शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

कार झाडावर आदळून पाच ठार

By admin | Updated: June 5, 2016 01:16 IST

आंब्याजवळ दुर्घटना : मृत पुण्याचे एकाच कुटुंबातील

आंबा : विशाळगड येथील मलिक रेहान बाबांच्या दर्शनास निघालेल्या पुण्यातील एका कुटुंबीयांच्या कारला तळवडे (ता. शाहूवाडी) येथील अपघाती वळणावर भीषण अपघात होऊन त्यामध्ये पाचजण ठार झाले. हा अपघात शनिवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास झाला. कारचालक इम्रान शरीफ शेख (वय ३८), पत्नी शिफा (३५), वडील शरीफ करीम शेख (७०), आई सलमा (६०) व पुतणी लिबा समीर शेख (९) (सर्व रा. ३२ , घोरपडी, स्वारगेटजवळ, पुणे) अशी मृतांची नावे आहेत. घटनास्थळ व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, पुण्यातील घोरपडी येथे राहाणारे शरीफ शेख हे आपली तीन मुले व जावई यांच्या कुटुंबासह सकाळी पुणे येथून सकाळी आठच्या सुमारास चार वेगवेगळ्या वाहनांमधून विशाळगड दर्शनास बाहेर पडले . वारणानगर येथे जेवण करून शेख कुटुंबीय आंबामार्गे विशाळगडकडे निघाले. इम्रान कार (एम. एच.१२ एच. झेड-९८६२) चालवत होते. दुपारी दोनच्या सुमारास त्यांची कार तळवडे येथील अपघाती वळणावर आली असता त्यांचा कारवरील ताबा सुटल्याने ती भरधाव वेगात रस्त्याच्या डाव्या बाजूवरील झाडाला जावून धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, गाडीचे इंजिन तुटून चालकाच्या सीटला टेकले.मागील सीटही मोडून पडली. कारमधील चौघाही जणांच्या डोक्याला गंभीर दुखापती होऊन ते जागीच ठार झाले. अन्य तीन वाहनांतील नातेवाईक पुढे आंब्यातील विशाळगड फाट्यावर चौथ्या वाहनाची वाट पहात होते. मात्र, इम्रान यांच्या कारला महामार्गावर अपघात झाल्याचे समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली व अपघातग्रस्तांना स्थानिक तरुणांच्या मदतीने आंबा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथे एकटा कंपाउंडर हजर होता. उपचार करण्यासाठी डॉक्टर नसल्याने नातेवाइकांनी संताप व्यक्त करीत जखमी लिबा व सलमा यांना थेट साखरपा आरोग्य केंद्राकडे नेले. छोटी लिबा गंभीर जखमी झाली होती. रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी वाटेतच तिचा मृत्यू झाला. दरम्यान, येथील १०८ रुग्णसेवेने मृतांना मलकापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. येथे डॉ. डी. बी. जाधव व रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी रात्री उशिरा शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिले. कारचा चक्काचूर तळवडे वळणावर ठोकरलेली कार प्रथम लोखंडी खांब असलेल्या सूचना फलकावर आदळली. तो खांब उडवून समोरच्या झाडात घुसली. कारचे लाईट पुढे दहा फुटावर फेकले गेले होते. जेवणातील पदार्थ इतरत्र विखुरले होते. त्यावरून अपघात किती भीषण होता, हे स्पष्ठ होते. कुटुंबावर नियतीचा घाला.. इम्रान याचे आई-वडील, भाऊ, भाऊजी असे चौघाचे कुटुंब मलिक रेहान बाबांच्या दर्शनास निघाले होते. पाच पुरुष त्यांच्या पत्नी व पाच मुले असा एकत्रित परिवार चार वाहनांमधून जात असताना त्यातील एका कारला अपघात होवून पाचजण ठार झल्याने े शेख परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला.