शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भाजपाने शंभरचा आकडा केला पार, काँग्रेस १९, ठाकरेंची शिवसेना ९; जाणून घ्या नगर पंचायत अन् नगर परिषदेचे निकाल
2
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
3
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
4
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
5
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
6
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
7
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
8
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
9
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
10
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
11
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
12
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
13
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
14
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
15
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
16
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
17
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
18
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
19
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
20
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील पहिली उचल सरासरी २०४५ रुपये

By admin | Updated: December 16, 2015 00:07 IST

सरकारकडूनच कायद्याला तिलांजली

कोल्हापूर : राज्य सरकार व स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्यामध्ये ८०-२० टक्के असा समझोता केला असला तरी उर्वरित २० टक्के साखरेचे दर व कारखान्यांना उपलब्ध होणारे पैसे, यावरच अवलंबून राहणार आहे. कोल्हापुरातील शेतकऱ्यांना ८० टक्क्यांप्रमाणे सरासरी २०४५, तर सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १८८४ रुपये पहिली उचल मिळेल.गत हंगामात कारखान्यांनी ओढूनताणून एकरकमी एफआरपी दिली. त्यामुळे हंगामाच्या शेवटी गाळप झालेल्या शेतकऱ्यांना दुसरा हंगाम आला तरी पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे यंदा कारखानदारांची सावध भूमिका घेत एकरकमी एफआरपीला सुरुवातीपासूनच नकारघंटा होती. परंतु, ‘स्वाभिमानी’ने एकरकमी एफआरपी घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा देऊन महिन्याची मुदत दिली. मात्र, हंगाम सुरू होऊन दीड महिना झाला तरी कारखानदार दराबाबत तोंड उघडत नाहीत. महिन्याची मुदत संपल्यानंतर ‘स्वाभिमानी’ने चक्काजामचा इशारा दिला; पण सहकारमंत्र्यांनी त्यांना चर्चेला बोलावले. एकरकमीवरून नरमाईची भूमिका घेत दोन टप्प्यांत एफआरपी देण्याचा निर्णय घेतला. पहिल्या टप्प्यात ८० टक्के व दुसऱ्या टप्प्यात २० टक्के, असा समझोता झाला. जिल्ह्याची एफआरपी पाहिली तर सर्वांत कमी राजाराम, कसबा बावड्याची २४०८; तर सर्वाधिक २६८५ रुपये कुंभी-कासारी, कुडित्रेची आहे. सरकारशी झालेल्या समझोत्यानुसार ८० टक्के रक्कम द्यायची म्हटले तर जिल्ह्यातील कारखान्यांना सरासरी २०४५ रुपये, तर सांगली जिल्ह्यातील कारखान्यांना १८८४ रुपये देय लागते. बाजारातील साखरेचे दर सुधारले तरच उर्वरित २० टक्के रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यासाठी पुढील हंगाम उजाडेल, अशीच सध्याची परिस्थिती आहे. सरकारकडूनच कायद्याला तिलांजली‘स्वाभिमानी’ने जरी नरमाईची भूमिका घेत ‘एफआरपी’चे तुकडे पाडण्यास परवानगी दिली असली तरी सरकार याबाबत अध्यादेश काढते का? हे पाहणे महत्त्वाचे आहे. ‘एफआरपी’ हा केंद्राचा कायदा आहे. त्याची पायमल्ली करण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही. सरकारच कायद्याला तिलांजली देणार असेल, तर न्याय मागायचा कोणाकडे? असा सवाल शेतकरी करीत आहेत. सॉफ्ट लोनचा १८ कोटींचा हप्ता सरकारने कारखान्यांना २०१३-१४ व १४-१५ या हंगामात सॉफ्ट लोन दिले होते. त्याचे हप्ते एप्रिल २०१६ पासून कारखान्यांना द्यावे लागणार आहेत. हा हप्ता टनाला साधारणत: तीनशे रुपयांप्रमाणे प्रत्येक कारखान्याला सरासरी १८ कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. त्यामुळे उर्वरित २० टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या हातात लवकर पडण्याची शक्यता फारच कमी आहे.