शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

‘एफआरपी’नुसार पहिली उचल-- चंद्रकांतदादा पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 01:37 IST

बिद्री : शेतकºयांच्या उसाला चांगला भाव मिळाला पाहिजे अशीच राज्य सरकारची भूमिका असून, त्यासाठी जे काही करणे आवश्यक आहे ते सरकारने केले आहे. तरीही काही लोक धुराडी पेटू न देण्याची भाषा करत आहेत. कायद्याने निश्चित केलेल्या ७०:३० सूत्रांनुसार यंदा चांगला दर मिळणार असल्याने ऊसदराचा प्रश्न संपला असल्याचे महसूल व पालकमंत्री ...

ठळक मुद्दे: ७०:३० सूत्रानुसार यंदा चांगला दर, ऊसदर प्रश्न संपला :

बिद्री : शेतकºयांच्या उसाला चांगला भाव मिळाला पाहिजे अशीच राज्य सरकारची भूमिका असून, त्यासाठी जे काही करणे आवश्यक आहे ते सरकारने केले आहे. तरीही काही लोक धुराडी पेटू न देण्याची भाषा करत आहेत. कायद्याने निश्चित केलेल्या ७०:३० सूत्रांनुसार यंदा चांगला दर मिळणार असल्याने ऊसदराचा प्रश्न संपला असल्याचे महसूल व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी येथे जाहीर केले.येथील दूधसाखर महाविद्यालयाच्या प्रांगणात बिद्री साखर कारखाना निवडणुकीत महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडीच्या विजयोत्सव मेळाव्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘कारखान्यांनी उसाला एफआरपीप्रमाणे पहिली उचल द्यावी व त्यानंतर जो नफा मिळेल तो ७०:३० च्या सूत्रानुसार द्यावा असे कायदेशीर धोरण निश्चित करण्यात आले आहे.जेव्हा कर्जमाफीबाबत बोलताना ते म्हणाले राष्टÑीयीकृत बँकांमधून डाटा चुकीचा आल्याने काही प्रमाणात कर्जमाफीची रक्कम शेतकºयांच्या खात्यात येण्यास विलंब होत आहे; मात्र काही लोक त्यावरुन अकांडतांडव करीत आहेत. त्यातून कोणाचे भले होणार नाही. चंद्रकांतदादा पुढे म्हणाले, रस्त्यांच्या कामासंबंधी जीएसटीच्या समावेशाने टेंडर भरण्यास ठेकेदारांनी विलंब केला आहे. त्यामध्ये सुधारणा झाली असून, अवेळी पडत असलेला पाऊस यामुळे खड्डे बुजविण्यात अडचणी येत आहेत. ते काम लवकरच पूर्ण होईल. 

एफआरपी द्यायला कारखान्यांकडे पैसे नव्हते तेव्हा राज्य सरकारने मदत केली. एफआरपीबाबत कधीच तडजोड केलेली नाही. त्यामुळे हंगाम सुरू करताना एफआरपी व नंतर ७०:३० च्या सुत्रानुसार अंतिम दर देणे कारखान्यांवर बंधनकारक आहे. असे धोरण एकदा निश्चित झाले असताना काही लोक वाहनांचे टायर पेटवणे, कारखान्याची धुराडी पेटू देणार नाही असा इशारा देत आहेत. परंतू ते दिवस आता गेले आहेत. ठरलेल्या सुत्राप्रमाणे यंदाही शेतकºयांच्या उसाला चांगला दर मिळणार असल्याने ऊसदराचा प्रश्न संपला आहे.’- चंद्रकांतदादा पाटील, पालकमंत्री