शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Maharashtra Assembly Election 2019 ‘वंचित’चा पहिला विजय थोडक्यात हुकला -: चंदगडमधून अप्पी पाटील काठावर पराभूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 18:33 IST

Maharashtra Assembly Election 2019चंदगडमधून विनायक ऊर्फ अप्पी पाटील यांनी राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार राजेश पाटील यांना शेवटपर्यंत झुंजविले. पण अप्पी पाटील यांचे स्वकर्तृत्व आणि ‘वंचित’चा लागलेला हातभार यांमुळे पहिल्या फेरीपासूनच त्यांनी आघाडी घेत विजयाची हवा तयार केली.

ठळक मुद्देहातकणंगलेत मिणचेकरांच्या पराभवास कारणीभूत

कोल्हापूर : वंचित बहुजन आघाडीचा कोल्हापुरातील आणि राज्यातील पहिला विजय साकारण्याचा प्रयत्न थोडक्यात हुकला. चंदगडमधून विनायक ऊर्फ अप्पी पाटील यांनी राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार राजेश पाटील यांना शेवटपर्यंत झुंजविले. चंदगड वगळता जिल्ह्यातील ‘वंचित’चा झंझावात दिसलाच नाही. अन्य सात उमेदवारांची अनामत जप्त होईल, अशी परिस्थिती आहे. हातकणंगलेत मात्र शिवाजी कांबळे या उमेदवाराने घेतलेल्या ११ हजार मतांमुळे शिवसेनेच्या विद्यमान आमदारांना पराभव चाखावा लागला.

वंचित बहुजन आघाडीने जिल्ह्यातील कागलची एकमेव जागा वगळता उर्वरित सर्व नऊ जागा स्वबळावर लढविल्या. चंदगडमधून अप्पी पाटील यांनी राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारल्याने ‘वंचित’ची उमेदवारी खांद्यावर घेतली. प्रस्थापित उमेदवारालाच ‘वंचित’ने जवळ केल्याने टीकाही झाली होती; पण अप्पी पाटील यांचे स्वकर्तृत्व आणि ‘वंचित’चा लागलेला हातभार यांमुळे पहिल्या फेरीपासूनच त्यांनी आघाडी घेत विजयाची हवा तयार केली.चौदाव्या फेरीपर्यंत पाच ते १२ हजार अशा मताधिक्याने विजयाकडे कूच करणाऱ्या अप्पी पाटील यांना १५व्या फेरीत मात्र धक्का बसला. १९८० मतांची आघाडी घेऊन राजेश पाटील पुन्हा शर्यतीत आले. चंदगड पट्ट्याची मतमोजणी सुरू झाल्यानंतर राजेश पाटील व शिवाजी पाटील यांच्यात शर्यत सुरू झाली आणि अप्पी पाटील तिसºया क्रमांकावर आले. राजेश पाटील यांनी शर्यत जिंकली असली तरी ‘वंचित’च्या माध्यमातून अप्पी पाटील यांनी सर्वांचेच आडाखे चुकवत मारलेली मुसंडी सर्वाधिक चर्चेचा विषय ठरली.--------------------------------------------‘वंचित’चा प्रभाव ओसरलालोकसभेला ‘वंचित’ने जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघांत घेतलेल्या लक्षणीय मतांनी प्रस्थापितांच्या उरात धडकी भरवली होती. विधानसभेलाही तोच पॅटर्न पुढे ठेवला जाईल, असे भाकीत वर्तविले जात होते; पण वंचित आघाडीतील अंतर्गत व कुरघोड्यांमुळे वंचित प्रमुख शर्यतीमधून बाहेर पडून ती ‘वंचित’ऐवजी किंचित कधी झाली, ते त्यांनाही कळले नाही. अप्पी पाटील यांनी ४३ हजार मते घेतली; पण त्यात त्यांचा वैयक्तिक करिश्मा जास्त आहे.-------------------------------------------------मिणचेकर यांची हॅट्ट्रिक ‘वंचित’ने रोखलीहातकणंगलेतील उमेदवार शिवाजी कांबळे यांनी घेतलेली ११ हजार २०७ मते वगळता अन्य उमेदवार पाच ते सहा हजारांच्या आतच राहिले. हातकणंगलेमध्ये मात्र ‘वंचित’ने घेतलेल्या मतामुळे आमदार सुजित मिणचेकर यांची हॅट्ट्रिक रोखली गेली हे मात्र निश्चित. काँग्रेसकडून विजयी झालेले राजूबाबा आवळे आणि पराभूत उमेदवार सुजित मिणचेकर यांच्यातील मतांचा फरक अवघा साडेसहा हजारांचा आहे. लोकसभेलाही ‘वंचित’ने घेतलेल्या दीड लाख मतांमुळे ‘स्वाभिमानी’चे राजू शेट्टी यांना पराभूत व्हावे लागले होेते.---------------------------------------------मतदारसंघ उमेदवार पडलेली मतेचंदगड अप्पी पाटील ४३ हजार ८३९राधानगरी जीवन पाटील ५६८०करवीर डॉ. आनंदा गुरव ५२००दक्षिण दिलीप कावडे २२१८उत्तर राहुल राजहंस ११५६शाहूवाडी डॉ. सुनील पाटील ४७००हातकणंगले शिवाजी कांबळे ११ हजार २०७इचलकरंजी शशिकांत आमणे ३६९३शिरोळ सुनील खोत ६१४५ 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019kolhapur-pcकोल्हापूरElectionनिवडणूक