शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

‘एफआरपी’नुसार पहिली उचल-- चंद्रकांतदादा पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 01:37 IST

बिद्री : शेतकºयांच्या उसाला चांगला भाव मिळाला पाहिजे अशीच राज्य सरकारची भूमिका असून, त्यासाठी जे काही करणे आवश्यक आहे ते सरकारने केले आहे. तरीही काही लोक धुराडी पेटू न देण्याची भाषा करत आहेत. कायद्याने निश्चित केलेल्या ७०:३० सूत्रांनुसार यंदा चांगला दर मिळणार असल्याने ऊसदराचा प्रश्न संपला असल्याचे महसूल व पालकमंत्री ...

ठळक मुद्दे: ७०:३० सूत्रानुसार यंदा चांगला दर, ऊसदर प्रश्न संपला :

बिद्री : शेतकºयांच्या उसाला चांगला भाव मिळाला पाहिजे अशीच राज्य सरकारची भूमिका असून, त्यासाठी जे काही करणे आवश्यक आहे ते सरकारने केले आहे. तरीही काही लोक धुराडी पेटू न देण्याची भाषा करत आहेत. कायद्याने निश्चित केलेल्या ७०:३० सूत्रांनुसार यंदा चांगला दर मिळणार असल्याने ऊसदराचा प्रश्न संपला असल्याचे महसूल व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी येथे जाहीर केले.येथील दूधसाखर महाविद्यालयाच्या प्रांगणात बिद्री साखर कारखाना निवडणुकीत महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडीच्या विजयोत्सव मेळाव्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘कारखान्यांनी उसाला एफआरपीप्रमाणे पहिली उचल द्यावी व त्यानंतर जो नफा मिळेल तो ७०:३० च्या सूत्रानुसार द्यावा असे कायदेशीर धोरण निश्चित करण्यात आले आहे.जेव्हा कर्जमाफीबाबत बोलताना ते म्हणाले राष्टÑीयीकृत बँकांमधून डाटा चुकीचा आल्याने काही प्रमाणात कर्जमाफीची रक्कम शेतकºयांच्या खात्यात येण्यास विलंब होत आहे; मात्र काही लोक त्यावरुन अकांडतांडव करीत आहेत. त्यातून कोणाचे भले होणार नाही. चंद्रकांतदादा पुढे म्हणाले, रस्त्यांच्या कामासंबंधी जीएसटीच्या समावेशाने टेंडर भरण्यास ठेकेदारांनी विलंब केला आहे. त्यामध्ये सुधारणा झाली असून, अवेळी पडत असलेला पाऊस यामुळे खड्डे बुजविण्यात अडचणी येत आहेत. ते काम लवकरच पूर्ण होईल. 

एफआरपी द्यायला कारखान्यांकडे पैसे नव्हते तेव्हा राज्य सरकारने मदत केली. एफआरपीबाबत कधीच तडजोड केलेली नाही. त्यामुळे हंगाम सुरू करताना एफआरपी व नंतर ७०:३० च्या सुत्रानुसार अंतिम दर देणे कारखान्यांवर बंधनकारक आहे. असे धोरण एकदा निश्चित झाले असताना काही लोक वाहनांचे टायर पेटवणे, कारखान्याची धुराडी पेटू देणार नाही असा इशारा देत आहेत. परंतू ते दिवस आता गेले आहेत. ठरलेल्या सुत्राप्रमाणे यंदाही शेतकºयांच्या उसाला चांगला दर मिळणार असल्याने ऊसदराचा प्रश्न संपला आहे.’- चंद्रकांतदादा पाटील, पालकमंत्री