शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

मासे फेकले ‘प्रदूषण’च्या कार्यालयात

By admin | Updated: April 8, 2015 00:34 IST

मानवाधिकार न्याय संघटनेचे आंदोलन : ‘पंचगंगा’ प्रदुषणप्रश्नी राजाराम कारखान्यावर कारवाईची मागणी

कोल्हापूर : पंचगंगा नदीतील मृत मासे मंगळवारी मानवाधिकार न्याय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात फेकून निषेध नोंदविला. मासे मृत होण्यास जबाबदार ठरलेल्या राजाराम कारखान्यावर कठोर करवाई करावी, अन्यथा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या घरी मृत मासे पोहोच करण्याचे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला.शिये (ता. करवीर) हद्दीत पंचगंगा नदीत मोठ्या प्रमाणात मासे मृत झाल्याचे रविवारी (दि. ५) सायंकाळी उघडकीस आले. त्यानंतर प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे (एमपीसीबी) तक्रार केली. सोमवारी देसाई यांच्यासह एमपीसीबी व महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कसबा बावड्यातील राजाराम बंधारा ते शिये पुलादरम्यान नदीपात्राची पाहणी केली. त्यावेळी उंबरमळी भागातून राजाराम साखर कारखान्याने मळीमिश्रित पाणी नदीत सोडल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर मंडळाने कारखान्यास नोटीस दिली. मृत माशांमुळे दुर्गंधी सुटली आहे. ते नदीतून काढण्याकडे ‘प्रदूषण’च्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे संतप्त मानवाधिकार न्याय संघटनेचे पदाधिकारी पंचगंगा नदीतून मृत मासे पोत्यातून घेऊन आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तिरडीवर मृत मासे ठेवून जवळच असलेल्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयाकडे त्यांनी मोर्चा वळविला. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध घोषणाबाजी करीत दुपारी दोनच्या सुमारास ते कार्यालयात आले. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयाच्या आवारात मृत माशांचे दफन करावे, अशी जोरदार मागणी त्यांनी केली. त्यावेळी अधिकाऱ्यांनी याला विरोध केला. त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी प्रदूषणच्या कार्यालयात मृत मासे फेकले. अधिकाऱ्यांच्या अंगावरही मासे फेकण्याचा प्रयत्न केला. विरोध केल्यानंतर अधिकारी आणि पदाधिकारी यांच्यात शाब्दिक वाद झाला. परिणामी काही काळ तणाव निर्माण झाला होता. त्वरित पोलीस आल्यामुळे तणाव निवळला.संघटनेचे विशाल टेंबुगडे, विजय जाधव, उदय घाडगे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. आधिकाऱ्यांना निलंबित करावेउपप्रादेशिक प्रदूषण नियंत्रण अधिकारी मनीष होळकर यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे, राजाराम कारखान्याने मळीमिश्रित पाणी पंचगंगेत सोडले आहे. हजारो मासे मृत झाले आहेत. कारखान्यांवर कठोर कारवाई करावी. कारखान्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांचे निलंबित करावे. यावेळी होळकर यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले.