शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

समिती प्रशासनासह पोलिसांची करडी नजर : पाच दिवसांनंतर बाजार समितीतील भाजीपाला सौदे पूर्ववत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 17:15 IST

गर्दी टाळण्याचे आदेश पोलिसांचे होते आणि व्यापारी सौदे काढण्यास तयार नव्हते, अशा कचाट्यात समिती प्रशासन अडकले होते. सौदे काढणार नसतील तर व्यापाऱ्यांचा परवाना रद्द करण्याचा इशारा जिल्हा उपनिबंधकांनी दिला होता.

ठळक मुद्दे कोणीही गर्दी करू नये, शिस्तीचे पालन करण्यासाठी पोलीस यंत्रणा सातत्याने आवाहन करीत होती.

कोल्हापूर : तब्बल पाच दिवसानंतर कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत शनिवारी भाजीपाल्याचे सौदे पूर्ववत झाले. पोलीस प्रशासनाने केलेल्या सूचनांचे पालन व सामाजिक अंतराचे पालन करीत खरेदी-विक्री झाली.भाजीपाला व फळ मार्केटमध्ये सौद्याच्या वेळी सामाजिक अंतर राखले जात नसल्याने पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. त्यामुळे व्यापाऱ्यांनी मंगळवार (दि. १४) पासून भाजीपाल्याचे सौदे बंद केले होते. जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा थांबवायचा नाही, असा फतवा राज्य सरकारचा होता, गर्दी टाळण्याचे आदेश पोलिसांचे होते आणि व्यापारी सौदे काढण्यास तयार नव्हते, अशा कचाट्यात समिती प्रशासन अडकले होते. सौदे काढणार नसतील तर व्यापाऱ्यांचा परवाना रद्द करण्याचा इशारा जिल्हा उपनिबंधकांनी दिला होता. त्यानंतर शनिवारपासून सौदे काढण्याची तयारी दर्शवली.

त्यानुसार सकाळी साडेपाचपासून पोलीस, समितीच्या कर्मचाºयांच्या उपस्थितीत सौदे काढण्यात आले. समितीच्या मुख्य गेटवरच खरेदीदारांना पास दिले होते. वाहनचालक व खरेदीदार दोघांना स्वतंत्र पास होते. वाहन आत आले की पार्किंग होईल. खरेदीदार भाजी मार्केटमध्ये जाईल, जाताना दोन ठिकाणी पास पाहून आत सोडले होते. बॅरेकेडच्या आत व्यापारी, दिवाणजी आणि तोलाईदार तर बाहेर खरेदीदार उभे राहिल्याने नेहमीपेक्षा गर्दी कमी झाली होती. सौद्याच्या वेळी पोलिसांची करडी नजर व्यापाºयांवर होती. कोणीही गर्दी करू नये, शिस्तीचे पालन करण्यासाठी पोलीस यंत्रणा सातत्याने आवाहन करीत होती.दुपारी दीडपर्यंत मालाचा उठावसाधारणत: भाजीपाला व फळे मार्केटमध्ये सकाळी अकरापर्यंत मालाचा उठाव होतो. मात्र, शनिवारी गर्दी टाळण्यासाठी विविध ठिकाणी अडथळे उभे केले होते, त्यातून माल घेऊन बाहेर पडण्यास उशीर लागत होता. त्यामुळे दुपारी दीडपर्यंत भाजीपाला व फळांचा उठाव सुरू राहिला.समितीच्या पत्राशिवाय प्रवेश नाहीखरेदीदारांना समितीच्या वतीने पत्रे दिली आहेत, ती पाहूनच त्यांना प्रवेश व खरेदीचा पास दिला जातो. शनिवारी शंभरहून अधिकजणांकडे पत्रे नसल्याने प्रवेश दिला नाही. त्यांना सौदे संपल्यानंतर समितीकडे मागणी केली.पहाटे साडेतीन वाजताच कर्मचारी हजरसमितीच्या सर्व कर्मचा-यांना शनिवारी सकाळीच बोलवले होते. बाजार समितीचे सचिव मोहन सालपे, उपसचिव जयवंत पाटील यांच्यासह सर्व कर्मचारी पहाटे साडेतीन वाजता समितीत हजर होते. त्यानंतर पोलीस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे, पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, वसंत बाबर यांच्यासह पोलीस उपस्थित राहिले.---------------------------------------------शनिवारची आवक -फळे - १,०५२ क्विंटलभाजीपाला - १,९०७ क्विंटल 

टॅग्स :Marketबाजारkolhapurकोल्हापूर