपुरवठ्याचे काम चालू आहे.-भिकाजी गाडगीळ, ग्रामपंचायत सदस्य, पाचगाव.पाचगाव संघर्ष आणि भंग पावलेली शांतता जर खरोखर सुधारायची असेल तर पाणीप्रश्न निकालात निघायला हवा, अशी जनतेतून कळकळीची मागणी होत आहे.