शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
4
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
5
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
6
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
7
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
8
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
9
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
10
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
11
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
12
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
13
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
14
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
15
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
16
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
17
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
18
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
19
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
20
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?

‘एफआरपी’नुसार पहिली उचल-- चंद्रकांतदादा पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 01:37 IST

बिद्री : शेतकºयांच्या उसाला चांगला भाव मिळाला पाहिजे अशीच राज्य सरकारची भूमिका असून, त्यासाठी जे काही करणे आवश्यक आहे ते सरकारने केले आहे. तरीही काही लोक धुराडी पेटू न देण्याची भाषा करत आहेत. कायद्याने निश्चित केलेल्या ७०:३० सूत्रांनुसार यंदा चांगला दर मिळणार असल्याने ऊसदराचा प्रश्न संपला असल्याचे महसूल व पालकमंत्री ...

ठळक मुद्दे: ७०:३० सूत्रानुसार यंदा चांगला दर, ऊसदर प्रश्न संपला :

बिद्री : शेतकºयांच्या उसाला चांगला भाव मिळाला पाहिजे अशीच राज्य सरकारची भूमिका असून, त्यासाठी जे काही करणे आवश्यक आहे ते सरकारने केले आहे. तरीही काही लोक धुराडी पेटू न देण्याची भाषा करत आहेत. कायद्याने निश्चित केलेल्या ७०:३० सूत्रांनुसार यंदा चांगला दर मिळणार असल्याने ऊसदराचा प्रश्न संपला असल्याचे महसूल व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी येथे जाहीर केले.येथील दूधसाखर महाविद्यालयाच्या प्रांगणात बिद्री साखर कारखाना निवडणुकीत महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडीच्या विजयोत्सव मेळाव्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘कारखान्यांनी उसाला एफआरपीप्रमाणे पहिली उचल द्यावी व त्यानंतर जो नफा मिळेल तो ७०:३० च्या सूत्रानुसार द्यावा असे कायदेशीर धोरण निश्चित करण्यात आले आहे.जेव्हा कर्जमाफीबाबत बोलताना ते म्हणाले राष्टÑीयीकृत बँकांमधून डाटा चुकीचा आल्याने काही प्रमाणात कर्जमाफीची रक्कम शेतकºयांच्या खात्यात येण्यास विलंब होत आहे; मात्र काही लोक त्यावरुन अकांडतांडव करीत आहेत. त्यातून कोणाचे भले होणार नाही. चंद्रकांतदादा पुढे म्हणाले, रस्त्यांच्या कामासंबंधी जीएसटीच्या समावेशाने टेंडर भरण्यास ठेकेदारांनी विलंब केला आहे. त्यामध्ये सुधारणा झाली असून, अवेळी पडत असलेला पाऊस यामुळे खड्डे बुजविण्यात अडचणी येत आहेत. ते काम लवकरच पूर्ण होईल. 

एफआरपी द्यायला कारखान्यांकडे पैसे नव्हते तेव्हा राज्य सरकारने मदत केली. एफआरपीबाबत कधीच तडजोड केलेली नाही. त्यामुळे हंगाम सुरू करताना एफआरपी व नंतर ७०:३० च्या सुत्रानुसार अंतिम दर देणे कारखान्यांवर बंधनकारक आहे. असे धोरण एकदा निश्चित झाले असताना काही लोक वाहनांचे टायर पेटवणे, कारखान्याची धुराडी पेटू देणार नाही असा इशारा देत आहेत. परंतू ते दिवस आता गेले आहेत. ठरलेल्या सुत्राप्रमाणे यंदाही शेतकºयांच्या उसाला चांगला दर मिळणार असल्याने ऊसदराचा प्रश्न संपला आहे.’- चंद्रकांतदादा पाटील, पालकमंत्री