शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

पाच विभागांचे वाद्यवृंद तिरंग्यास देणार सलामी

By admin | Updated: April 28, 2017 00:55 IST

एल. ए. मुल्लाणी करणार नेतृत्व : देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या ३0३ फुटी उंच झेंड्याचा लोकार्पण सोहळा

कोल्हापूर : पोलिस मुख्यालयात उभारण्यात आलेल्या ३०३ फुटी देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या उंच तिरंग्याचे लोकार्पण सोमवारी होत आहे. या सोहळ्यात कोल्हापूर परिक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर ग्रामीण, पुणे ग्रामीण असे पाच विभागांचे वाद्यवृंद सलामी देणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण होणाऱ्या देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या उंच अशा तिरंग्याला कोल्हापूर परिक्षेत्रातील पाच विभागांतील वाद्यवृंद सलामी देणार आहेत. या वाद्यवृंद पथकाचे नेतृत्व सातारा पोलिस दलाचे वाद्यवृंद मास्तर सहायक फौजदार एल. ए. मुल्लाणी हे करणार आहेत. मुल्लाणी यांना उत्कृष्ट सेवेबद्दल राष्ट्रपती पदक व पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह प्राप्त झालेले आहे. ते स्वत:ही कोरॅनेट व ट्रॅम्पेट वाजवतात. त्यांना बी. एम. जाधव (सांगली), एल. वायदंडे (पुणे ग्रामीण), एम. माने (सोलापूर ग्रामीण), श्रीकांत कोरवी (कोल्हापूर) हे वाद्यवृंद मास्तर साहाय्य करणार आहेत. या पथकात कोल्हापूर - १३, सातारा - १४, सांगली- १३, पुणे ग्रामीणचे १४, सोलापूर ग्रामीणचे ११ असे ६४ जणांचे वाद्यवृंद पथक चार धून वाजवून सलामी देणार आहेत. या पथकांमध्ये ट्रॅम्पेट, कोरॅनेट, इम्पोरियम, अ‍ॅल्टो सॅक्सोफोन, बेस ड्रम, साईड ड्रम, सिबॉल आदी वाद्यवृंद साहित्याचा समावेश आहे. या मानवंदनेची तयारी गुरुवारी सायंकाळी पोलिस कवायत मैदान येथे सुरू होती. त्यात पाच विभागांतील वाद्यवृंद पथकाचे कर्मचारी सहभागी झाले होते. १२ मिनिटांत फडकविणारमहाकाय असा देशातील दुसऱ्या क्रमांकाचा तिरंगा एकूण १२ मिनिटांत फडकावला जाणार आहे. त्यात ध्वज वर चढत असताना स्लो मार्च अर्थात सलामी शास्त्राप्रमाणे प्रथम महाराष्ट्र गीत, प्रियदर्शनी गीत, सारे जहाँसे अच्छा आणि ध्वज पूर्ण स्थिरावल्यानंतर शेवटी ५२ सेकंदात राष्ट्रगीताची धून वाजविली जाणार आहे. हे माझे भाग्य : मुल्लाणीदेशातील दुसऱ्या क्रमांकाचा उंच असलेल्या तिरंग्याला सलामी देण्याचे भाग्य मला लाभत आहे. कारण माझी निवृत्ती ३१ मे रोजी होत आहे. मी गेल्या ३९ वर्षांत वाद्यवृंद पथकात काम केले आहे. गेल्या ९ वर्षांपूर्वी मला सातारा पोलिस दलातील वाद्यवृंदाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. सेवाकाळात मला राष्ट्रपती पदक, पोलिस महासंचालकाचे सन्मानचिन्ह, असे बहुमान मिळाले आहेत. त्यात सेवानिवृत्तीनजीक मला हा बहुमान मिळत आहे. त्यामुळे मला मिळालेल्या या संधीचा सार्थ अभिमान आहे, असे मत ‘लोकमत’शी बोलताना सहायक पोलिस उपनिरीक्षक एल. ए. मुल्लाणी यांनी व्यक्त केले. देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या तिरंग्याला वाद्यवृंदाच्या माध्यमातून सलामी देण्याची संधी केवळ एक दिवसाने हुकली. कारण मी ३९ वर्षांच्या सेवेनंतर ३० एप्रिलला निवृत्त होत आहे तर तिरंगा लोकार्पण सोहळा १ मे रोजी होत आहे. मात्र, माझे सर्व सहकारी ही कसर भरून काढून उत्कृष्टरित्या ठरवून दिलेल्या गीतांची धून वाजवून सलामी देतील. - रफिक पठाण, वाद्यवृंद पथक मास्तर, कोल्हापूर पोलिस दल