शहरं
Join us  
Trending Stories
1
माळेगाव निकाल: पहिल्या फेरीअखेर अजित पवार गटाचे १७, तावरे गटाचे चार उमेदवार आघाडीवर
2
IND vs ENG: जसप्रीत बुमराह कुठले सामने खेळणार? कर्णधार शुबमन गिलने लगेचच दिलं उत्तर, म्हणाला- "मोठा ब्रेक..."
3
सोलापूरात विमान लँड होताच समोर आला कुत्रा; पायलटची उडाली भंबेरी, सुरक्षा रक्षकही धास्तावले
4
"मी पहिल्याच रात्री त्याला स्पर्श करू दिला असता, पण..."; सिताराचा दावा, पतीवर गंभीर आरोप
5
इराणच्या अणुकेंद्रांवरील हल्ला निष्फळ, अमेरिकेचा गोपनीय अहवाल फुटल्याने खळबळ, ट्रम्प म्हणाले... 
6
आणीबाणीला आज ५० वर्षे पूर्ण, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल!
7
भारताचा चीनवर पलटवार, दिला झटका; ६ उत्पादनांवर लावलं अँटी डम्पिंग शुल्क, का घेतला निर्णय?
8
अभिनंदन यांना पकडणारा पाकिस्तानी ऑफिसर ठार; कोणी केली पाक जवानाची हत्या?
9
युद्धाचा भारताला फटका! १ लाख टन बासमती तांदूळ बंदरात अडकला, २००० कोटींवर टांगती तलवार?
10
लेट पण थेट! सोनाली कुलकर्णीने फॉलो केला ट्रेंड, 'एक नंबर तुझी कंबर' वर थिरकली
11
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
12
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
13
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
14
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
15
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
16
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
17
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
18
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
19
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
20
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा

सातवेतील पाणी योजनेच्या अपहारप्रकरणी पाचजणांना अटक

By admin | Updated: October 13, 2015 01:00 IST

जलस्वराजमधील अपहार : चार महिला, लेखा परीक्षण समितीच्या अध्यक्षांचा समावेश

सातवे : सातवे (ता. पन्हाळा) येथील जलस्वराज्य योजनेतील एक कोटी ११ लाख रुपयांच्या पाणी योजनेच्या गैरकारभारप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर तब्बल दहा महिन्यांनी कोडोली पोलिसांनी मंगळवारी याप्रकरणातील चार महिला व सामाजिक लेखा परीक्षणच्या अध्यक्षाला अटक केली. त्यांना पन्हाळा येथील प्रथम न्याय दंडाधिकारी ठोंबरे यांनी न्यायालयीन कोठडी दिली. याबाबत कोडोली पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, सातवे (ता. पन्हाळा) येथील जलस्वराज्य योजनेच्या सबलीकरण समीतीच्या सचिव मीनाक्षी आनंदराव पाटील (वय ४७), कमल सदाशिव माळी (४२), ज्योती उमेश चौगुले (३२), संगीता विश्वास चौगुले (४६), एका संस्थेचे मॅनेजर व या योजनेचे लेखापरीक्षण समितीचे अध्यक्ष सर्जेराव यशवंत ढेरे (४६, सर्व राहणार सातवे, ता. पन्हाळा) यांना अटक झाली आहे, तर चचेगाव (ता. कऱ्हाड) येथील मृत ठेकेदार रामचंद्र पोवार यांची पत्नी हिराबाई रामचंद्र पोवार यांना अद्याप अटक झाली नाही. जागतिक बँकेच्या अर्थसहायाने सातवे गावासाठी सन २००६-२००७ साली जलस्वराज्य योजनेतून एक कोटी ११ लाख मंजूर झाले होते. ग्रामपंचायत व ग्रामीण पाणीपुरवठा महिला सबलीकरण सामाजिक लेखा परीक्षण या समितीतर्फे अंमलबजावणी झाली. दहा टक्के लोकवर्गणी जमा केली. कामाचा ठेका कऱ्हाड तालुक्यातील चचेगावचे ठेकेदार रामचंद्र पोवार यांनी घेतला होता. काही दिवसांनी त्यांच्या मृत्यू झाला. या योजनेची चौकशी करावी, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य उत्तम नंदूरकर यांनी तीन वर्षांपूर्वी तक्रारीद्वारे केली होती. उत्तम नंदूरकर यांनी १५ आॅगस्ट २०१४ला चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, यासाठी उपोषणाचा इशारा देऊन जोरदार रेटा लावला होता. त्यामुळे योजनेतील कागदपत्रे ग्रामपंचायतीकडे हस्तांतर करण्यास हयगय करणे, गहाळ करणे, असा १२ जणांवर ठपका ठेवला. त्यावेळी १२ जणांवर संबंधित कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करावा, असा आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुबेदार यांनी दिला होता. ‘लोकमत’चाही पाठपुरावा जानेवारी २०१५ मध्ये सातवे पाणी योजनेतील गैरव्यवहारावर तीन भागांत मालिका प्रसिद्ध करून ‘लोकमत’ने प्रकाश टाकला होता. गुन्हा दाखल होऊनही १२ जण मोकाटच, अशी बातमी प्रसिद्ध करून पोलीस प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष वेधले होते; परंतु सोमवारी चार महिला व पतसंस्थेच्या मॅनेजरला अटक केल्याबद्दल कोडोली पोलिसांबाबत सातवे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.