शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

राज्यातील पहिली आॅनलाईन सैन्यभरती सुरू

By admin | Updated: February 4, 2016 01:10 IST

५७ हजार जणांची नोंदणी : कोल्हापुरात पहिल्या दिवशी दोन हजार ४७७ उमेदवारांची हजेरी; जिल्हानिहाय भरतीला प्रतिसाद

कोल्हापूर : कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांसाठी शिवाजी विद्यापीठातील क्रीडामहर्षी मेघनाथ नागेशकर क्रीडासंकुलात बुधवारी पहाटे प्रारंभ झाला. राज्यातील पहिल्याच जिल्हानिहाय आॅनलाईन पद्धतीने ही भरती प्रक्रिया राबविली जात असल्याने तब्बल ५७ हजार उमेदवारांनी यासाठी नोंदणी केली आहे. बुधवारी पहिल्या दिवशी रत्नागिरी जिल्हा व सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील उमेदवारांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. पहिल्या दिवशी दोन हजार ४७७ उमेदवारांनी हजेरी लावली. भरती प्रक्रियेचे नियोजन जिल्हा सैनिक कार्यालय व सैन्यभरती कार्यालयातर्फे केले आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या सहा जिल्ह्यांसाठी तसेच गोव्यासाठी २० फेब्रुवारीअखेर भरती मेळावा होईल. यामध्ये सोल्जर जनरल ड्युटी, सोल्जर क्लार्क, स्टोअरकीपर टेक्निकल, सोल्जर टेक्निकल, सोल्जर ट्रेडस्मन ही पदे आहेत. बुधवारी मध्यरात्री दोन वाजल्यापासून भरती प्रक्रियेस प्रारंभ झाला. सायबर चौकाजवळील शिवाजी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारातून उमेदवारांना प्रवेश देण्यात येत होता. या ठिकाणी प्रवेशपत्र (अ‍ॅडमिट कार्ड) असलेल्या उमेदवारांनाच प्रवेश दिला जात होता. या प्रवेशद्वारापासून मैदानापर्यंत दोन्ही बाजूंना बॅरिकेटस् लावून एका रांगेतून उमेदवारांना सोडण्यात येत होते. या ठिकाणी त्यांची आॅनलाईन नोंदणी कोणत्या पदासाठी केली आहे, हे पाहून उमेदवारांना धावण्याच्या चाचणीसाठी पुढे पाठविण्यात आले. सुमारे १२० ते १२५ मुलांचे गट करून धावण्याच्या प्रक्रियेसाठी पाठवून चाचणी घेण्यात येत होती. ती ठराविक वेळेत जे उमेदवार पार करीत होते, त्यांची बायोमेट्रिक नोंद करण्यात येत होती. या ठिकाणी कागदपत्रे तपासून पुढे त्यांच्या पुलअप्स् काढण्याची चाचणी घेण्यात येत होती. यानंतर पुन्हा एकादा बायोमेट्रिक घेऊन प्रत्येकाची उंची, वजन, छाती यांचे मोजमाप करून आॅनलाईन नोंदणी करण्यात येत होती. या सर्व प्राथमिक फेरीत निवड झालेल्या उमेदवारांची रविवारी (दि. ७) वैद्यकीय तपासणी व त्यानंतर लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. आज, गुरुवारी सांगली जिल्ह्यासाठी सैन्य मेळावा होणार आहे. भरतीच्या जिल्हानिहाय तारखा आजपासून ६ फेब्रुवारीपर्यंत : सांगली ७ फेब्रुवारी : वैद्यकीय चाचणी ८ व ९ फेब्रुवारी : सोलापूर १० ते १२ फेब्रुवारी : कोल्हापूर १३ फेब्रुवारी : वैद्यकीय चाचणी १४ फेब्रुवारी : सिंधुदुर्ग व गोवा १५ ते १७ फेब्रुवारी : सातारा १८ ते २० फेब्रुवारी : वैद्यकीय चाचणी भरतीसाठी एसटीकडून जादा गाड्या रत्नागिरी जिल्ह्यासाठी पहिल्या दिवशी भरती प्रक्रिया होणार असल्याने महामंडळाच्यावतीने जादा आठ गाड्यांचे नियोजन केले होते. रत्नागिरी येथून थेट भरती प्रक्रिया सुरू असलेल्या विद्यापीठातील भरती ठिकाणापर्यंत गाड्यांची विशेष सोय केली होती. तसेच ‘केएमटी’तर्फे मध्यवर्ती बसस्थानक ते भरती मेळावाच्या ठिकाणी व पुन्हा परत मध्यवर्ती बसस्थानक अशा दोन विशेष गाड्यांची सोय होती. तसेच या मार्गावरील १९ गाड्यांमार्फत उमेदवारांची ने-आण करण्यात येत होती.