शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

पहिली उचल एकरकमी एफआरपीसह २०० रुपये द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 00:49 IST

जयसिंगपूर : महापुरात ऊस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे १५ डिसेंबरपर्यंत बुडीत ऊस प्राधान्याने कारखान्यांनी गाळप करावा ...

जयसिंगपूर : महापुरात ऊस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे १५ डिसेंबरपर्यंत बुडीत ऊस प्राधान्याने कारखान्यांनी गाळप करावा व या हंगामात येणाऱ्या उसाला एकरकमी एफआरपीसह टनाला दोनशे रुपये पहिली उचल द्यावी. अन्यथा त्यानंतर आंदोलनाचे हत्यार उपसून कारखाने बंद पाडू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी शनिवारी येथे झालेल्या विराट ऊस परिषदेत दिला. त्यांच्या मागणीला शेतकऱ्यांनीही जोरदार प्रतिसाद दिला.लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर ही पहिलीच ऊस परिषद होती. मात्र, शेतकºयांनी गर्दीचा उच्चांक कायम ठेवून शेट्टी यांच्या पाठीशी राहून चळवळीला बळ दिले. जे कारखाने बुडीत ऊस तोडणार नाहीत ते कारखाने बंद पाडू. मागील गळीत हंगामातील एफआरपीची रक्कम न दिलेल्या कारखान्यांना एक कांडेही ऊस देऊ नये. अशा कारखान्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करुन त्यांना गाळप परवाना देण्यात येऊ नये. यासह आठ ठराव परिषदेत करण्यात आले. येथील विक्रमसिंह मैदानावर ही अठरावी ऊस परिषद झाली. या परिषदेत भाजप सरकारसह कडकनाथ मुद्दयावरुन वक्त्यांनी टिकेची झोड उडविली. संघटनेचे ज्येष्ठ नेते सतीश काकडे अध्यक्षस्थानी होते.माजी खासदार शेट्टी म्हणाले, यंदाच्या महापुरात ऊस पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे यंदाचा गळीत हंगाम कमी कालावधीचा राहणार आहे. त्यामुळे कारखान्यांमध्ये ऊस मिळविण्यासाठी स्पर्धा राहणार आहे. याचा फायदा करुन घेण्याची संधी शेतकºयांना आली आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकºयांना राज्यपालांनी केलेली हेक्टरी आठ हजाराची मदत तोकडी आहे. महापुरात नुकसानग्रस्त शेतकºयांचे ज्याप्रमाणे कर्जमाफी केली त्याप्रमाणे राज्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकºयांची कर्जमाफी करावी. निवडणुकीत सभा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहांना वेळ होता मात्र शेतकºयांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नव्हता. सरकारने शेतकºयांचा सातबारा विनाअट कोरा करावा. शासनाकडे बुलेट ट्रेन, समृध्दी हायवे, महामार्ग बांधण्यासाठी पैसे आहेत. मात्र शेतकºयांना कर्जमाफी व हमीभाव देण्यासाठी शासनाकडे पैसे नाहीत, अशी टिका शेट्टी यांनी केली. चळवळीच्या काळात विरोधक, साखर कारखानदार यांच्याकडून माझ्यावर आरोप-प्रत्यारोप झाले. मात्र, अठरा वर्षाच्या चळवळीत प्रसंगी शेतकºयांना फायदा मिळवून दिलो नसलो तरी नुकसान होऊ दिलेली नाही. हीच चळवळीची मोठी ताकद आहे.या परिषदेत प्रदेशाध्यक्ष प्रा. जालिंदर पाटील, वैभव कांबळे, महेश खराडे, राजेंद्र गड्डयान्नावर, सावकार मादनाईक, प्रकाश पोपळे, रसिका ढगे यांनी मनोगते व्यक्त केली.साखरेच्या दराप्रमाणे दरवाढ द्यावीगळीत हंगामाचा एफआरपीची रक्कम ठरविताना गतवर्षीची रिकव्हरी लक्षात घेतली जाते. यंदा महापुराने बुडालेल्या उसाची रिकव्हरीत कमालीची घट होणार आहे. त्यामुळे पुढील वर्षी ऊसदर निश्चित करताना यावर्षीच्या एफआरपीचा बेस धरु नये. सध्या ३१०० रुपयेप्रमाणे आम्ही पहिल्या उचलीची मागणी केली आहे. ३५०० रुपये साखर झाल्यानंतर त्याचाही फरक कारखानदारांना द्यावा लागेल, अशी मागणी शेट्टी यांनी यावेळी केली.