शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

Maharashtra Assembly Election 2019 ‘वंचित’चा पहिला विजय थोडक्यात हुकला -: चंदगडमधून अप्पी पाटील काठावर पराभूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 18:33 IST

Maharashtra Assembly Election 2019चंदगडमधून विनायक ऊर्फ अप्पी पाटील यांनी राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार राजेश पाटील यांना शेवटपर्यंत झुंजविले. पण अप्पी पाटील यांचे स्वकर्तृत्व आणि ‘वंचित’चा लागलेला हातभार यांमुळे पहिल्या फेरीपासूनच त्यांनी आघाडी घेत विजयाची हवा तयार केली.

ठळक मुद्देहातकणंगलेत मिणचेकरांच्या पराभवास कारणीभूत

कोल्हापूर : वंचित बहुजन आघाडीचा कोल्हापुरातील आणि राज्यातील पहिला विजय साकारण्याचा प्रयत्न थोडक्यात हुकला. चंदगडमधून विनायक ऊर्फ अप्पी पाटील यांनी राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार राजेश पाटील यांना शेवटपर्यंत झुंजविले. चंदगड वगळता जिल्ह्यातील ‘वंचित’चा झंझावात दिसलाच नाही. अन्य सात उमेदवारांची अनामत जप्त होईल, अशी परिस्थिती आहे. हातकणंगलेत मात्र शिवाजी कांबळे या उमेदवाराने घेतलेल्या ११ हजार मतांमुळे शिवसेनेच्या विद्यमान आमदारांना पराभव चाखावा लागला.

वंचित बहुजन आघाडीने जिल्ह्यातील कागलची एकमेव जागा वगळता उर्वरित सर्व नऊ जागा स्वबळावर लढविल्या. चंदगडमधून अप्पी पाटील यांनी राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारल्याने ‘वंचित’ची उमेदवारी खांद्यावर घेतली. प्रस्थापित उमेदवारालाच ‘वंचित’ने जवळ केल्याने टीकाही झाली होती; पण अप्पी पाटील यांचे स्वकर्तृत्व आणि ‘वंचित’चा लागलेला हातभार यांमुळे पहिल्या फेरीपासूनच त्यांनी आघाडी घेत विजयाची हवा तयार केली.चौदाव्या फेरीपर्यंत पाच ते १२ हजार अशा मताधिक्याने विजयाकडे कूच करणाऱ्या अप्पी पाटील यांना १५व्या फेरीत मात्र धक्का बसला. १९८० मतांची आघाडी घेऊन राजेश पाटील पुन्हा शर्यतीत आले. चंदगड पट्ट्याची मतमोजणी सुरू झाल्यानंतर राजेश पाटील व शिवाजी पाटील यांच्यात शर्यत सुरू झाली आणि अप्पी पाटील तिसºया क्रमांकावर आले. राजेश पाटील यांनी शर्यत जिंकली असली तरी ‘वंचित’च्या माध्यमातून अप्पी पाटील यांनी सर्वांचेच आडाखे चुकवत मारलेली मुसंडी सर्वाधिक चर्चेचा विषय ठरली.--------------------------------------------‘वंचित’चा प्रभाव ओसरलालोकसभेला ‘वंचित’ने जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघांत घेतलेल्या लक्षणीय मतांनी प्रस्थापितांच्या उरात धडकी भरवली होती. विधानसभेलाही तोच पॅटर्न पुढे ठेवला जाईल, असे भाकीत वर्तविले जात होते; पण वंचित आघाडीतील अंतर्गत व कुरघोड्यांमुळे वंचित प्रमुख शर्यतीमधून बाहेर पडून ती ‘वंचित’ऐवजी किंचित कधी झाली, ते त्यांनाही कळले नाही. अप्पी पाटील यांनी ४३ हजार मते घेतली; पण त्यात त्यांचा वैयक्तिक करिश्मा जास्त आहे.-------------------------------------------------मिणचेकर यांची हॅट्ट्रिक ‘वंचित’ने रोखलीहातकणंगलेतील उमेदवार शिवाजी कांबळे यांनी घेतलेली ११ हजार २०७ मते वगळता अन्य उमेदवार पाच ते सहा हजारांच्या आतच राहिले. हातकणंगलेमध्ये मात्र ‘वंचित’ने घेतलेल्या मतामुळे आमदार सुजित मिणचेकर यांची हॅट्ट्रिक रोखली गेली हे मात्र निश्चित. काँग्रेसकडून विजयी झालेले राजूबाबा आवळे आणि पराभूत उमेदवार सुजित मिणचेकर यांच्यातील मतांचा फरक अवघा साडेसहा हजारांचा आहे. लोकसभेलाही ‘वंचित’ने घेतलेल्या दीड लाख मतांमुळे ‘स्वाभिमानी’चे राजू शेट्टी यांना पराभूत व्हावे लागले होेते.---------------------------------------------मतदारसंघ उमेदवार पडलेली मतेचंदगड अप्पी पाटील ४३ हजार ८३९राधानगरी जीवन पाटील ५६८०करवीर डॉ. आनंदा गुरव ५२००दक्षिण दिलीप कावडे २२१८उत्तर राहुल राजहंस ११५६शाहूवाडी डॉ. सुनील पाटील ४७००हातकणंगले शिवाजी कांबळे ११ हजार २०७इचलकरंजी शशिकांत आमणे ३६९३शिरोळ सुनील खोत ६१४५ 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019kolhapur-pcकोल्हापूरElectionनिवडणूक